Saturday, May 18, 2019

नथुराम गोडसेला देशभक्त ठरविणे का फायद्याचे आहे?

1) नथूराम गोडसे या माथेफिरुने महात्मा गांधींचा खून नव्हे वध केल्याचे ठरविणे सोपे जाते. वध हा दुष्टांचा असतो. त्यामुळे महात्मा गांधी यांना खलनायक ठरवून त्यांच्या विचार प्रसाराला आळा घालता येतो.
2) नथुराम हा हिंदुराष्ट्रासाठी काहीही करू शकतो, तेव्हा असा आदर्श तरुणांसमोर ठेवून
बुद्धीभ्रम करणे त्यांना भडकविणे सोपे जाते.
3) बुद्धी अथवा संवादाहून हिंसाचार योग्य आहे, हे एकदा मनात व बुद्धीत बिंबवल्यास अशा व्यक्तींना कठपुतळीसारखे आॅपरेट करणे सोपे जाते.
4) महात्मा गांधींचे अथवा इतर महापुरुषांचे विचार तरुणाईला कळाल्यास ते स्वतंत्र विचार करण्याची भीती असते. त्यामुळे जो इतिहास आहे तो खोटा असे सांगुन मनाच्या कथा जोडता येतात.

No comments:

Featured Post

मेकॉलची शिक्षणपध्दती किती दिवस व्यवस्थेने पचवायची ?

आठवीच्या वर्गावर भूमितीचा तास चालू होता. प्रमेय समजावून सांगणारे शिक्षक असे मानू या समजू असे सांगून प्रमेयाची सिध्दता समजावून सांगत होते....