Marathi news and Articles. विविध विषयावरील मराठी लेख आणि गल्ली ते दिल्लीपर्यंतच्या बातम्या तुम्हाला वाचायला मिळतील.
Sunday, December 27, 2015
पंतप्रधान मोदी यांची पाकिस्तानला भेट भारताच्या प्रगल्भतेचे उदाहरण...
२६-११ मुंबईवरील पाकिस्तानच्या अतिरेक्यांचा हल्ला विसरता येत नाही. पण दहशतवादाला विरोध करत असताना आपण काही वेगळ्या मार्गांचा अवलंब करू शकतो का ? याचे उत्तर जेवढे सोपे तेवढे अवघड आहे. Communication is Solution of all problems. जगातील प्रत्येक समस्येवर संवाद हे एकमेव उत्तर आहे. भले त्या संवादाची भाषा संगीताची असेल नाहीतर राजकीय कूटनीतीची !
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्याबाबत भिजती घोंगडी झालेल्या अनेक प्रश्नाकडे ठोस उपाय करण्यासंबंधी पाऊले उचलायला सुरूवात केली आहे.भारत म्हणजे मोठी बाजारपेठ , ठोस भूमिका व जागतीकपातळीवरील ठेवलेला उदार, शांततावादी दृष्टीकोन अशी प्रतिमा आहे. जगभरातील गुंतवणूकदारांना आकर्षित करत असतानाच त्यांनी अत्यंत सखोलपणे योजनांची अमंलबजावणी व परराष्ट्रनीतीची व्युहरचना आखलेली आहे. विरोधक मोदी हे हूकूमशहा असल्याची टीका करतात. परंतू त्यांच्या ठोस व स्पष्ट निर्णयामुळे नोकरशाहीवरील, पक्षावरील पकड अधिक मजबूत झाल्याकडे कोणताही सर्वसामान्य माणूस डोळेझाक करू शकत नाही. अशाच बाबीमुळे मोदी अनपेक्षित , सकारात्मक निर्णय घेतील असा सर्वसामान्यांना विश्वास वाटू लागला सर्वप्रथम भारतात गुंतवणुकदारांना निमंत्रण देवून सशक्त आर्थिक महासत्ता करण्यासाठी फ्रान्स, रशिया, अमेरिका इत्यादी देशाशी करार केले आहेत. असे असले तरी उठसुठ भारताच्या प्रतिमेला धक्का लावण्यासाठी काश्मीरचा मुद्दा पाकिस्तान सतत उगाळत असतो. याला भारताने सकारात्मक आणि संवादपातळीवर प्रयत्न ठेवावेत असा बहुतेक देशांचा आग्रह आहे. अशा परिस्थीतीत नवाजशरीफ यांच्या वाढदिवसदिनी पंतप्रधान मोदींनी थेट त्यांना अचानक भेट देवून चकीत केले. अश्या भेटीचा खरेच फायदा किती व तोटा किती याचा उहापोह करणे आवश्यक आहे. हेच शरीफ म्हणाले होते.धर्म हे अफूची गोळी आहे. तर रोजीरोटी श्वास आहे. पण पंतप्रधान नवाज शरीफ एकदा म्हणाले होते भले गवत खावून दिवस काढू..
मुळात पाकिस्तान हा अतिरेक्यांना पोसणारा देश असून त्यांचे अर्थकारण व जगाला ब्लॅकमेलींग करून अधिकाधिक कर्ज पदरात पाडून घेणारा देश अशी प्रतिमा आहे. पाक अंतर्गत दहशतवाद होरपळून निघत असताना अर्थात सर्वात जास्त बळी ठरतात निष्पाप महिला व लहान मुले. पाकचे लष्करी व राजकीय नेते धार्मिक उन्मादाने जनतेला भ्रमीत करतात आणि भारताविरूध्द गरळ ओकतात. याला खरे उत्तर त्या देशाने भारतासारख्या शेजारी राष्ट्राने शिकून घ्यायला हवे. भारतीय नागरीक हे जगात कोठेही जाओ ते आपलेपणाने सगळ्यांची मने जिंकतात. कारण या मातीनेच त्यांना बाळकडू पाजलेले असते. उलट पाकिस्तानने केवळ असूया व द्वेष यांचे गाठोडे बांधून इतिहासच कलंकित केलेला आहे.
बलाढ्य राष्ट्रे ही व्यापारी राष्ट्रे म्हणून कार्यरत आहेत. त्यांना आशियाखंडात भारताचे सामर्थ्य नको असल्यामुळेच पाकिस्तानला खतपाणी घातले जाते. हे त्यांनी लक्षात घ्यायला हवे किमान पाकिस्तानच्या सामान्य जनतेपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. कारण सर्वसामान्य माणुस कोणत्याही देशातील असो त्याला आपले कुटूंबप्रिय असते. इतरांच्या कुटूंबियाकडेही तो त्याच आत्मतीयतेन पहात असतो, याला पाकिस्तानही अपवाद नसावा. नाना पाटेकरच्या भाषेत सांगायचे झाले तर सबका खून लाल है.
आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाहोरला दिलेली भेट हे भारताच्या प्रगल्भतेचे उदाहरण आहे. कारण लोकशाही व वसुधैव कुटूम्बकम अशी देशाची संस्कृती आहे.
Subscribe to:
Posts (Atom)
Featured Post
मेकॉलची शिक्षणपध्दती किती दिवस व्यवस्थेने पचवायची ?
आठवीच्या वर्गावर भूमितीचा तास चालू होता. प्रमेय समजावून सांगणारे शिक्षक असे मानू या समजू असे सांगून प्रमेयाची सिध्दता समजावून सांगत होते....
-
(राजकीय पक्षांना आरटीआय ) संपत्तीच्याआकडेवारीत शुन्य सांगणे बंधनकारक नको-चिंदबरम नवी दिल्ली-राजकीय पक्षांना आरटीआयमध्ये संपत्तीची...