Monday, January 28, 2019

विचारसरणीचे खरे पाईक कोण?

पुरोगामी  आणि उजव्या विचारसरणीचे काही गुद्दे
1) पुरोगामी विचारसरणी केवळ ब्राम्हणद्वेषावर केंद्रित होत आहे.
2) उजव्या विचारसरणीचे बळ केवळ धर्मद्वेषावर आधारित आहे.
3) पुरोगामी अथवा विचारसरणीचे समर्थक जे आपल्या विचारसरणीचे चांगले मुद्दे मांडतात. त्यांचा प्रत्यक्ष जीवनाशी त्यांचा संबंध नसतो. तरीही खूप काही असल्याचा आर्विभाव आणतात.
4) हे समर्थक केवळ सोशल मीडियावर दुसर्याचे मुद्दे खोडून काढण्यात धन्य समजतात. यालाच ते सक्रियता मानतात.
5) पुरोगामी स्वत:ला समाजप्रेमी तर उजव्या विचारसरणीचे देशप्रेमी मानतात. पण त्यांच्याकडे समस्यांची उत्तरे नाहीत. उलट तेच अस्तित्वाचे इंधन आहे.
6) दोन्ही विचारसरणीच्या समर्थकांकडे SMARTध्येयाचा  अभाव आहे. त्यामुळे स्वार्थच शेवटी साधला जातो.
7) एकदंरीत दोन्ही विचारसरणी काल्पनिक आहेत.

Friday, January 25, 2019

भारतीयांचे ध्येय सात ते आठपट का असावे?

जगात सर्वात अधिक वेगाने वाढणार्या अर्थव्यवस्थेचे आपण भारतीय एक घटक आहोत. अशा भारतीयांच्या अपेक्षा किती असतात? फक्त आपण पाकिस्तानपेक्षा अधिक प्रगत आहोत, हे मानण्याकडे कल आहे. बरं चित्ती असू द्यावे सुख -समाधान हे तत्वज्ञान असू द्या. पण व्यावहारिक जीवनात आपण काम करत असलेल्या क्षेत्राची किती प्रगती असावी, हे भारतीय म्हणून ठरवायला हवे.
माध्यमाच्या बाबतीत  बोलायचे झालेतर सोशल मीडियाच्या अॅपमध्ये आपण खूप मागे आहोत. जे यशस्वी आहेत, ते देशापुरतेच मर्यादित आहोत. सरकारी वाहिन्या सरकारभोवतालीच घुटमळतात. त्यांना बीबीसी आणि ग्लोबल टाईमसारखे जगभरात जाता आले नाही. खाजगी माध्यमात अजूनही Artificial intelliagnce सारखे तंत्रज्ञान आलेले नाही.

आरोग्य क्षेत्रात टेलिमेडीसन अजून तितकेसे रुजले नाही. सौर उर्जा क्षेत्रात चीनची चंद्राबरोबर स्पर्धा आहे. आपण ईलेक्ट्रीक वाहन निर्मीततही बाल्यावस्थेत आहोत. आपले सरकार आणि आपण स्पर्धेसाठी तितकेसे तयार नाही. राजकीय विचार वेगळे असले तरी आर्थिक विकासावर एकमत असायला हवे. स्पर्धेचे भान तयार यायला हवे. आॅलंपिकमध्ये पदक जिंकायचे आहे, पण पात्रता फेरीपासून कोसो दूर आहोत.
( क्षेत्रनिहाय तुलनात्मक आकडेवारी आणि कच्चा आराखडा तयार करण्याचा प्रयत्न करेन)

Tuesday, January 22, 2019

ईव्हीएम मशीन आणि लोकशाहीचं हॅकिंग

ईव्हीएम मशीनच्या निमित्ताने पुन्हा एकदा लोकशाहीतील गोंधळ जगजाहीर झाला आहे.लोकशाहीचे बरे असते अभिव्यक्ती स्वातंत्र्याबरोबर लोकशाहीच्या पायावरच हल्ले करण्याची सोय असते.

If you want overule them, confuse them. या मार्गाने जसे सत्ताधारी असतात, तसेच त्याच वाटेवरुन विरोधक चालतात. विरोधक  अजनूही  भाजपची नस सापडण्यासाठी चाचपडत आहे. त्यातूनच ईव्हीएम मशिनचे प्रकरण तयार केले जात असल्याचा भाजपचा दावा आहे.

कोणाचे बरोबर आणि चूक आहे हे ठरविण्यापेक्षा मुद्दा काय आहे तपासले पाहिजे. हॅकिंगची दिशा राजकीय कारणाने असो अथवा नसो तांत्रिक मुद्दा अभ्यासाला हवा.

