Monday, November 7, 2016

सत्यम् तथा साहसमेव जयते

सत्याचा काळच राहीला नाही. सत्यमेव जयते हे सगळ खोट असे म्हणुन
एक मित्र चांगलाच जळफळाट करत होता. दुसरा एकाने
अरे मी खरयाने वागायचे सोडून दिले तेव्हापासून त्रास  कमी झाला. असा अनुभव सांगीतला. सत्याच्या मार्गाने चालणारा त्रास सहन करेल. परंतू विजय त्याचाच असणार आहे. सत्य परेशान होता है लेकीन पराभूत होता नही. समोरचा कितीही असत्याने वागला.तर सत्याची कास सोडू नका. तुम्हाला खूप उर्जा मिळेल. संयम संपला की साहस दाखवा ते सत्याच्या मार्गाने.त्यामुळे केवळ सत्य आहे आणि साहस नाही असे जर असेल तर ते अर्थहीन आहे. कारण संयमपणा सोडल्यामुळेच असत्याकडे तुमचा प्रवास सुरू झालेला असतो. त्यामुळे आपल्या आयुष्यात जीवापेक्षा अनमोल मिळवा. तेच अंतीम सत्य आहे.

No comments:

Featured Post

मेकॉलची शिक्षणपध्दती किती दिवस व्यवस्थेने पचवायची ?

आठवीच्या वर्गावर भूमितीचा तास चालू होता. प्रमेय समजावून सांगणारे शिक्षक असे मानू या समजू असे सांगून प्रमेयाची सिध्दता समजावून सांगत होते....