Monday, December 19, 2016

Marathi Journalist Prashant Chavan's Book- Kagadi Kate.

                                                    कवितेतून उलगडणार ‘वृत्तविश्व’
                                               ‘कागदी  काटे’चे येत्या शनिवारी प्रकाशन

बातमीदारातील धावपळ...या धबडग्यात बाजूला पडणारे पत्रकारांचे प्रश्न...त्याचबरोबर पत्रकारितेतील मूल्यांची होत असलेली घसरण...अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरील हल्ले...बाजारू वृत्तीचा शिरकाव अन् पत्रकारितेतील विविध पैलू आता
कवितांमधून उलगडणार आहेत.
‘सहित प्रकाशन’तर्फे प्रकाशित करण्यात येणाऱया कवी आणि पत्रकार प्रशांत चव्हाण यांच्या ‘कागदी काटे’ या काव्यसंग्रहातून वृत्तपत्रसृष्टीतील ही आतील बाजू रसिकांना अनुभवायला मिळणार आहे. चव्हाण यांचा हा पहिलाच काव्यसंग्रह
असून, तो संपूर्णपणे पत्रकारिता विषयाशी संबंधित आहे. याकाव्यसंग्रहामध्ये 50 कवितांचा समावेश आहे. पत्रकारांचे वेतन, भाषाज्ञान, या क्षेत्रात शिरलेल्या अनिष्ट प्रवृत्ती याचे दर्शन चव्हाण यांच्या या कवितांमधून घडणार आहे. यातून
 वृत्तपत्राचे जगच वाचकांसमोर येईल.
या विद्वानांना कधी कळलंच नाही..;
चांगला पत्रकार होण्यासाठी..
आधी चांगला ‘माणूस’ व्हावं लागतं....!
अशा शब्दांत ‘माणूसपण’ अधोरेखित करणारी ही कविता उपहास, विडंबन, अशा अंगाने फुलत जाऊन प्रसंगी काटेरी व बोचरीही झाली आहे. या कवितासंग्रहाचे मुखपृष्ठ प्रसिद्ध छायाचित्रकार संदेश भंडारे यांनी साकारले असून, मलपृष्ठ लेखन अजय कांडर यांनी केले आहे. कवितासंग्रहाचे प्रकाशन येत्या 24 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता पुण्यातील बॅ. नाथ पै. सभागृहात (एस. एम. जोशी फौंडेशन आवार, चवथा मजला, नवी पेठ, 30) ‘तरूण भारत’चे सल्लागार संपादक किरण ठाकुर व 89 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. या वेळी प्रसिद्ध छायाचित्रकार संदेश भंडारे आणि कवी अजय कांडर हेही प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती ‘सहित प्रकाशन’चे संपादक  किशोर शिंदे यांनी दिली.

Saturday, December 17, 2016

सावधान महाराष्ट्राचा बिहार होतोय..



महाराष्ट्र देशा ..कणखर देशा.. अस अभिमानाने म्हटले जाते.  समाजसुधारक तसेच विविध क्षेत्रात महाराष्ट्राने संपुर्ण देशात एक आदर्श घालून दिला आहे.   या पुरोगामी महाराष्ट्राचे तसेच संस्कृती परंपरेचे गोडवे गायले तर आपण कसाही गोंधळ घालायला मोकळे असा समज काही लोकांचा झालाय. विशेष म्हणजे ज्या राजकारणाच्या व्यवस्थेवर राज्याचा गाडा चालतो त्या विधानसभेतील आमदारांनी  व्यवस्थेतील सावळागोंधळ दाखवून दिला आहे.
राज्यातील कार्यक्षम आणि प्रामाणिक अधिका-यांविरुध्द राजकीय नेते सुडाचे राजकारण दाखविण्याची सीमाच ओलांडली आहे.एकतर काही मोजकेच अधिकारी असे आहेत की सत्ताधारी कोणत्याही पक्षाचे असोत त्यांचे काम चोख असते. यामुळे त्यांच्यावर अन्याय झाला तरी विरोधक कशाला साध देतील हे सामान्य नागरिकांनी ओळखलेले आहे.
राज्यात जे मोजके सनदी अधिकारी अत्यंत कडक शिस्तीचे आणि कार्यक्षम आहेत. त्यांना सतत राजकीय रोषाला बळी पडावे लागते. लोकसेवक म्हणुन घेणारे नेते या अधिका-यांना टार्गेट करून नेमकी कुणाची सेवा करू इच्छितात हा प्रश्न सामन्य जनतेला पडला आहे. गुंडगिरी, गुन्हेगार   आणि अल्पशिक्षित नेते आता राजकीय पक्षांनीच हद्दपार करावेत. कारण त्या पक्षांच्या विश्वासहर्तेचाच नव्हे तर भारतीय लोकशाहीवरील विश्वास बेताल नेत्यामुळे उडत चालला आहे.
अमरावती महापालिकेचे आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी प्रधानमंत्री आवास योजनेतील लाभार्थ्यांची यादी दाखविली नाही म्हणुन आमदार सुनील देशमुख यांनी विधानसभेत तक्रार केली. विधिमंडळाच्या विशेषाधिकार भंग यांनी दोषी ठरवले. त्यांना विधिमंडळाच्या सुरक्षा अधिका-यांच्या देखरेखीखाली ठेवावे अशी शिक्षा दिली. एका प्रामाणिक सनदी अधिका-याला अशी शिक्षा दिली जात असताना महाराष्ट्रात उठसुठ चिल्लर विषयावर बोलणारे नेते मात्र आंधळ्या धृतराष्ट्राप्रमाणे गप्पच होते, हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे.
राजकीय नेत्यांनी सुडाचे राजकारण करणे सोडावे.  कार्यक्षम  आणि व्यवस्थेला शिस्त लावणा-या अधिका-याने स्वेच्छानिवृत्ती जाहीर केली आहे. आतातरी शहाणे व्हा.  महाराष्ट्राचा बिहार करायला जाल तर जनता तुम्हाला तुमची जागा दाखवून देईल. कारण मतदार सुज्ञ आहेत. अशा नेत्यांचे मोरल स्ट्राईक करण्यासाठी सामान्यांनी संघटीत होण्याची नितांत आवश्यकता आहे.


