मनात ठरवले तर तुम्ही कोणत्याही क्षेत्रात यशस्वीपणे भक्कमपणे पाय रोवू शकता. याचे उदाहण लातूरमध्ये क्लाऊड किचनची सुरुवात करणारे सुमित पाटील हे आहेत.
थोडसं मागे जावू...पुण्यात कोरोनाची भयावह स्थिती असताना त्यांनी तीन
महिन्यांपूर्वी लातूरमध्ये परतण्याचा निर्णय घेतला. बायोमेडिकल कंपनीत एचआरमध्ये
चांगल्या पदावर असताना त्यांनी नोकरीला
रामराम ठोकला अन् लातूरमध्ये परतले. पण, कोणता व्यवसाय सुरू करायचा असा
त्यांच्यासमोर प्रश्न होता. तेव्हा
त्यांच्या लक्षात केले की, कोरोनाच्या काळात लोक बाहेर जाण्याचे टाळत आहेत. पण,
अनेकांना योग्य किमतीत चविष्ट अन्न
खाण्याची इच्छा आहे. तेव्हा त्यांनी या संकटात हीच संधी आहे, हे ओळखून क्लाऊड
किचनची सुरुवात केली. आम्ही त्यांना विचारले, तुम्ही महिलांची मक्तेदारी असलेल्या
फुडच्या उद्योगात कसे आलात..तेव्हा त्यांनी दिलेले उत्तर हे खूप प्रांजळ आणि
कोणत्याही कौटुंबिक मनाच्या व्यक्तीला माणसाला आवडेल असे आहे.
सुमित पाटील सांगतात, पत्नीचे स्वप्न आहे, की स्वत:चे
रेस्टॉरंट सुरू करावे. तर माझे स्वप्न आहे, स्वत:ची
कोचिंग संस्था असावी. पण लॉकडाऊनमुळे अलिबागमधील थोडेसे नियोजन बदलावे लागले.
विशेष म्हणजे सुमित पाटील आजही विद्यार्थ्यांना ऑनलाईन फिजिक्स
शिकवितात. त्यावेळी त्यांना कुटुंबातील व्यक्तींकडून सहकार्य मिळते.
कसा चालतो किचन क्लाउडचा व्यवसाय?
क्लाउड किचन ही संकल्पना सध्या खूप रुजत आहे. यामध्ये ग्राहकांकडून ऑनलाईन ऑर्डर घेतल्या जातात. त्यांना घरपोहोच अन्न दिले जाते. घरगुती आणि इतर समारंभासाठीही सुमित पाटील ऑर्डर घेतात.
फूड डिलिव्हरी देतातना संपर्कविरहित म्हणजे कॉन्टॅक्टलेस ऑर्डर दिली
जाते. स्वच्छतेचे आणि सध्याच्या काळात आवश्यक असलेल्या नियमांचे पालन करून फूड
दिले जात. याबात सुमित पाटील सांगतात, पुण्यात असे किचन फॅसोस, लंचबॉक्स असे किचन
क्लाऊडचे फूड देणाऱ्या कंपन्या आहेत.
खवय्यांसाठी आहे भरगच्च मेन्यू-
आम्ही घरात किचन सेटअप केला आहे. खवय्यांसाठी 25 ते 30 प्रकारचे मेन्यू आहेत. यामध्ये लहान मुलांसाठी चॉकलेट सँडविच, मराठा प्लॅटरमध्ये थाळी सिस्टिमसाठी मेथी भाकर असे खास महाराष्ट्रीयन जेवण आहे. पंजाब –पनीर बटर मसाला असे प्रकारही आहेत. बिर्याणीचे विविध प्रकार आहेत.
सुमित यांच्याशी गप्पा मारताना तुम्हाला त्यांचे उत्तम नियोजन लक्षात
येते. ग्राहकांना चविष्ट फूड देताना फार खर्च येत नाही, हे ते सांगतात. यामधून
मिळणारा नफाही पुरेसा असल्याचे प्रांजळपणाने सांगितले. क्वचितच एखादा उद्योजक क्वचितच एवढ्या प्रामाणिकपणाने आपल्या
फायद्याचे गणित सांगेल.. त्यांनी एक उदाहणच दिले. सुमित सांगतात..समजा पुण्यात
एखादा फूड आयटम हा 250 रुपयांना आहे. तो आमच्याकडे 100 रुपयांना आहे. गुणवत्तेबाबत
आम्ही उलट जास्त चांगले आहोत, असा त्यांनी दावा केला आहे.
भविष्यात त्यांना फ्रँचाईजी द्यायचा आहेत. पण, तीन वर्षांपर्यत ते
लातूरमध्ये लक्ष केंद्रित करणार आहेत.
त्यांना हा फुड बिझनेस सुरू करताना अनेक अडचणी आल्या आहेत. सुमित म्हणाले, आपले संपर्क सुरुवातीला मर्यादित असल्याने अडचणी येतात. पण नवीन लोकांना जोडावे लागते. सुरुवातीला ग्राहक विश्वास ठेवत नाहीत. पण, ग्राहकांना गुणवत्तेची खात्री झाली तर खूप फरक पडतो. चीज हे अमुलचेच खाद्यपदार्थात गावरान तुप अशी ते क्वालिटी देतात
उद्योगाला किती अडचणी येतात असे विचारले असता सुमित सांगतात, आम्ही
सुरुवात गणेश चतुर्थीला उकडीच्या मोदकापासून केली. तांदळाची उकड अथवा पिठ्ठी
मिळाली नाही. ती तयार करण्यासाठी गिरणीत जावे लागले. ग्राहकांकडून चांगल्या ऑर्डर
आल्या होत्या, पण ऐनवेळी लोडशेडिंगमुळे चार ऑर्डर रद्द कराव्या लागल्या.
काय आहे उद्योजकांना सल्ला..
फुडच्या व्यवसायात असाल तर वेळेचे नियोजन खूप आवश्यक आहे. अनेकांना
खूप भूक लागलेले असते. त्यांना लगेच फूड हवे असते. त्यामुळे आधी आम्हाला तयार
असावे लागते. वेळेचे व्यवस्थापन करावे लागते. आम्ही ग्राहकांना फूड देण्यासाठी
नेहमी तयार असतो.
स्टार्टअपला सुरुवातीला यश मिळेलच असे नाही. संयम ठेवल्यास हळूहळू तुम्ही नक्की झेप घेऊ शकता. सर्वात प्राधान्य हे व्यस्थापना द्यावे, असा सल्ला सुमित पाटील यांनी दिला आहे.
सध्या, बाहेरून अन्न मागविणे का मागवावे असा अनेकांना प्रश्न पडतो. पण
रेस्टॉरंटसारखे जेवण तेही वाजवी दरात मिळण्यासाठी अभिराजने चांगला पर्याय दिला
आहे. तुम्ही फूड ऑर्डर करू शकता..
काॅपिराईट,@श्रीकांत पवार
No comments:
Post a Comment