संजय राऊत! एकच नाव पुरेसं आहे. भाजपाचं पीआर मॅनेजमेंट आणि वाचाळ नेत्यांची फौज व घायाळ करणाऱ्या स्क्रीप्ट असतानाही संजय राऊत हे सत्ताधाऱ्यांना पुरुन उरले आहेत.
सत्ताधारी एवढे वैतागले आहेत की, रोज सकाळी भोंगा वाजवणं बंद करा अशी कधी विनवणी तर कधी टीका करतात. पण, संजय राऊत यांच्यावर ईडीची मात्रा चालली नाही. रोज सकाळी त्यांची पत्रकार परिषद झाल्यानंतर भाजपासह शिंदे गटाच्या नेत्यांना प्रत्युत्तरच द्यावं लागतं. पत्रकार परिषदेत रोज नवनवीन मुद्दे मांडताना त्यांना हेडलाईन मॅनेजमेंट करावं लागतं नाही. आपसुकच त्यांच्या विधानांच्या मोठ्या बातम्या होतात. नाईलाजानं गोदी मीडियालादेखील त्यांची दखल घ्यावी लागतं. तर भाजपासह शिंदे गटाच्या नेत्यांना खासदार राऊत यांच्या विधानावर प्रतिक्रिया व प्रत्युत्तर देताना रोज दमछाक होतेय.
शिवसेना म्हटलं की बाळासाहेबांचा निष्ठावंत शिवसैनिक असे चित्र डोळ्यासमोर येते. यामध्ये अर्थात संजय राऊत यांच पहिलं नाव समोर येतं आहे. मोदींच्या धोरणाविरोधात सतत बोलत असल्यानं होणाऱ्या राजकीय दबावाला असो की तुरुंगात पाठवूनही धमक्यांना घाबरत नाहीत. एकप्रकारं संजय राऊत हे दिल्लीपुढं न झुकणाऱ्या आणि स्वाभिमानी मराठी माणसाचे ब्रँड अॅम्बिडिर आहेत.