Sunday, January 24, 2016

सुभाषचंद्र बोस यांच्या मृत्युचे गुढ उकलले पण..

सुभाषचंद्र बोस यांच्या मृत्युचे गुढ उकलले पण... नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याशी संबंधित १०० गोपनीय फाईल्स त्यांच्या जयंतीदिनी म्हणजे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते खुल्या करण्यात आल्या आहेत. यामुळे इतिहाससंशोधकांना नेताजींच्या अंतिम दिनांसंदर्भातील गुढ उकलण्यास सहाय्य होईल अशी आशा आहे. नेताजींसदर्भात उपलब्ध असलेला समग्र सरकारी दस्तावेज डिजिटल स्वरुपात संग्रहित करण्यात आला आहे. हा दस्तावेज खुला करावा अशी मागणी नेताजींचे वारस तसेच सर्वसामान्य भारतीय अनेक काळापासून करत होते. गेल्या वर्षी १४ ऑक्टोबरला नेताजींच्या कुटुंबियांनी पंतप्रधानांची त्यांच्या नवी दिल्लीतील निवासस्थानी नेताजींच्या कन्या अनिता बोस यांनी आपल्या वडिलांचा विमान अपघातात मृत्यू झाला असण्याची पूर्ण शक्यता आहे; परंतु आणखी काही पुरावे समोर आल्यास आपण खुल्या मनाने हे स्वीकारण्यास तयार आहोत,अशी भावना व्यक्त केली आहे. एका मुलाखतीत त्यांनी सांगितले की, नेताजींशी संबंधित या फाईल्स सार्वजनिक झाल्याने आणखी काही तथ्य समोर येण्याची शक्यता नाही. याऐवजी भारत सरकारने जपान सरकारच्या मदतीने रिनकोजी मंदिरात ठेवण्यात आलेल्या त्यांच्या अस्थींची डीएनए चाचणी करून घ्यावी म्हणजे या संपूर्ण वादावर पडदा पडेल. १९९७ साली अभिलेखागाराला आझाद हिंद सेनेशी संबंधित ९९० फाईल्स संरक्षण मंत्रालयाकडून मिळाल्या होत्या. त्यानंतर २०१२ मध्ये गृहमंत्रालयाने नेताजींच्या मृत्यूची चौकशी करणाऱ्या खोसला आयोगाच्या १०३० फाईल्स व दस्तावेज तसेच मुखर्जी आयोगाच्या ७५० फाईल्स आणि दस्तावेज सोपविले होते. हे दस्तावेज यापूर्वीच जाहीर झाले आहेत.फाईल्स सार्वजनिक करण्याच्या पंतप्रधानांच्या घोषणेनंतर गृह आणि विदेश मंत्रालयानेही त्यांच्याजवळील फाईल्स सार्वजनिक करण्याची प्रक्रिया सुरू करून त्या अभिलेखागाराच्या सुपूर्द केल्या होत्या. सुरुवातीला १०० फाईल्स सार्वजनिक करण्यात येणार असून त्यांचे डिजिटलीकरण केले आहे. या फाईल्स चांगल्या पद्धतीने सांभाळण्यात आल्या असून अभिलेखागाराने दर महिन्याला २५ फाईल्सच्या डिजिटल प्रती लोकांना उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. सुभाषचंद्र बोस यांचा मॄत्यु झाला असताना सरकारने याबाबबतची कागदपत्रे आजपर्यंत खुली का केली नव्हती? सुभाषचंद्र बोस हे जर्मनी व रशिया या देशातील राष्ट्रप्रमुखांची भारत स्वतंत्र होण्यासाठी मदत घेत असल्यामुळेच नेहरूंनी जाणिवपुर्वक बोस यांचे कार्य अडगळीत टाकण्याची शक्यता नाकारता येत नाही. एक गुमनामीबाबा हेच सुभाषचंद्र बोस आहेत अशी चर्चा सुरू झाल्यापासून सरकारची बदनामी झाली होती. स्वतः महात्मा गांधी यांनी जवाहरलाल नेहरूपेक्षा बोस यांना पंतप्रधान म्हणुन संधी दिली असती तर पाकिस्तानसारखे देशाला लागलेले दुखणे कदाचीत पहायला मिळले नसते. तसेच अत्यंत बुध्दीमान आणि त्यागी जीवन असणा-या सुभाषचंद्र बोस हे पंतप्रधान झाले असते तर देशाचे चित्र बरेचसे पालटले असते असा सर्वसाधारणपणे अंदाज केला जातो. जरी ते पंतप्रधान मिळवू शकले नाहीत तरी सर्वसामान्य जनतेच्या ह्रदयात कायम विराजमान आहेत. सत्याग्रह आणि क्रांती या स्वांत्र्यप्राप्तीच्या दोन मार्गात बोस यांनी क्रांतीचा मार्ग स्वीकारला . पण राजकारणामुळे क्रांतीचा मार्ग आणि त्यासाठी लढणारे वीर यांना कायमच दुय्यम लेखले गेले आहे. सुभाषबाबू अश्या हजारो क्रांतीकारकांचे मुकुटमणीच !

