1) दहशतवाद्यांंची स्थानिक मदत पूर्ण तोडून टाकणे
370 चे कलम हे काश्मीरचे वैशिष्टये जपण्यासाठी आहे. पण अनेकदा स्थानिक लोकच दहशतवाद्यांंना मदत करतात. स्थानिक लोकांंचा दावा आहे की रोजगार आणि इतर सुविधा सरकार देत नाही. स्थानिक लोकांंमधूनच आजवर कट्टर दहशतवादी झाले आहेत.
असे असताना काश्मीरच्या संंरक्षणासाठी अख्खा भारत रक्तबंंबाळ होतोय.मग त्यावर ठोस उपाय काय?
2) प्रत्येक काश्मीरी घरातील व्यक्तीला सैन्यात नोकरी देणे. हा नियम सक्तीने लागू करावा. यामुळे काय घडेल?
रोजगाराची समस्या सुटेल. दहशतवाद्यांंना मदत केल्यास आपल्याच घरातील व्यक्ती मरेल,ही भीती असल्याने सैन्याला सहकार्य होईल.
3) गुप्तचर विभागाचा राजकीय वापर थांबविणे
जर इंटेल ब्युरो अथवा सीबीआयसारख्या गुप्तचर संस्था राजकीय नेत्यांचे फोन टेप करण्यासाठी गुंग असेल तर यावेळेचा गैरफायदा दहशतवादी घेण्याची शक्यता असते. पुलावामा हल्ल्यापूर्वी गुप्तचरांनी अलर्ट देऊनही डोळेझाक झाली. असे होवू नये याकरिता पर्यायी अंमलजावणी यंत्रणा तयार करायला हवी.
विकास आणि रोजगार निर्माण झाल्यास काश्मीर नंंदनवन कायस्वरुपी होईल.
4) फुटीरतावादी नेत्यांना सीमेनजीक घरात राहणे बंधनकारक करावे. जर पाकिस्तानने शस्त्रसंधी मोडल्यानंतर त्यांच्या घरावर तोफगोळे आणि गोळीबार केला तर फुटीरतावादी नेत्यांच्या समर्थकांना हे Live प्रक्षेपण दाखवावे.
5) पाकिस्तानची मुख्य आर्थिक रसद ही चीन पुरविते. चीनची व्यापारी कोंडी करायला हवी. त्याशिवाय चीन वठणीवर येणार नाही.