सायबर हॅकरने पाच वर्षे मौन बाळगल्याने त्याच्या हेतूबाबत शंका निर्माण होत आहे. आपल्यावर हल्ला झाल्याचाही त्याने दावा केला आहे. असा प्रकार घडत असताना त्याने एकाही नेत्याचे नाव घेतले नाही ही सगळ्यात आश्चर्याची गोष्ट आहे. याचा दुसरा अर्थ त्याला भारतीय नेत्यांपासून जीवाची भीतीही आहे. अमेरिकेने राजाश्रय दिला असताना भारताने त्यावर दिल्लीत गुन्हा नोंदविला आहे. आधीच लोकशाहीचे धिंडवडे निघाले त्यात राजकीय शहाणपण दाखविण्याची संधीही भारताने गमाविली आहे.

ईव्हीएम मशीन हा लोकशाहीचा टेकू ठरू नये याची काळजी घेतली पाहिजे. ते खोट आहे हे सिद्ध करण्यापेक्षा व्यवस्थेमधील तांत्रिक दोष काढण्याचे प्रयत्न केले पाहिजेत.

ईव्हीएम मशीनमध्ये घोटाळे होत असल्याचे आरोप झाले आहेत. त्यावेळी राष्ट्रीय निवडणूक आयोगान सर्व राजकीय पक्षांना ईव्हीएममध्ये छेडछेड करण्याचे आव्हान दिले होते. मात्र कोणत्याही राजकीय पक्षाने हे आव्हान स्विकारले नव्हते. आपनेही दिल्लीच्या विधानसभेत ईव्हीएम मशीनमध्ये छेडछाड करण्याचा दावा केला. प्रत्यक्षात ते ईव्हीएम मशीन नव्हते असे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले होते.

Friday, January 11, 2019

शिवसेना अन् भाजप युतीचा जांगडगुंता

शिवसेना अजूनही सत्तेत आहे का हे रोज वर्तमानपत्रात पाहावे लागते. कारण सत्तेत असणारी सेना रोजच सामनातून आणि पक्षाध्याक्ष उद्धव ठाकरे न चुकता विरोधी पक्षाहून अधिक प्रखर टीका करत आहे. तरीही सत्तेचा मोह सोडत नाही.

त्यांचे नाते म्हणजे भांडणा-या पती आणि पत्नीचं तर कधी चोरून प्रियकर, प्रेयसी असल्याची टीका होत आहे. हे नाते कसेही असो पण ते भविष्यात विलग होणार असल्याने चर्चा तर होणारच! अर्थात शिवसेना धनुष्यबाण ताणून सातत्याने स्वतंत्र निवडणुका लढविणार असल्याचे जाहीर करत आहे. याला प्रत्युत्तर म्हणून भाजपने शिवसेनेचा रुसवा काढून त्यांच्याबरोबर युती करू असे जाहीर केले आहे. मुळात अशी परिस्थिती का ओढवली याची राजकीय मांडणी जाणून घेतली पाहिजे.

भाजप प्रादेशिक पक्षांचे अस्तित्व फारसे मानत नाही अथवा ठेवत नाही. प्रादेशिक पक्षांबरोबर हातमिळवणी करण्यापेक्षा त्यांच्या मुंडक्यावर बसून राज्यात मजबूत होण्याची भाजपची रणनीती आहे.यामुळेच ओरिसातील बिजू जनता दलाचे नवीन पटनाईक थोडे लांबच थांबून भाजपशी संधान साधतात. दक्षिणेकडील तेलंगणा, तामिळनाडू राज्यांना भाजप प्रादेशिक अस्मितेवर घाला येईल ही भीती सतावते. अशा परिस्थितीत शिवसेनेला भाजपची युती म्हणजे असंगाशी संग वाटली नाही तर नवल काय?
भाजपच्या विरोधात शेतक-यांमध्ये प्रचंड असंतोष आहे. याचा फटका आगामी निवडणुकामध्ये बसू नये यासाठी शिवसेना काळजी म्हणून भाजपवर टीका करत आहे. सर्वसामान्याबरोबर शेतक-यांना आम्ही तुमच्याबरोबर आहोत हे दाखवून देण्याचा प्रयत्न आहे.त्याचबरोबर विरोधी पक्षाची धार कमी केली जात आहे. शिवसेनेला एकाचवेळी सत्ता उपभोगून विरोधी पक्षाची भूमिका वठवायची आहे, हे दुधारी तलवारीसारखे आहे.