Sunday, January 10, 2016

दहशतवादाला अंतीम उत्तर काय असू शकते ?

लव्ह सिटी पॅरीसवर इसिसच्या दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर एका नागरिकाची पत्नी मरण पावली. या घटनेनंतर त्या नागरिकांनी आपल्या मुलांचे संगोपन आणि दिनचर्या दुस-या दिवसापासून जशी होती तशीच चालू ठेवली आणि अतिरेक्यांना प्रसिध्दीमाध्यमातून संदेश दिला. तुम्ही माझी प्रिय व्यक्ती हिरावून घेतली. पण माझा तुमच्यावर राग नाही. आजही माझे आयुष्य तुमच्या धाकात नाहीतर माझ्या मर्जीने चालू आहे. स्वातंत्र्य , समता , बंधुत्वाचा जगाला संदेश देणारा फ्रान्स देश किती प्रखर देशभक्त आणि सशक्त आहे हे याचे बोलके उदाहरण होय. नुकताच पठाणकोट येथील हल्ल्यात निष्पाप नागरिक मरण पावले आहेत. भारतात केवळ पाच-सहा अतिरेकी येतात आणि देशाच्या लोकशाही आणि धर्माच्या नावाखाली एकतेलाच सुरूंग लावण्याचा प्रयत्न करत आहेत. हे चित्र मानवतेला कलंक लावणारे आहे. मुळात पाकिस्तानबरोबर सलोख्याचे संबंध तयार होताना अतिरेक्यांना भारतात हल्ले करण्याचा चेव येण्यामागे मानसशास्त्र काय आहे? कुणीही काहीही म्हणो दहशतवाद हे प्रथम लोकमानसिकतेच्या आधारावरच जास्त खेळले जाते. त्याचे असे आहे की सर्वसामान्यांच्या भावनांना धक्का बसला आणि अस्थिरता, अनिश्चितता निर्माण झाली की दहशतवाद्यांची मोहीम फत्ते होते. जागतीक पातळीवर असणा-या इसिसने भारताविरूध्दही युध्द पुकारले आहे. सगळेच देश दहशतवादाने होरपळून निघत असताना दहशतवादाला अंतीम उत्तर म्हणजे त्यांच्या भीतीला कसलीच भीक न घालणे. हिंदु-मुस्लीममध्ये दरी निर्माण करणे हे त्यांचे ध्येय आहे. दुसरे म्हणजे कधीही आम्ही कुठेही हल्ले करू शकतो हे दाखवून त्यांना आपले सामर्थ्य असल्याचा भ्रम तयार होतो. सध्या इसिसपाठीमागे कोणता देश कोणता विचार आहे यापेक्षा कोणत्या परिस्थितीतून हा दहशतवाद जन्माला आलाय याचा विचार केला तर इसिस काय हे कळू शकते. तेल इंधनच्या विहिरी आणि युरोपीराष्ट्रांचे युध्द आसुरी महत्वांकाक्षा आणि धर्माचा बुरखा घातला तर कुत्र्याचाही वाघ होतो हे इसिसने दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. १) दहशतवादी तयार होतात. यामागे त्यांचा ब्रेनवॉश केला जातो. अशा पध्दतीचा अभ्यास करून त्याला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी मानसशास्त्राचा सखोल अभ्यास केला पाहिजे. २) दहशतवाद हा मुस्लीमविरोधी असून त्याला समर्थन देणा-या विद्वान मौलाना, मुस्लीम विचारवंत आणि सुधारणावादी विचारवंत, महिला यांना प्रोत्साहन द्यायला हवे. ३) दहशतवादाचे तरूणामध्ये आकर्षण असून यामुळे आयुष्य कसे उध्दवस्त होते हे युवकापर्यंत थेट पोहोचवायला हवे. ४) जे युवक अत्यंत क्रियाशील परंतू भावुक आहेत त्यांचा ओढा दहशतवादाकडे असू शकतो अशा सुशिक्षीत तरूणांची शक्ती नवनिर्मीतीकडे वळवायला हवी. उदाहरणार्थ मुस्लीमबांधवात गरीबीमुळे अनेकांना उच्च शिक्षण घेणे शक्य होत नाही. त्यांना शिकविण्यासाठी असे युवक चांगले योगदान देवू शकतात. ५) समाजात गुन्हेगारी कडे वळलेला, गरीबीमुळे त्रस्त असा युवकवर्गाला दहशतवाद हे सोपे कमविण्याचे साधन वाटू शकते, अशी वेळच येवू नये म्हणुन शासनाने त्यांना सक्तिने स्वच्छता व तत्सम सेवेस लावून अन्न, वस्त्र द्यायला हवे. दहशतवादाचा सामान्यावर कसलाच परिणाम होवू न देणे हेच अंतीम उदाहरण आहे.

