Saturday, August 29, 2015

हरितक्रांती म्हणजे शेतक-यांची फसवणुकच !

शेतक-यांना उत्पादन वाढविण्यासाठी  रासायनिक खते व किटकनाशके, सुधारीत बियाणे वापरायला शासन व इत्यादींनी प्रोत्साहीत केले. पण याचा काय फायदा झाला ?
भरमसाठ उत्पन्न वाढले. पण भाव खर्चा तुलनेत कधीच मिळाले नाहीत. उलट  गुणवत्ता घसरली आणि त्याचे होणारे दुष्परिणाम आता कळू लागले आहेत. शेवटी कोणाचा फायदा झाला ?
बहुराष्ट्रीय कंपन्या आणि त्यांचे धार्जिणे स्वतःची पाठ थोपटून घेणारे सरकार मात्र पोकळ विकास दाखवायला मोकळे ! जमीनीचा पोत घसरल्यामुळे नापीक जमीन झाल्यावर दक्षिण आफ्रिकेत शेतक-यांनी शेती करायची का ? त्यालाही शासन अनुदान देईल ? हरितक्रांती ही शेतक-यांची शुध्द फसवणुक आहे.
सरकारने करोडो रूपये अनुदान देण्यापेक्षा सेंद्रिय शेती व त्याला चांगला भाव मिळावा यासाठी प्रयत्न करायला हवेत. मधल्या दलांलाची गरज लागू नये यासाठी थेट ग्राहकापर्यंत माल पोहोचवायला हवा. हॉस्पीटल्सची वाढती संख्या म्हणजे आपल्या देशाचा खुप विकास झाला असा नव्हे. सगळी आरोग्यव्यवस्थाच केमीकलयुक्त अन्नामुळे सलाईनवर आहे.   

Sunday, August 16, 2015

मॅनेजमेंट शास्त्र - मानवी जीवनाला मिळालेले वरदान

प्रयत्नाबाबत विविध विद्याशाखा आपल्याला खालीलप्रमाणे शिकवितात.
अध्यात्म- प्रयत्न करणे हा धर्म आहे.
कला- प्रयत्न करणे कला आहे.
शास्त्र-प्रयत्न हे एक शास्त्र आहे.
कायदा- प्रयत्न करणे हा एक कायदा आहे.
मॅनेजमेंट- प्रयत्न हे मिळवायचे असेल तर जिथे जिथे शक्य आहे तिथे अध्यात्म ,कला, शास्त्र, कायदा उपयोगात आणा. जर ते उपयोगात न आणता मिळ्त असेल तरीही यश मिळवा. शेवटी तेच महत्वाचे आहे यामुळे मॅनेजमेंट हे सर्वात महत्वाचे शास्त्र, विषय आहे.मराठी माणसाला लहानपणापासून डोक्यात बिंबवले जाते. खुप कष्ट करा आणि यश मिळवा. पण कष्ट खूप म्हणजे यश खूप... हे गणीत खरेच योग्य आहे का? केवळ ढोरमेहनत करून यश कधी व किती मिळणार आहे. कष्ट नुसतेच करा आणि फळाची अपेक्षा करू नका एवढेच आपल्या समजाविले जाते. जर फळ मिळत नसेल तर ते काम काय कामाचे ?पण मॅनेजमेंटमध्ये एवढेच शिकायला मिळते की ध्येय निश्चित करून योग्य व्यवस्थापनाने कष्ट करा. रिझल्ट ओरिएन्टेड वर्क करा असे शिकविले असते तर आयुष्याला चांगली दिशा मिळू शकते. पण आपल्यावर धर्मपगडा, भाबडेपणाने शिक्षण शिकविले जाते.प्रयत्न करूनही यश मिळाले नाही तर आपण दैवाला दोष देतो. पण ते खरेच योग्य आहे का ? सागरात असणा-या गलबताला किना-यावर नेमके कोठे जायचे निश्चित नसेल तर कोणतेही उपयोगी असणारे वारेही कसलेच फायद्याचे नसते. त्यामुळे निश्चित असणारा किनारा कधीही उपयुक्त असतो.  


Saturday, August 15, 2015

त्रिवार वंदन भारतमाते तुला !

त्रिवार वंदन भारतमाते तुला !

भारताचा आज ६९ वा स्वातंत्र्यदिन अत्यंत उत्साहात साजरा होत आहे. लहानपणी आपल्याला १५ ऑगस्ट म्हणजे कडक इस्त्री केलेला युनिफॉर्म घालून कधी झेंडावंदन करतो असे वाटायचे. देश म्हणुन सगळेजण एकटवतात ही गोष्ट  रोमांचित करणारी वाटते. सगळ्यात जास्त महत्वाचे नव्या पिढीला उद्याच्या भविष्यासाठी असलेल्या जबाबदारीची नकळत जाणीव होते. आयुष्यभरासाठी मनावर ती कोरली जाण्याचा हा दिवस असतो.  
विविधतेने , उच्च मानवी मुल्ये यांचा संस्कार असणारी देशाची परंपरा , विविध भाषा, कला यांनी देश अत्यंत नटलेला आहे. सगळ्यात जास्त म्हणजे त्याग करून देशाच्या विकासात अमुल्य हातभार लावणारा सामान्य माणुस ते विविध थोर व्यक्ती तेजस्वी हि-याप्रमाणे भारतमातेच्या दिव्य अलकांरात शोभतात.
आजच्या स्वांतंत्र्यदिनासाठी लाखो लोकांनी प्राणांची आहुती दिली आहे. अनेक क्रांतीकारांनी घरादारावर तुळशीपत्र ठेवून चळवळीत भाग घेतला. त्यांच्या त्याग व बलिदानामुळेच आपण स्वांत्र्य उपभोगु शकतो. याची किंमत अनमोल आहे. स्वांत्र्यदिनामुळेच आपण अभिव्यक्ती, संघटना स्थापन करणे, फिरणे, भाषण करणे अशा विविध स्वातंत्र्य उपभोगतोय.  निराशेचे मळभ झटकून टाका.
भारतात असणारी सुप्त शक्ती सगळया जगाला खुणावतेय. त्यासाठी आपण एका सच्चे भारतीय म्हणुन   सर्व जबाबदा-या व कर्तव्य पालन करु.
भारत २०२० ला भारत महाशक्ती २०२० होण्यासाठी तयार होवू...... भारतमातेला त्रिवार वंदन...!
========================================================================
भारत २०२० साली  महाशक्ती होण्याचे स्वप्न माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांनी पाहिले आहे. तरी आपण यात सहभागी होवू. मराठी पत्रकारीता तुम्हाला सहभागी करत आहे. ब्लॉगवर प्रसिध्दीसाठी आपल्या कल्पना, विचार लेख ईमेलवर पाठवा. shrikantpawar15@gmail.com  


Featured Post

मेकॉलची शिक्षणपध्दती किती दिवस व्यवस्थेने पचवायची ?

आठवीच्या वर्गावर भूमितीचा तास चालू होता. प्रमेय समजावून सांगणारे शिक्षक असे मानू या समजू असे सांगून प्रमेयाची सिध्दता समजावून सांगत होते....