शिवसेनेचा मराठीचा मुद्दा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने हाताळायला सुरुवात केली. या मुद्द्यावर कधीही नव्हे ते शिवसेनेला स्पर्धक तयार झाली आहे. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर शिवसेनेहून अधिक भाजपची पकड आहे. या मुद्द्यावर भाजप महाराष्ट्रातील खुंट्या अधिक बळकट करत आहे. यातून भविष्यात शिवसेनेला आव्हान निर्माण केले जावू शकते. शिवसेना आणखी पावले उचलणार असेल तरच अस्तित्व टिकणार आहे.

Wednesday, January 9, 2019

शबरीमालाच्या दर्शनाने कोणाचे उघडणार डोळे?

कोणतीही समस्या अथवा वाद राजकारणाच्या वळणावर  पोहोचला तर मूळ समस्या काय याचा अधिक गुंता होतो. त्यात आपल्याला भारतीय म्हणून भावनिक जास्त तर्काच्या चष्म्यातून कमी पाहण्याची सवय यामुळे शबरीमालातील दर्शनाचा विषय आंधळ्याने पाहिलेला हत्ती झाला आहे.

शबरीमाला म्हणजे अय्यपा स्वामींचं मंदिर! अय्यपा स्वामींचे भक्त अत्यंत कठोर व्रत करत एकेक पायर्या करत शेवटी दर्शन करतात. व्रत करताना अनेकांना केवळ पायर्याचे दर्शन घेताना काही वर्ष लागतात, तेव्हा दर्शनाची गोष्ट म्हणजे आव्हान असते. म्हणजे व्रत करणार्या भाविकांनी स्वत:वरच श्रद्धेने कठोर बंधन घातलेले असते. यालाच  बुद्धिवादी कर्मठपणा म्हणतात. मात्र या काळात जसे आपल्याकडे वारकरी  माऊली म्हणतात, तसे हे अय्यपा भक्त प्रत्येकाला स्वामी म्हणतात. मग स्त्रीयांकरिता मंदिर प्रवेशाचा वाद कोठून येतो ?

स्रीयांवर अन्याय होतो व त्यांना समान हक्क डावलला जातो, असा आरोप केला जातो. त्यासाठी मी टूसारख्या चळवळी केल्या जात आहेत. प्रत्यक्षात अशा गोष्टी चुकीच्या ठिकाणी लागू केल्याने अतिरेक होताना दिसत आहेत. मंदिरात स्रियांना प्रवेश नाही, म्हणजे अन्याय नसून श्रद्धेचा भाग आहे. आपल्याकडे हनुमानाच्या मंदिरात अजूनही स्रिया जात नाहीत. कारण हनुमान हा ब्रह्मचारी असल्याची भावना आहे. दुर्दैवाने श्रद्धेचे निकष हे वैज्ञानिक निकषावर पाहता येत नाहीत. त्यामुळे या दरीचा राजकीय आणि समाजकंटक पुरेपूर गैरवापर करतात. समाजातील प्रतिगामी आणि पुरोगामी यांच्यातील विषाची बीजे येथेच रोवली आहेत.
गंमत म्हणजे देशातील काही मंदिरात पुरुषांना प्रवेश नाही. पण पुरुषांनी आम्ही राक्षसं अन् स्रिया या फक्त देवी असा वाद करत आंदोलने केली नाहीत.

मग हा वाद सोडवायचा कसा?
कर्मठ लोकांना मंदिरातील महिला प्रवेश नाकारणे हा सुधारणांना विरोध करण्याची संधी वाटत असेल तर हा प्रयत्न हाणून पाडायला पाहिजे. त्याचबरोबर  भाविकांच्या श्रद्धेचा आदर राखला पाहिजे. किमान व्रताच्या निमित्ताने अनेकजण व्यसनमुक्तीच्या मार्गाला लागत असतात.राहिला प्रश्न मंदिरातील महिला प्रवेशाचा! महिलावर अन्याय करणारी बाब नाही ही समजून घेतले पाहिजे. उद्या बारमध्येही आम्हाला आरक्षण द्या, अशी मागणी केल्यास त्यावरची प्रतिक्रिया काय असेल हे निश्चित करावे लागेल.
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एकाच मंदिरात प्रवेश नाकारल्याने महिलावर अन्याय होत असल्याचे चित्र रंगविले जात आहे. दुसरीकडे इतर धर्मात महिलांना प्रार्थनास्थळात प्रवेश नाकारला जातो, यावर सर्वोच्च न्यायालयाचेदेखील मौन आहे.

Featured Post

मेकॉलची शिक्षणपध्दती किती दिवस व्यवस्थेने पचवायची ?

आठवीच्या वर्गावर भूमितीचा तास चालू होता. प्रमेय समजावून सांगणारे शिक्षक असे मानू या समजू असे सांगून प्रमेयाची सिध्दता समजावून सांगत होते....