न्यायदेवतेच्या मंदिरात जाण्याआधीच तिला मानसिक रुग्ण ठरवून तिचा बळी घेण्यात आला. ३ प्राध्यापक डाॕक्टरांनी मेडीकल महाविद्यालयाच्या विद्यार्थिनीवर बलात्कार केला. ती थोडीच मुकी शेळी होती ? येथवर थोडेच थांबणार होते.
न्याय मागण्याचीही तिला किंमत मोजावी लागली. तिला प्रात्याक्षिक परीक्षेत नापास करण्यात आले. न्याय तर मिळालाच नाही. उलट बलात्कार प्रकरणाची चौकशी करणार्या चांडाळचौकडीनेही तिला आणखीनच उद्ववस्त केले. ज्या हातांनी रुग्णसेवेचे व्रत घेण्याचे स्वप्न पाहिले, त्याच हातांनी गळफास घेत तिने आपले आयुष्य संपविले. तिचे हात थरथरले नसतील का? धनदांडग्यापुढे तिचा आवाज एवढा क्षीण झाला होता का तिने कायमचीच वाचा बंद करुन घेण्याचा निर्णय घेतला. खरतर बलात्कार करणार्या या नराधमांचा माणसांचा दर्जा काढून घ्यायला हवा. त्यांना हिंस्त्र प्राण्यांच्या कळपात सोडून जाणीवा करुन द्यायला हवी.
कधीतरी माणसाने आपली माणूसपणाची जातही तपाली पाहिजे.
जाता जाता ः देवी फोटोतच आहे, प्रत्यक्षात दिसली असती तर माणसाने कदाचित बलात्कारी गुण दाखविले असते. ही सोशल मीडियातील पोस्ट थेट स्त्रिया किती असुरक्षित आणि माणूस किती खालच्या स्थराला जातोय हे सांगते .
No comments:
Post a Comment