उडता पंजाब...
सामाजिक प्रश्नाला हात घालीत मनोरंजनाची फोडणी टाकून वास्तवाचे चटके देणारे चित्रपट काढणे ही दिग्दर्शक अनुराग कश्यपची आजपर्यंतची खासियत राहिलेली आहे. उडता पंजाबवर सेन्सॉरबोर्डाच्या वादग्रस्त निर्णयामुळे वाद निर्माण झाला.
पण यामुळे खरेतर चित्रपटाचा मुळविषय दुर्लक्षित राहू शकतो. म्हणुन याविषयी थोडेसे ....
देशाच्या विकासात विशेषतः सैन्यदलातील वरिष्ठ अधिकारी व सैनिकामध्ये पंजाबमधील तरूण सर्वाधिक संख्येत सहभागी होतात. याशिवाय ख-या अर्थाने पंजाब म्हणजे भारताचे बलदंड बाहूच आहेत. अशा परिस्थितीत एकाकी पंजाब व हरियाणा या राज्यामध्ये ड्र्ग्जमध्ये तरूणाई स्वतःचा नाश करू लागलेली आहे. हे कसे घडले ?
प्रथम लक्षात घ्यावे लागेल, पंजाब हे पाकिस्तानच्या सीमेशी लागून असलेले राज्य असून पंजाबमधील आएएसआएने नेहमीच खलिस्तानसारख्या विषाला खतपाणी घालण्याचे काम केलेले आहे. याच आयएसएने दाऊदशी हातमिळवणी करून त्याचे नेटवर्क वापरून भारतात अतिरेकी कारवाया चालू ठेवल्या आहेत. भारताचे सामर्थ्य लक्षात घेता पाकिस्तान सरळ सरळ लढण्यापेक्षा तरूणाईला पोखरून काढण्यासाठी पंजाब व हरियाणामध्ये ड्रग्ज माफियांनी चांगलेच हात पसरविले आहेत. जिथे अमाप पैसा तिथे राजकीय पक्षाच्या नेत्यांनीही सोयीस्कर दुर्लक्ष केल्यामुळे पंजाब व हरियाणामध्ये ड्रग्जचे प्रमाण प्रचंड वाढलेले आहे. याकडे स्थानिक राजकीय पक्षाचे दोन्ही राष्ट्रीय पक्षाने सत्तेसाठी लाड केलेले आहेत. यामुळे नाशाकडे जाणारी तरूणाई स्वतःचे आयुष्य कापरासारखे उडवत आहेत, पर्यायाने उडता पंजाबचे भविष्यही अंधातरीच राहिलेले आहे. अभिव्यक्तीस्वातंत्र्याची गळचेपी करत तर कधी पदमश्री , साहित्यिक पुरस्कार किंवा मंडळ, समित्यावर नियुक्ती देवून विषय झाकण्याचे दिवस आता सरलेत. कारण तरूणाईलाही उडत्या पंजाबाची चांगलीच कळू लागली आहे. असे चित्रपट येतात तेव्हा समाधान वाटते. कोणीतरी जिवंत आहे बॉलीवूडमध्ये ज्याला तरूणाईची भाषा कळते व समाजाचे प्रश्न आहे. दिगदर्शक अनुराग कश्यप यांच्या बंडखोरीला सलाम......
सामाजिक प्रश्नाला हात घालीत मनोरंजनाची फोडणी टाकून वास्तवाचे चटके देणारे चित्रपट काढणे ही दिग्दर्शक अनुराग कश्यपची आजपर्यंतची खासियत राहिलेली आहे. उडता पंजाबवर सेन्सॉरबोर्डाच्या वादग्रस्त निर्णयामुळे वाद निर्माण झाला.
पण यामुळे खरेतर चित्रपटाचा मुळविषय दुर्लक्षित राहू शकतो. म्हणुन याविषयी थोडेसे ....
देशाच्या विकासात विशेषतः सैन्यदलातील वरिष्ठ अधिकारी व सैनिकामध्ये पंजाबमधील तरूण सर्वाधिक संख्येत सहभागी होतात. याशिवाय ख-या अर्थाने पंजाब म्हणजे भारताचे बलदंड बाहूच आहेत. अशा परिस्थितीत एकाकी पंजाब व हरियाणा या राज्यामध्ये ड्र्ग्जमध्ये तरूणाई स्वतःचा नाश करू लागलेली आहे. हे कसे घडले ?
प्रथम लक्षात घ्यावे लागेल, पंजाब हे पाकिस्तानच्या सीमेशी लागून असलेले राज्य असून पंजाबमधील आएएसआएने नेहमीच खलिस्तानसारख्या विषाला खतपाणी घालण्याचे काम केलेले आहे. याच आयएसएने दाऊदशी हातमिळवणी करून त्याचे नेटवर्क वापरून भारतात अतिरेकी कारवाया चालू ठेवल्या आहेत. भारताचे सामर्थ्य लक्षात घेता पाकिस्तान सरळ सरळ लढण्यापेक्षा तरूणाईला पोखरून काढण्यासाठी पंजाब व हरियाणामध्ये ड्रग्ज माफियांनी चांगलेच हात पसरविले आहेत. जिथे अमाप पैसा तिथे राजकीय पक्षाच्या नेत्यांनीही सोयीस्कर दुर्लक्ष केल्यामुळे पंजाब व हरियाणामध्ये ड्रग्जचे प्रमाण प्रचंड वाढलेले आहे. याकडे स्थानिक राजकीय पक्षाचे दोन्ही राष्ट्रीय पक्षाने सत्तेसाठी लाड केलेले आहेत. यामुळे नाशाकडे जाणारी तरूणाई स्वतःचे आयुष्य कापरासारखे उडवत आहेत, पर्यायाने उडता पंजाबचे भविष्यही अंधातरीच राहिलेले आहे. अभिव्यक्तीस्वातंत्र्याची गळचेपी करत तर कधी पदमश्री , साहित्यिक पुरस्कार किंवा मंडळ, समित्यावर नियुक्ती देवून विषय झाकण्याचे दिवस आता सरलेत. कारण तरूणाईलाही उडत्या पंजाबाची चांगलीच कळू लागली आहे. असे चित्रपट येतात तेव्हा समाधान वाटते. कोणीतरी जिवंत आहे बॉलीवूडमध्ये ज्याला तरूणाईची भाषा कळते व समाजाचे प्रश्न आहे. दिगदर्शक अनुराग कश्यप यांच्या बंडखोरीला सलाम......
No comments:
Post a Comment