Showing posts with label Marathi Sahity. Show all posts
Showing posts with label Marathi Sahity. Show all posts

Tuesday, January 31, 2017

ई-बुक आणि मराठी साहित्य


इंटरनेटच्या जमान्यात आता मराठी वाचनाची भुक असणारा खास वाचकवर्ग तयार
झाला आहे.परदेशात स्थायीक झालेला मराठी माणुसऑनलाईन पुस्तके खरेदी करून वाचन करत असल्यामुळे अनेक मान्यवर प्रकाशकांनीबहुतेक पुस्तके वेबसाईटवर ई-बुकच्या माध्यमातुन उपलब्ध करून दिलीआहेत.परंतु कोणताही व्यवसायीक हेतु न ठेवता केवळ मराठी साहित्याची सेवाकरण्याचा वसा साहित्यचिंतनने जपलेला आहे.त्यामुळे येत्या काळात लेखक-वाचक-प्रकाशक यामध्ये साधणारा महत्वाचा दुवाम्हणुन साहित्यचिंतन हे संकेतस्थळ काम करेल असा आत्मविश्वासते व्यक्त करतात.आजच्या या डिजीटल दुनियेत जग हे फार जवळ आल आहे. बातम्या, माहिती,पुस्तक, साहित्य क्षणात जगाच्या एका कोपऱ्यातून दुसऱ्या कोपऱ्यातपोह्चते. मग मराठी साहित्य का पोहचू नये? याच प्रश्नावरून सुरुवात झालीसाहित्य चिंतन या उपक्रमाची http://www.SahityaChintan.com.  पुस्तकाचंमनन, चिंतन आणि भारतीय साहित्य जगभर पोहोचविण्याच्या उद्देशाने उभीराहिलेली एक चळवळ. साहित्य चिंतन वर मराठी, हिंदी, इंग्रजी भारतीयसाहित्य, साहित्य प्रेमी मित्रांना वाचायला मिळावे व जगात कुठेही ते मोफतउपलब्ध व्हावे हेच साहित्य चिंतन चे मुख्य ध्येय असल्याचे साहित्यचिंतनचेचेतनकुमार  अकर्ते  यांनी सांगितले.

मराठी साहित्य जगभर पोहोचविण्याची तळमळ साहित्य चिंतनची आहे. आजकालचंमराठी साहित्य हे केवळ वह्यापुस्तकांमध्येच अडकून न पडता संगणक, मोबाईलआणि इंटरनेटच्या माध्यमातून जगाच्या कानाकोपर्यात जाऊन पोचलंय. साहित्यचिंतन गेल्या ३ वर्ष्या पासून भारतीय साहित्याचे संगणकीकरण करतेय.कादंबरी, कथा, कविता, लेख, साप्ताहिक, मासिक इत्यादी साहित्य मोबाईलवरवाचता यावे म्हणून साहित्य चिंतनने मराठी बुक रीडर तसेच मराठी मोबाईलई-बुक अप्लिकेशन अन्द्रोइडसाठी उपलब्ध केलेय. आज श्यामची आईहे मराठीअन्द्रोइड ई-बुक अप्लिकेशन ५०००० हजार मोबाईलवर तर चाणक्य नीती आणिश्रीमद भगवत गीता हे हिंदी अन्द्रोइड ई-बुक अप्लिकेशन अनुक्रमे १७५००० व१०००० मोबाईलवरती डाउनलोड करण्यात आले आहेत. अवघे भारतीय साहित्य विश्वआता ‘अन्द्रोइड’ तंत्रज्ञानाच्या मोबाईलवर सामावले जाण्याची शक्यतानिर्माण झाली आहे. साने गुरूजी, वि. दा. सावरकर, तुकाराम महाराज, समर्थरामदास यांचे संतसाहित्य, महात्मा फुले यांच्या साहित्यासह ऐतिहासिक कथा,कादंबऱ्या, कविता असे सर्वकाही वाचकांना उपलब्ध करून दिले जाणार आहे.

सर्वच साहित्य मोफत उपलब्ध करणे कॉपीराईट बंधनामुळे शक्य नाही. त्यासाठीमराठी प्रकाशकांनी, मराठी वाचकांच्या सेवेसाठी, नवीन तंत्रज्ञानाची पूर्णमाहिती घेऊन, तंत्रज्ञानाची देवाण-घेवाण करावी. पुस्तक प्रकाशकांनातंत्रज्ञानाची मदत करणे; भारतीय साहित्याचे संगणकीकरण करणे; 'ई-बुक रीडर'तयार करून त्या माध्यमातून संगणक, मोबाईल यासारख्या डिव्हायसेसवरवाचण्यासाठी साहित्य उपलब्ध करणे हे साहित्य चिंतन कार्यरत आहे.

