Sunday, August 16, 2015

मॅनेजमेंट शास्त्र - मानवी जीवनाला मिळालेले वरदान

प्रयत्नाबाबत विविध विद्याशाखा आपल्याला खालीलप्रमाणे शिकवितात.
अध्यात्म- प्रयत्न करणे हा धर्म आहे.
कला- प्रयत्न करणे कला आहे.
शास्त्र-प्रयत्न हे एक शास्त्र आहे.
कायदा- प्रयत्न करणे हा एक कायदा आहे.
मॅनेजमेंट- प्रयत्न हे मिळवायचे असेल तर जिथे जिथे शक्य आहे तिथे अध्यात्म ,कला, शास्त्र, कायदा उपयोगात आणा. जर ते उपयोगात न आणता मिळ्त असेल तरीही यश मिळवा. शेवटी तेच महत्वाचे आहे यामुळे मॅनेजमेंट हे सर्वात महत्वाचे शास्त्र, विषय आहे.मराठी माणसाला लहानपणापासून डोक्यात बिंबवले जाते. खुप कष्ट करा आणि यश मिळवा. पण कष्ट खूप म्हणजे यश खूप... हे गणीत खरेच योग्य आहे का? केवळ ढोरमेहनत करून यश कधी व किती मिळणार आहे. कष्ट नुसतेच करा आणि फळाची अपेक्षा करू नका एवढेच आपल्या समजाविले जाते. जर फळ मिळत नसेल तर ते काम काय कामाचे ?पण मॅनेजमेंटमध्ये एवढेच शिकायला मिळते की ध्येय निश्चित करून योग्य व्यवस्थापनाने कष्ट करा. रिझल्ट ओरिएन्टेड वर्क करा असे शिकविले असते तर आयुष्याला चांगली दिशा मिळू शकते. पण आपल्यावर धर्मपगडा, भाबडेपणाने शिक्षण शिकविले जाते.प्रयत्न करूनही यश मिळाले नाही तर आपण दैवाला दोष देतो. पण ते खरेच योग्य आहे का ? सागरात असणा-या गलबताला किना-यावर नेमके कोठे जायचे निश्चित नसेल तर कोणतेही उपयोगी असणारे वारेही कसलेच फायद्याचे नसते. त्यामुळे निश्चित असणारा किनारा कधीही उपयुक्त असतो.  


No comments:

Featured Post

मेकॉलची शिक्षणपध्दती किती दिवस व्यवस्थेने पचवायची ?

आठवीच्या वर्गावर भूमितीचा तास चालू होता. प्रमेय समजावून सांगणारे शिक्षक असे मानू या समजू असे सांगून प्रमेयाची सिध्दता समजावून सांगत होते....