Monday, December 12, 2016

अम्मा एक राजकीय शोकांतीका

अम्मा अर्थात जयललिता. एक अभिनेत्री ते मुख्यमंत्री असा प्रवास करणार्या जयललिता यांनी गोरगरीबांची अम्मा ही
प्रतीमा उज्वल करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले. परंतु यामुळे गरीबांची आर्थीक परिस्थीती सुधारली का? त्यांना खरी आवश्यकता होती. रोजगार आणि शिक्षण.  ज्यामुळे ते आत्मनिर्भर होवु शकले असते. कदाचित यामुळे त्यांना लगेच राजकीय लाभ मिळू शकला नसता.
एक स्त्री म्हणुन त्यांना सतत
अपमानकारक वागणुक मिळाली.

आज देशातील परिस्थिती बदलली आहे.

Saturday, December 10, 2016

मोगॅम्बो खुश हुआ

मि.इंडिया मधील मोगॅम्बो आठवतोय का ? एकाधिकारशाहीपणे जगावर सत्ता गाजविणे ज्याचे ध्येय होते. त्यासाठी मी खुश म्हणजे जग खुश अशी मानसीकता निर्माण करणारा मोगॅम्बो हा आजही जिवंत आहे. तो प्रत्येक क्षेत्रात आहे. तो नव्या पिढीला संभ्रमीत करतो. प्रसंगी इमोशनल ब्लॅकमेलींग करतो. नव्या पिढीतील गुण बरोबर हेरुन त्याचा उपयोग करून घेण्यात तरबेज असतात. कमकुवत बाजुबाबत त्यामध्ये न्युनगंड वाढण्यासाठी ते शब्दखेळ करतात. पण हा तुमचा बाॅस नसतो. ज्याला आदर्श मानता तोच खरा आदर्श आहे का ? याचा नक्की विचार करा. यावेळी तुम्ही मनाने कठोर व्हा.

नोटाबंदी नंतर पुढे काय..

पेटीएममध्ये चीनी कंपन्यांनी 40 टक्के पेक्षा अधिक गुंतवणुक केली आहे. हे कळण्यानंतर  भारतीयांची अवस्था आगीतून फुफाट्यात अशीच होत आहे. एकतर चीनी मालांनी भारतीय बाजारपेठेत आधीच धुडगुस घातला आहे. यामुळे लघु उद्योजकांचे प्रचंड नुकसान होत आहे. तरीही सबसे बडा सस्ता मालाचे आकर्षण कमी झाले नाही.
तरी पंतप्रधान नर्रेद्र मोदी यांनी दिवाळीत चीनी फटाके घेवू नये असे आवाहन केले. जनतेने त्याला चांगला प्रतिसाद दिला. आजपर्यंत
दर्जाहीन वस्तु, कमी किंमतीत उपलब्ध करुन ग्राहकांची फसवणुक केली आहे. परंतु चीनी शासन म्हणतेय, गरीब भारतीयांना आमच्यामुळेच स्वस्तात वस्तु घेणे शक्य होते.
चीनी मालाला शह देण्यासाठी काही कल्पना
1आयआयटी ,पाॅलीटेक्नीकमध्ये प्रात्याक्षीक इंजिनिअरींगवर आधारीत शिक्षण द्यावे. यातुनच स्वस्त आणि मस्त उत्पादने
मोठाया प्रमाणात विक्रीला उपलब्ध करुन द्यावीत.

Thursday, December 8, 2016

नोटाबंदीचे कवित्व पुरे आता !

