Friday, November 29, 2013

सायकलीवरचे जोडपे...

 वळणे घेत जाणारी पुण्यातील बाजीराव रोडवर एक जुनाट सायकल जात आहे.ही सायकल चालविणारा एक माणुस आणि मागे  कॅरेजवर  त्याची बायको बसली आहे.रस्त्यावरील गर्दीतुन वाहनातून मार्ग काढत असताना दोघे मस्त बोलत चालले आहेत.पुढे येणारा सिग्नलच्या भीतीने   दुचाकीचालक पुण्याच्या भाऊगर्दीतुन रस्ता काढत असताना एवढे चिंतातूर दिसत आहेत की अस्स वाटावे नुकताच पाकिस्तानने अणवस्त्राची दिशा पुण्याकडे वळविली आहे.काही चारचाकी थाटात तर मध्येच दुचाकी चालविणा-या बांधवांच्या   वाकुल्या कम कट मारलेले सोसत जात आहे.
जुनाट सायकल आणि त्यावरील जोडपे आरामात जात आहे. 
रस्ता दुरचा आहे...पण आयुष्यात सगळे सुखी पायी लोळण घेतली तरी आपले मन हे कायम नसलेल्या गोष्टीसाठी दु:खी होते. ज्या गोष्टी आपल्या जवळ आहेत त्यामुळे आनंद घेण्याचे मात्र विसरत जातो.
शेवटी   आपण समाधान मानले तर आयुष्यात सुखी होण्यासारखे आपल्याकडे बरेच असते.मला तर पायी चालताना दिसणारे ,भासणारे पुणे सर्वात सुंदर भासते... 
  सर्वात समाधानी मनाचे चेहरे  हे बहुतेक हावरट नसणारे माणसाचेच असतात 

कायद्यामुळे न्यायालयांचा ठेवावा लागतो आदर ?


 

सर्वोच्च न्यायालयाने लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये स्त्री -पुरूषाने राहणे हे पाप किंवा गुन्हा नव्हे असे मत व्यकत केले आहे. आदरणीय न्यायालयाने असे आदरणीय (?) विचार का केले हा प्रश्न मनात निर्माण होत आहे.ज्या मतामुळे समाजावर काय परिणाम होतो याचा विचार न्यायव्यवस्थेने करायलाच हवा.

कायदा आणि न्यायालये ही समाजाच्या सुव्यवस्थेसाठी आहे.लग्नाशिवाय एकत्रित राहण्याला न्यायालयाने मान्यता कोणत्याही परिस्थीतीत मान्यता देवू नये.शाब्दीक खेळ करीत व्याख्या करण्याच्या ह्या गोष्टी नाहीत.पण न्यायालये सतत घसरत जातात त्यामुळे नैतीक व अनैतीकच्या व्याख्याही बदलत जातील.थोडक्यात काय तुम्ही लग्न न करता अधिकृत लफडी करा.परंतु यामुळेच गुन्हेगारी वाढते . अनेकांचे आयुष्य उध्वस्त होवू शकतात. 

घटस्फोटासाठी न्यायालयात जमलेली गर्दी बघुनच समाजाची दिशाच समजायला लागते.सर्वोच्च न्यालयाने दिलेले अनेक निकाल समाजासाठी ,लोकशाहीसाठी दिशा देणारे ठरले आहेत.विवाहसंस्था सशक्त असणे हे निरोगी समाजाचे लक्षण आहे,परंतु न्यायालये उठसुठ ही विवाहसंस्था संकल्पनाच का मोडीत काढायला निघाली आहेत हे समजतच नाही.कायद्यामुळे न्यायलयांचा आदर ठेवावा लागतो दुसरे काय?

Thursday, November 28, 2013

कॉलेज गेट

  

मराठी साहित्यात कॉलेज गेट नावाची एक कादंबरी तुफान गाजतेय. वाचायला सुरूवात केली आणि अक्षरश: कॉलेजगेट मध्ये फिरतच राहिलो.वाचकाने स्वकथन करत असतानाची शैली ही अशी भन्नाट आहे की आपल्याला वाटते , हा तर आपला बेस्ट मित्र बोलत आहे!
 क़ॉलेज लाईफ मध्ये प्रत्येक जण कीडा असतो.म्हणजे काहीतरी भन्नाट करण्याची उर्मी आणि त्यासाठी झोकुन देण्याची वृत्ती हीच पुढे कुठेतरी जपा अशीच ही कादंबरी सांगते.फरिीजीवन जगत असताना मस्त कलंदर जगणारे मित्र ,शब्दाखातर जीवाला जीव देणारे यारी आणि बरेच काही आहे.सांगु का ? वाचल्याशिवाय ह्या पुस्तकाची गंमत कळायची नाही.पुस्तकातील प्रत्येक पात्र आपल्याशी संवाद करत असतात.खुप काही आहे ..सुहास शिरवळकरांची दुनियादारीपेक्षा मला हे पुस्तक आवडले.कारण आजच्या तरूणाईची भाषा आणि चालु काळातील ती वास्तववादी आहे.

