Saturday, November 14, 2015

दिपावलीच्या सर्व वाचकांना व त्यांच्या परिवाराला मराठी पत्रकारिता ब्लॉग तर्फे हार्दिक शुभेच्छा !

दिपावलीच्या सर्व वाचकांना व त्यांच्या परिवाराला मराठी पत्रकारिता ब्लॉग तर्फे हार्दिक शुभेच्छा !

पुरस्कार परत करणारे साहित्यिक आणि बुध्दिवादी राजकारण .....
साहित्य,  चित्रपट म्हणजे नागरिकांच्या भावना आणि त्यांच्या स्वप्नांना, इच्छांचे प्रतिनिधीत्वच या कला करतात. यामुळे साहित्यिक व कलाकाराच्या कलेतून व्यक्त केलेले विचार एकप्रकारे 
लोकांच्या जीवनाशी बांधलेले असतात. पण हे विचार खरेच सामान्य जीवन किती मांडतात याबद्दल न बोललेले बरे ! अपवाद तुरळक आहेत.
राजसत्तेच्या आश्रयाखाली राहून पुरस्कार पदरात पाडून घेणारा कलावंताचा बुध्दीनिष्ठ म्हणुन दिखावा करणारा वर्ग आहे. दादरी प्रकरणावरून पुरस्कार परत करण्यासाठी साहित्यिकांची चाललेली स्पर्धा हेच त्याचे द्योतक आहे.  मुळात एखादा फोटोसेशन कार्यक्रम असावा आणि यामध्ये आपण मागे पडू नये यासाठी आपण मागे पडू नये असाच मान्यवरांचा प्रयत्न होता.  नाहीतर आणीबाणी असो की अभिव्यक्तीस्वातंत्र्यावर घाला करणारे सायबर कायदा अशावेळी हे मौनात का होते ?  सत्ता बदलली की पुरस्कार देताना साहित्यिक , कलावंत कोणत्या विचारसरणीशी निगडीत आहे हेच पाहिले जाते.  यामुळे भाजप व कॉग्रेसचे राजकारण हे बुध्दीवादीसमाजामध्ये दुही पसरवण्यासाठीच आहे.  पुरस्कार वापर करून सहिष्णुतेचे पाईक आहोत हे सिध्द करण्यासाठी कला पुरेसे माध्यम आहे.
राजकारण्याच्या आखाड्यात उतरून त्यांनी स्वतः ची बभ्रा करू नये व पर्यायाने वाचक व रसिकांनाही कोड्यात टाकू नये. 

ब्रिटनचा दौरा की पर्यटन
पंतप्रधान नरेंद्र मोदी सतत परदेशाचे दौरे करत असल्यामुळे भारतात सध्या मोदी कितीदिवस भारतात असणार आहेत. यावर मटकाबुकी जुगार लावतील. मुळात भारतात प्रशासनावर असलेला पगडा किती दिखाऊ आहे हे याचा प्रत्यय सामान्य भारतीय नागरीक घेत असतात. ब्रिट्नच्या दौ-यामुळे मात्र रशियासारखा मित्र देश चीनकडे झुकत असताना रशियाला एकप्रकारे इशाराच मानावा लागेल. ब्रिटन हा उदारमतवादी देश आपला मित्र राष्ट्र असला तरा साहेबाच्या थाटात राहण्याचे दिवस गेले. यामुळेच आम्हाला उपकार नको बरोबरीची वागणूक द्या हे ठणकावून जगाला सांगितले हे खूप चांगले आहे. सगळ्यात जास्त भारतीय विद्यार्थ्यांच्या व्हिसावर ब्रिटनने निर्णय घेणे आवश्यक आहे. अन्यथा भारतात सुध्दा पर्यायी सक्षम विद्यापीठ उभा राहतील आणि ब्रिटनच्याच विद्यार्थ्यांना भारतात व्हिसासाठी यावे लागेल. किमान आपण अशी अपेक्षा करू या.....


दहशतवाद हा व्हायरसच !
फ्रान्समध्ये आज दहशतवादी हल्ला झाला. याचा अर्थ आपल्या मानवतेवरील धोका अजून टळलेला नाही.   मानवतेमध्ये परस्परामध्ये द्वेषाची भावना वाढविण्यासाठी भीती-दहशत तयार वरून दुर्जन शक्तीचा प्रभाव वाढावा यासाठी अतिरेकी संघटना कार्यरत आहेत. यांना केवळ माणसात आपण जन्मण्यासाठी पात्र नाही आहोत हेच विधात्याला सांगायचे असते हे सांगण्यासाठी क्रुरकर्म करण्यासाठी हिंसेच्या कोणत्याही थराला जातात. या व्हायरसवर देशाच्या धर्माच्या भिंतीपेक्षा माणुसकीची अभेद्य बांधणे जरूरु आहे. वसुधैव कुटुब्मकम हेच ते नाते.
सर्व फ्रान्सच्या म्रुत नागरिकांना मराठी पत्रकारितेकडून श्रध्दांजली ! 

No comments:

Featured Post

मेकॉलची शिक्षणपध्दती किती दिवस व्यवस्थेने पचवायची ?

आठवीच्या वर्गावर भूमितीचा तास चालू होता. प्रमेय समजावून सांगणारे शिक्षक असे मानू या समजू असे सांगून प्रमेयाची सिध्दता समजावून सांगत होते....