जेमतेम चार हजार रूपये बॅकेत खात्यावर जमा झाले होते. जवळ काहीही पैसे नव्हते. कसाबसा एटीएमच्या लाईन मध्ये नंबर आला. पैसे काढले. हातात दोन हजाराची नोट.. हसाव की रडावे ?
रिक्षाचालक सुट्टे देणार का.. नोट दाखवताच त्याने कपाळाला हात लावला..  देशसेवा म्हणुन तीन किलोमीटर चालत आलो...खरेतर जेव्हा अनिश्चीतता व भीती दीर्घकाळ राहते तेव्हा ती एका मोठ्या अनागोंदीला जन्म देत असते.  ही स्थिती बदलली नाहीतर  अर्थव्यवस्थेचा प्रवास ग्रीससारख्या अर्थव्यवस्थेत होण्याची भीती आहे. असे होवू नये म्हणुन देशाला भ्रमात ठेवण्याचे काहीच कारण नाही.
काळा पैसा बाहेर काढण्यासाठी व दहशतवादाला प्रतिबंध करण्यासाठी नोटाबंदीचा निर्णय घेतला असल्याचे सांगुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी  होणारा त्रास सामान्य नागरीकांनी देशसेवा म्हणुन सहन करावा असे आवाहन केले आहे. पण खरेच देशसेवा म्हणुन सांगताना जेव्हा भाजपच्या नेत्याकडेच लाखो रुपये  नोटा असलेले  सापडतात. तेव्हा सामान्य नागरीक बुचकळ्यात पडतो. भाजपचे कर्नाटकमधील आमदार रेड्डी यांनी मुलीच्या लग्नात अशा नोटाबंदीच्या काळात ५०० कोटीहून अधिक खर्च केले आहेत. जिथे सामान्याला रोज दोन हजार रुपये काढायची मर्यादा असताना भाजपच्या आमदारांना वेगळा न्याय आहे का? दिल्लीतील आपच्या एका महिला नेत्याने भाजपच्या पक्ष कार्यालयांनी नोटाबंदी पुर्वी लाखो रुपये खात्यावर भरून सोय केल्याची टीका केली आहे. सामान्यांना लग्नाला, दवाखान्याला पैसे मिळत नाहीत. यावर उपाय होत नसेल तर रोगापेक्षा ईलाज भयंकरच अशीच नोटाबंदीची स्थिती झाली आहे.
कॉग्रेस हा विरोधक पक्ष म्हणुन तर नुसता पळपुटा आहे. शिवसेनेने सत्तेत असतानाही नोटाबंदीच्या गैरसोयीवर कडक भुमिका घेतली हे कौतुकास्पद आहे. राष्ट्रवादीचे तळ्यात मळ्यात आहे.
नोटाबंदीला विरोध करणारा  असो की त्यातील त्रुटी दाखवणारा देशद्रोही हे गणीत मांडले आहे. एखाद्या मनात दोषीपणाची भावना रूजविली की आपोआप काम सोपे होते, परंतू जेव्हा भाजपच्या नेत्याकडे काळा पैसा नाही का? किती नेत्यावर काळा पैसा असल्याबाबत कारवाई झाली ? याचे उत्तर सामान्य नागरीक आपआपसात आज विचारत आहेत. पंतप्रधानांना याचे उत्तर द्यावे लागेल.
यासाठी १) आयकर विभाग उद्योजकाप्रमाणे राजकीय नेत्यावर कारवाई का करीत नाही?
२) रिझर्व्ह बॅंकचे  गव्हर्नर आता व्याजदर ठरविण्यासाठी सरकरा नियुक्त प्रतिनिधींची मदत घेणार आहेत . सरकारचा गव्हर्नरवर विश्वास नाही का ? सरकारला रिझर्व्ह बॅंकेवर अंकुश का घालावासा वाटतोय?
३) राष्ट्रीयीकृत बॅंका सतत तोट्या जात आहेत. मल्ल्यासारखे लाखो कोटी रूपये बुडवुनही बडया धेंड्यावर कारवाई का होत नाही ?
 शासनाने नोटाबंदीनंतर विस्कळीत झालेली व्यवस्था एका महिन्यात सुरळीत सुरू होईल असे सांगितले आहे. तर दुसरीकडे अर्थतज्ञ सहा महिने लागतील असे सांगत आहेत. एवढा फरक अंदाजात होत असल्यास शासन जनतेला कशामुळे अंधारात ठेवत आहे?
४) देशात रोजगार कमी होत असल्याने राष्ट्रपतींनी चिंता व्यक्त केली आहे. नोटाबंदी होत असताना उद्योगांनाही फटका बसत आहे. याचे सरकारने केलेले नियोजन काय आहे?

Featured Post

मेकॉलची शिक्षणपध्दती किती दिवस व्यवस्थेने पचवायची ?

आठवीच्या वर्गावर भूमितीचा तास चालू होता. प्रमेय समजावून सांगणारे शिक्षक असे मानू या समजू असे सांगून प्रमेयाची सिध्दता समजावून सांगत होते....