Tuesday, December 12, 2023

दिशा सालियन मृत्यूची एसआयटी चौकशी म्हणजे सूडाचं राजकारण?


शिवसेनेत एकनाथ शिंदे यांची बंडखोरी झाल्यानंतर ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यातील वाद संपत नसताना  आता एसआयटीचा फार्स ठाकरे कुटुंबा भोवतीच आवळला जाणार आहे, असे राज्यातले चित्र आहे.  कारण अभिनेता सुशांतसिंग राजपूतची टॅलेंट मॅनेजर दिशा सालियनच्या मृत्यूची एसआयटी चौकशी करण्याचे राज्य सरकारने पोलिसांना आदेश दिले आहेत. त्यानंतर राज्य सरकारने तत्काळ राजेश जैन या अधिकाऱ्याची एसआयटी चौकशी करण्यासाठी अधिकारी म्हणून नेमणूक केली आहे.

दिशाची आत्मत्या हा खून की आत्महत्या? 

दिशा मृत्यू प्रकरणाची एसआयटी चौकशी म्हणजे केवळ राजकारण की योग्य न्याय देण्याचा प्रयत्न?
 मृत्यू प्रकरणाच्या चौकशीनंतर सुशांत सिंगच्या आत्महत्येबाबत धागेदोरे मिळणार का?
हे सगळे प्रश्न आज पुन्हा नव्याने उपस्थित होत आहेत.

  गेली दोन दिवस हिवाळी अधिवेशन चालू असताना एस आयटीचे आदेश देण्याची चर्चा सुरू होती
गेली दोन दिवस दिशा मृत्यू प्रकरणी एसआयटी चौकशी होणार असल्याची माहिती समोर येत होती. आज यावर शिक्का मोर्तब झालं आहे.
मागील विधिमंडळाच्या अधिवेशनात गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिशा  मृत्यूप्रकरणी एसआयटी चौकशी करणार असल्याचे जाहीर केले होते. परंतु त्या संदर्भात कोणतीही कारवाई करण्यात आली नव्हती. राज्याचे शिक्षण मंत्री तथा शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी दिशा प्रकरणाची एसआयटी चौकशी करण्यात चौकशी करणार असल्याचे 11 डिसेंबरला सांगितले होते. त्याला अनुसरूनच आज राज्य सरकारने पोलिसांना एसआयटी चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
कोण होती दिशा सालियान?
 आजही  अभिनेता सुशांत सिंगच्या मृत्यूनंतर काय झालं याची ठोस माहिती उपलब्ध नाही. त्याचप्रमाणे सुशांत सिंगची टॅलेंट मॅनेजर असलेली दिशाच्या मृत्यूबाबतही ठोस माहिती उपलब्ध नाही.जसं सुशांत सिंगच्या मृत्यूनंतर भाजपाकडून तत्कालीन  महाविकास आघाडीवर आरोप झाले त्याचप्रमाणे दिशाच्या मृत्यूनंतर सरकारवर आरोप झाले. फरक एवढाच होता दिशाच्या मृत्यू प्रकरणावर थेट आदित्य ठाकरे यांच्यावर आरोप करण्यात आले. 

दिशा सालीन  मृत्यू प्रकरणी मुंबई पोलिसांनी क्लोजर रिपोर्ट सादर करत हे प्रकरण गुंडाळलं होतं. मात्र एसआयटी चौकशीनंतर पुन्हा एकदा आदित्य ठाकरे अडचणीत सापडणार आहेत.यापूर्वी
 मुंबई पोलिसांच्या चौकशीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. कारण दिशाच्या मृत्यूनंतर दोन दिवसांनी शवविच्छेदन करण्यात आलं होतं. भाजपा आमदार नितेश राणे यांनी यापूर्वी अनेक वेळा दिशा  मृत्यू प्रकरणात आदित्य ठाकरे तुरुंगात जाणार अशी वक्तव्य केली होती. मृत्यू प्रकरणात थेट आदित्य ठाकरे यांचे नाव घेण्यात आले होते. मात्र  आजवर त्याबाबत कधीही कुठलाही पुरावा समोर आलेला नाही. सुशांत सिंग मृत्यू प्रकरणात रिया चक्रवर्ती चे नावही आदित्य ठाकरेंशी जोडण्यात आले होते. यावर याच्या रियानं स्पष्टपणे  आदित्य ठाकरे यांना ओळखत नसल्याचेही सांगितले होते.

यानिमित्ताने प्रश्न उपस्थित होतो की दिशाच्या मृत्यूचं राजकारण केलं जात आहे की खरंच न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला जातो?
 दिशाच्या कुटुंबियांनी काही तक्रार नसल्याचे यापूर्वी माध्यमांशी सांगितले होते. मग कोणाच्या तक्रारीवर एसआयटी चौकशी केली जाते, हा प्रश्न उपस्थित होत आहे? 

ठाकरे गटाच्या नेत्यांनी दिशा  प्रकरणाची चौकशी करणे म्हणजे केवळ विरोधी पक्षांना त्रास देण्याचा उद्देश असल्याचा आरोप केला आहे.  एवढेच नव्हे तर ठाकरे गटाचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी न्यायमूर्ती लोया यांच्या मृत्यूप्रकरणीही एसआयटी चौकशी करावी, अशी मागणी केली आहे.

कोणत्याही भ्रष्टाचाराची चौकशी असो किंवा एखाद्या गुन्हेगारी प्रकरणीचे चौकशी असो यामध्ये  कुरघोडींचे राजकारण केले जात आहे. याचा अर्थ सर्व प्रशासकीय व कायदा सुव्यवस्थेची यंत्रणा फक्त सत्ताधारी आणि विरोध यांच्यातील डावपेचासाठी वापरली जाते आहे का? जर राजकीय नेते आपापसांमध्ये टीका करून लोकांचे मनोरंजन करत असताना त्यांच्यावर टॅक्स लावावा का? सगळ्यात महत्त्वाचं या राजकीय कुरघोडीमुळं जनतेचे मुख्य प्रश्न बाजूलाच राहतात आणि सर्वांचे लक्ष अनावश्यक मुद्द्याकडं जाऊन सर्व यंत्रणाच वेठीला धरली जाते, याला जबाबदार कोण? 


No comments:

Featured Post

मेकॉलची शिक्षणपध्दती किती दिवस व्यवस्थेने पचवायची ?

आठवीच्या वर्गावर भूमितीचा तास चालू होता. प्रमेय समजावून सांगणारे शिक्षक असे मानू या समजू असे सांगून प्रमेयाची सिध्दता समजावून सांगत होते....