Saturday, January 2, 2016

मेकॉलची शिक्षणपध्दती किती दिवस व्यवस्थेने पचवायची ?

आठवीच्या वर्गावर भूमितीचा तास चालू होता. प्रमेय समजावून सांगणारे शिक्षक असे मानू या समजू असे सांगून प्रमेयाची सिध्दता समजावून सांगत होते. पण मला काही मानू या हॉ गोष्ट समजलीच नाही. मी याबद्दल गणिताच्या त्या आदर्श ( ?) शिक्षकांना का मानायचे असा प्रश्न नम्रपणे विचारला. पण सरांचा इगो भलताच दुखावला आणि त्यांनी पाणउतारा केला. खरेतर गणीताचा विषय आवडीचा आहे. पण गणीतासारखा विषय मानू या समजू या पध्दतीने शिकावा लागत असेल तर त्यासारखे दुर्दैव विद्यार्थ्यांचे नाही. बुध्दी गहाण ठेवून का शिकावे एखादी गोष्ट का शिकत आहोत , त्याचा उपयोग कुठे होणार आहे याची माहिती कधीच दिली जात नाही. परिक्षेत पास होण्यासाठी व अधिक मार्क्स मिळविण्यासाठी परिक्षेचे तंत्र शिकूनच घ्यावे लागते. सध्याची शिक्षणपध्दतीमधून किती पॅकेज घेणारे युवक व रोजगार निर्माण होतात हीच गोष्ट समाज, पालक व विद्यार्थ्यासाठी महत्वाची आहे. या गोष्टींनाही महत्व आहे. पण विद्यार्थ्यामध्ये असणारी नैसर्गीक बुध्दीमत्ता मारून टाकणारी शिक्षणपध्दत पाहिली की मेकॉलेने रचलेली ही शिक्षणव्यवस्था किती विषारी आहे हे समजते. उदाहरणार्थ मला लिहण्याची आवड असून या शिक्षणव्यवस्थेने सुरूवातीपासूनच संधी दिली असती तर तळमळीने योग्य क्षेत्र निवडले असते. इच्छा असूनही तुम्हाला शिकता येत नाही व इच्छा असूनही शिकता येत नाही ही शिक्षणपध्दती मेकॉलेची ! भारतीय नागरीक लॉर्ड मेकॉलेने केवळ इंग्रजांची राजवट मजबूत करण्यासाठी केवळ क्लार्क तयार व्हावेत यासाठी जी शिक्षणपध्दत राबविली ती म्हणजे मेकॉले शिक्षणपध्दती. आजही आपण त्याच मेकॉले शिक्षणव्यवस्थेने शिक्षण घेतो. यामध्ये केवळ पाठांतर आणि त्यावर आधारीत परिक्षा यावरच भर असतो. मेकॉले शिक्षणपध्दतीचा सर्वाधिक फटका अत्यंत हूशार विद्यार्थ्यांना अधिक बसतो. बुध्दीमत्तेचे आठप्रकार आहेत. या शिक्षणपध्दतीत उद्योजकता, नेतृत्वगुण, देशप्रेम, आवड्त्या विषयाचे सखोल ज्ञान घेण्याची बालपणापासून मुभा या गोष्टींना का टाळले आहे ? मेकॉले ही शिक्षणपध्दती आजच्या काळात केवळ धनाढ्य उद्योजक, बडे नेते, राजकीय पक्ष यांच्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. कारण मेंढरासारखी केवळ एकमेकांचे अनुकरण करणारी व बुध्दी गहाण ठेवणारे युवावर्ग त्यांना हवाहवासा आहे. पिढ्यानपिढ्या बुध्दीगहाण ठेवून अशास्त्रीय पध्दतीने घेत असलेले शिक्षण म्हणजे ओझे वाहणे आहे. मेकॉलेची शिक्षणपध्दती किती दिवस समाजाने पचवायची हा प्रश्न खुप गंभीर आहे.

Featured Post

मेकॉलची शिक्षणपध्दती किती दिवस व्यवस्थेने पचवायची ?

आठवीच्या वर्गावर भूमितीचा तास चालू होता. प्रमेय समजावून सांगणारे शिक्षक असे मानू या समजू असे सांगून प्रमेयाची सिध्दता समजावून सांगत होते....