लेखकाच्या प्रतिभासामर्थ्यातुन निर्माण झालेले साहित्य थेट वाचकापर्यंतपोहोचविण्यासाठी लेखकाला चांगलेच दिव्य करावे लागतात.हा त्रास एवढा असतो की याला प्रसववेदनाच म्हटले जाते.त्यामुळे अनेकनवोदीत लेखकांचे साहित्य वाचकापर्यंत हव्या तेवढ्या प्रमाणात येतनाहीय.त्यामुळे मराठी साहित्याचा बोन्साय होत चालला आहे की काय अशी भीतीनिर्माण झाली आहे.हल्लीची पिढी वाचत नाही अशी टीका सर्वसाधारण केलीजातेय.बहुतेक प्रकाशकांनी नवोदीत लेखकांचे साहित्य बहुतेक  प्रसिध्दकरण्यासाठी वेटिंगवर  ठेवलेले असते.त्यामुळे मराठीत नवे विचारांचे , चाकोरीबाह्य लेखनाचे प्रवाह हवे तेवढेखळखळुन वाहत नाहीत.अर्थात त्याचा परिणाम त्यामुळे वाचकवर्गावरही झाल्यानेआजही वाचक जुन्या लेखकांच्या पुस्तकावर आपली वाचनभुक भागवत आहे.ही कोंडी फोडायची कशी हा प्रश्न निर्माण झाली आहे.पण त्याला सोल्युशन आहे का ?

प्रत्यक्षात मात्र मराठीत युवावर्ग आता ऑनलाईन वाचनाकडे चांगलाच आकर्षितझाला असल्याचे चित्र आहे.

मराठी साहित्याचे अभिसरण होण्यासाठी संगणीकरण अर्थात ई-बुकमध्ये रूपांतरणकरणे योग्य ठरणार आहे.वाचकवर्गाला सतत वाटत असत की चांगले साहित्य का वाचायला मिळत नाही?

साहित्य चिंतनच्या ई-बुक रीडरवर पुस्तक वाचणे म्हणजे खरोखरच आल्हादायकअसाच अनुभव आहे.ह्याचा वापर करून माऊसच्या क्लीकवर किंवा मोबाईलवर पुस्तकखर्‍या पुस्तकासारखे वाचु शकता.उदा.पुस्तकाचे पाने उलटणे आणि अक्षरांचाआकार मोठा करून वाचने .वाचन अगदी सहजशक्य करणे शक्य असल्याने वाचक याअप्लीकेशनच्या प्रेमातच पडतो.विशेष म्हणजे साहित्यचिंतनने लेखकांना जितके डाऊनलोड केले जातात त्यापोटीठरावीक मोबदला थेट लेखकांना दिला आहे.त्यामुळे आपले साहित्य मोफत उपलब्धकरून दिल्यामुळे लेखकांचा फायदा होतो आणि वाचकांनाही मोफत वाचायला मिळते.काळाजी पाऊले ओळखत आता सर्वांनीच या लेखक,वाचक प्रकाशक यांनी या नव्यामाध्यमाची ओळख करून घेणे अत्यावश्यक झाले आहे.


असा वळतोय वाचकवर्गवाचन करणे म्हणजे वाचकाला तशी बैठक असावी लागते.म्हणजे फेसबुकसारखेअपडेटस नुसते पाहणे नव्हे.पुस्तकाच्या भावविश्वात प्रवेश करताना बाकीच्याजगाचा विसर पाडत तल्लीन होउन वाचावे लागते.काहीजण एका बैठकीत पुस्तकसंपविणारे आहेत.त्यामुळे साहित्याचा वाचकवर्ग काहीशा प्रमाणात कमी झालाहोता.परंतु परिस्थीती वेगाने बदलत आहे.सतत संगणक आणि मोबाईल्सचा वापर वाढत असल्याने अनेकजण परत वाचनाकडे वळुलागले आहेत.त्यांना पुस्तकाची हार्डकॉपीपेक्षा सॉफ्टकॉपीवाचणे सोयीस्कर वाटु लागले आहे.

लेखकांनी त्यांचे पुस्तक केवळ ई-मेलवर पाठविले की पुस्तक आठवडाभरातपुस्तक प्रकाशीत होते.साहित्यचिंतने लेखकापुढे पुस्तक विक्रीसाठी पन्नास टक्के कमिशनने ई-बुकविक्रीस ठेवणे किंवा मोफत प्रकाशीत करणे हे दोन पर्याय ठेवले आहेत.मोफत पुस्तक दिल्यास ते जास्तीत जास्त वाचकापर्यंत पोहोचु शकते त्यातुनलेखकाला चांगली प्रसिध्दी मिळु शकते.त्यामुळे आगामी काळात ई-बुक हीसंकल्पना चांगलीच रूजत आहे.

Featured Post

मेकॉलची शिक्षणपध्दती किती दिवस व्यवस्थेने पचवायची ?

आठवीच्या वर्गावर भूमितीचा तास चालू होता. प्रमेय समजावून सांगणारे शिक्षक असे मानू या समजू असे सांगून प्रमेयाची सिध्दता समजावून सांगत होते....