Sunday, January 24, 2016

सुभाषचंद्र बोस यांच्या मृत्युचे गुढ उकलले पण..

सुभाषचंद्र बोस यांच्या मृत्युचे गुढ उकलले पण... नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याशी संबंधित १०० गोपनीय फाईल्स त्यांच्या जयंतीदिनी म्हणजे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते खुल्या करण्यात आल्या आहेत. यामुळे इतिहाससंशोधकांना नेताजींच्या अंतिम दिनांसंदर्भातील गुढ उकलण्यास सहाय्य होईल अशी आशा आहे. नेताजींसदर्भात उपलब्ध असलेला समग्र सरकारी दस्तावेज डिजिटल स्वरुपात संग्रहित करण्यात आला आहे. हा दस्तावेज खुला करावा अशी मागणी नेताजींचे वारस तसेच सर्वसामान्य भारतीय अनेक काळापासून करत होते. गेल्या वर्षी १४ ऑक्टोबरला नेताजींच्या कुटुंबियांनी पंतप्रधानांची त्यांच्या नवी दिल्लीतील निवासस्थानी नेताजींच्या कन्या अनिता बोस यांनी आपल्या वडिलांचा विमान अपघातात मृत्यू झाला असण्याची पूर्ण शक्यता आहे; परंतु आणखी काही पुरावे समोर आल्यास आपण खुल्या मनाने हे स्वीकारण्यास तयार आहोत,अशी भावना व्यक्त केली आहे. एका मुलाखतीत त्यांनी सांगितले की, नेताजींशी संबंधित या फाईल्स सार्वजनिक झाल्याने आणखी काही तथ्य समोर येण्याची शक्यता नाही. याऐवजी भारत सरकारने जपान सरकारच्या मदतीने रिनकोजी मंदिरात ठेवण्यात आलेल्या त्यांच्या अस्थींची डीएनए चाचणी करून घ्यावी म्हणजे या संपूर्ण वादावर पडदा पडेल. १९९७ साली अभिलेखागाराला आझाद हिंद सेनेशी संबंधित ९९० फाईल्स संरक्षण मंत्रालयाकडून मिळाल्या होत्या. त्यानंतर २०१२ मध्ये गृहमंत्रालयाने नेताजींच्या मृत्यूची चौकशी करणाऱ्या खोसला आयोगाच्या १०३० फाईल्स व दस्तावेज तसेच मुखर्जी आयोगाच्या ७५० फाईल्स आणि दस्तावेज सोपविले होते. हे दस्तावेज यापूर्वीच जाहीर झाले आहेत.फाईल्स सार्वजनिक करण्याच्या पंतप्रधानांच्या घोषणेनंतर गृह आणि विदेश मंत्रालयानेही त्यांच्याजवळील फाईल्स सार्वजनिक करण्याची प्रक्रिया सुरू करून त्या अभिलेखागाराच्या सुपूर्द केल्या होत्या. सुरुवातीला १०० फाईल्स सार्वजनिक करण्यात येणार असून त्यांचे डिजिटलीकरण केले आहे. या फाईल्स चांगल्या पद्धतीने सांभाळण्यात आल्या असून अभिलेखागाराने दर महिन्याला २५ फाईल्सच्या डिजिटल प्रती लोकांना उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. सुभाषचंद्र बोस यांचा मॄत्यु झाला असताना सरकारने याबाबबतची कागदपत्रे आजपर्यंत खुली का केली नव्हती? सुभाषचंद्र बोस हे जर्मनी व रशिया या देशातील राष्ट्रप्रमुखांची भारत स्वतंत्र होण्यासाठी मदत घेत असल्यामुळेच नेहरूंनी जाणिवपुर्वक बोस यांचे कार्य अडगळीत टाकण्याची शक्यता नाकारता येत नाही. एक गुमनामीबाबा हेच सुभाषचंद्र बोस आहेत अशी चर्चा सुरू झाल्यापासून सरकारची बदनामी झाली होती. स्वतः महात्मा गांधी यांनी जवाहरलाल नेहरूपेक्षा बोस यांना पंतप्रधान म्हणुन संधी दिली असती तर पाकिस्तानसारखे देशाला लागलेले दुखणे कदाचीत पहायला मिळले नसते. तसेच अत्यंत बुध्दीमान आणि त्यागी जीवन असणा-या सुभाषचंद्र बोस हे पंतप्रधान झाले असते तर देशाचे चित्र बरेचसे पालटले असते असा सर्वसाधारणपणे अंदाज केला जातो. जरी ते पंतप्रधान मिळवू शकले नाहीत तरी सर्वसामान्य जनतेच्या ह्रदयात कायम विराजमान आहेत. सत्याग्रह आणि क्रांती या स्वांत्र्यप्राप्तीच्या दोन मार्गात बोस यांनी क्रांतीचा मार्ग स्वीकारला . पण राजकारणामुळे क्रांतीचा मार्ग आणि त्यासाठी लढणारे वीर यांना कायमच दुय्यम लेखले गेले आहे. सुभाषबाबू अश्या हजारो क्रांतीकारकांचे मुकुटमणीच !

No comments:

Featured Post

मेकॉलची शिक्षणपध्दती किती दिवस व्यवस्थेने पचवायची ?

आठवीच्या वर्गावर भूमितीचा तास चालू होता. प्रमेय समजावून सांगणारे शिक्षक असे मानू या समजू असे सांगून प्रमेयाची सिध्दता समजावून सांगत होते....