Monday, November 25, 2013

जमीनव्यवहार ठरतेय काळ्या पैश्यावाल्यासाठी सोन्याची खाण

 

जमीनव्यवहार करण्यासाठी ग्रामीण विभागात शहरालगत दलालाच्या टोळ्या निर्माण झाल्या आहेत.या टोळ्यांनी शेतकरीवर्गाचा जीवाला घोर लावला आहे.शेतकर्‍यांना शेती करायची आहे तर दलालांना जमीनी विकायच्या आहेत.जमीनी विकुन खुळखुळणारा पैसा  दिसणारा पैसा दुसरीकडे काळीआई दिसत असताना त्याची  कमालीची जीवाची घालमेल होते.परंतु दलालांच्या टोळ्या ह्या गुंड आणि राजकीय पक्षांच्या वरदहस्ताने चालत असल्याने अनेक शेतकर्‍यांचा निरूपाय झाला आहे.अनेक बांधकाम व्यावसायीक तसेच अवैध मार्गाने कमविणार्‍या शासकीय अधिकार्‍यासाठी ह्या जमीनी सोन्याची खाणी ठरत आहेत.थेट जमीनीत पैसा गुंतविला जात असल्याने  तसेच जमीनीत ठरणारी फायदेशीर गुंतवणुक यामुळे रिअल इस्टेटची जोरदार डिमांड वाढत आहे.प्रत्यक्षात रिअल इस्टेटमधील प्रगती म्हणजे खरी प्रगती आहे का याचाही विचार करायला हवा.

Friday, November 22, 2013

मार्केटींग तंत्रामुळे अभिजातपणा नजरेआड!

मार्केटींग तंत्रामुळे अभिजातपणा नजरेआड!  

Shrikant Pawar

  जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात व्यापारीकरण आलेले आहे.यामुळे फोफावत जाणारी बाजारूवृत्ती आपल्याला जीवनाच्या अस्सल अश्या अभिजातपणापासून कोसो दुर ठेवते.पण जाहीरातींचा गोबेल्सनीतीसारखा मारा कुणाच्याही लक्षात येत नाही .नेमका अभिजातपणा कसा होतो नजरेआड ?त्यामागे कुणाचे आहे अर्थकारण याचा घेतलेला वेध !
  कलांचा लोप होत चालला होता तश्याच पध्दतीने भारतातील कलांचा लोप होण्यास सुरूवात झाली आहे.
,क्रीडा,साहित्य हे केवळ मनोरंजनाचे साधन नाही तर ते समाजाचे प्रतिबिंब असते.तसेच समाजमनाला सतत प्रफुल्लीत ठेवणारे ,संवेदनशीलता जागृत ठेवणारे इंद्रिये आहेत.क्रिकेट म्हणजे करोडो भारतीयांचा जीव की प्राण असणारा खेळ !पण क्रिकेट ह्या खेळालाच एवढे उचलून का धरले जातेय?जगातील सर्व बड्या कंपन्यासाठी भारत ही भरघोस नफा देणारी बाजारपेठ आहे.कंपन्यांच्या उत्पादनांना खपविण्यासाठी आकर्षक जाहीराती कराव्या लागतात.त्यासाठी ग्राहकांची मानसीकतेचा विचार करावा लागतो.ग्राहकांना जाहीरात आपलेच भावविश्व वाटणे, अपील होणे यासाठी उत्पादक कंपन्या कोट्यवधी रूपये खर्च करतात.त्यामुळे सहज आणि जास्तीत जास्त लोकांना अश्याच गोष्टींना लोकप्रियता लाभते.क्रिकेटपेक्षा मानवी शारीरीक ,बौध्दीक कसोटींची परिक्षा घेणारे अनेक खेळ आहेत.हॉकीसारखा राष्ट्रीय खेळ आजवर उपेक्षीतच राहिलेला आहे.परंतु ते नेमके सर्वसामान्यपणे सगळ्यांनाच झेपत नाही.उलट क्रिेकेट ह्या खेळासाठी कुणीही उतरू शकतो.त्यामुळे प्रेक्षक आपोआप क्रिकेटशी एकरूप होतो आणि उत्पादक कंपन्याचे फावते.जाहीरातीतून अश्या वेळी प्रेक्षकावर उत्पादन चांगलेच ठसविण्यात त्यांना यश येते.यामुळे सर्वात जास्त हानी होते ती सर्वसामान्यांचीच! आयुष्यात लागणारी एक्रागता तिरंदाजी तर बुध्दी कौशल्य बुध्दीबळ शिकविते.नेमके हे लक्षात घेत नसल्यामुळे आपण अश्या अभिजात खेळापासून दुर गेलो आहोत.प्रसिध्दीमाध्यमांना लोक ज्या बाजूने झुकतात.त्या बाजूने झुकत प्रसिध्दी द्यावी लागते.पण हा लोकानुनय आपल्याला परवडणारा नाही.चीन सारखा बलाढ्य देशाने केलेली प्रगती ही उत्तम अश्या मनुष्यबळानेच केली आहे.{Mत्रवाहीन्यावर आता नाचगाण्यांच्या रिऍल्टीशोने चांगलाच धुडगुस घातला आहे. आयुष्यात नाच-गाणे एवढ्याच कला नाहीत हे कानी-कपाळी ओरडून सांगायची वेळ आली आहे.साहित्य-चित्रकला,शास्त्रीय गायन-वादन अश्या कलासाठी रिऍल्टी शो झाले तर खऱ्या गुणवत्तेला व्यासपीठ  मिळु शकते. अश्या गोष्टींना महत्त्व दिले जात नसल्याचे एकमेव कारण म्हणजे त्यासाठी कलाकारांना चिकाटी,कष्ट व जबरदस्त संयमीपणाला महत्त्व द्यावे लागते.त्यामुळे सहभागी कलाकारांचा प्रतिसादर कमी तसेच त्याची रूची असणारा प्रेक्षकवर्गही कमी हे गणीत डोक्यात ठेवूनच कार्यक्रमाची आखणी केली जाते.लोकांना आवडते तेच सादर केले जाते, असा सर्वसाधारणपणे दावा चित्रवाहिन्याकडून केला जातो.प्रत्यक्षात केवळ जाहीरात कंपन्यांच्या धोरणानुसार कार्यक्रम निर्मीती केली जात आहे.कुटुंबातील महिलांचे डावपेच,कुरगोड्या यांना प्राधान्य देत मालिकांचा अक्षरश: रतीब झालेला आहे.प्रांजळपणा जपणारे पात्र ,हलकेफुलके असणारे विनोद हे दुर्मीळ होत चालले आहे.एकंदरीत आपल्या आयुष्यातील अभिजातपणा आपण मार्केटींग तंत्रात हरवून बसलो आहोत.स्सी जैसी कोई नही ही सोनीटीव्ही वरील मालिका चर्चेत आली ते जस्सीच्या मनाच्या सौदंर्यामुळे!सौंदर्य प्रसाधन विक्री करणाऱ्या कंपन्यांनी स्त्रियांच्या मनावर सुंदर दिसणेच किती आवश्यक आहे हेच बिंबवले आहे.त्यातून साध्या दिसणाऱ्या  जस्सीचे भावविश्व मालिकेत रेखाटले होते.सौंदर्य प्रसाधन कंपन्याच्या दबावातून मिस वर्ल्ड ,मिस इंडिया सारख्या स्पर्धा आयोजीत केली जातात.भारताच्या पहिल्या आयपीएस किरण बेदी, अंतराळ वीर सुनीता विल्यम्स  ह्यांनी सौंदर्याने नव्हे तर कर्तत्वामुळे ठसा उमटविला.जाहीरातींच्या भडिमारातून सौंदर्याचेच महत्त्व सांगितले. साहजिकच याचा दुष्परिणाम म्हणजे सर्वसामान्य दिसणाऱ्या  मुलीमध्ये न्युनगंड निर्माण होतो.
  नजरेआड झालेला अभिजात पणा दुर करून समाजमनाचे खोटे मुखवटे बाजूला सारल्यानंतर मिळणारे समाधान शब्दातीतच आहे.
किमान दोन दिवस टीव्ही बंद करून रिकाम्यावेळी आवडत्या विषयाचे पुस्तक किंवा शास्त्रीय संगीताकडे वळल्यास हा अभिजातपणा चांगलाच अनुभवला येईल. 

Featured Post

मेकॉलची शिक्षणपध्दती किती दिवस व्यवस्थेने पचवायची ?

आठवीच्या वर्गावर भूमितीचा तास चालू होता. प्रमेय समजावून सांगणारे शिक्षक असे मानू या समजू असे सांगून प्रमेयाची सिध्दता समजावून सांगत होते....