Friday, January 10, 2020

माणसातले प्रोग्रॅमिंग आणि नवा व्हायरस...

सरकारने आणललेला नवा कायदा झालाच पाहिजे. या घोषणा देताना  आशिष कार्यकर्त्यांना घेवून विद्यापीठासमोर थांबला होता. कार्यकर्त्यांचा उत्साह टिकवून ठेवण्यासाठी त्यांना भडकावणे आशिषला महत्त्वाचे वाटत होते. पण भरदुपारी १२ वाजता उन्हामुळे कार्यकर्त्यांना नीटसे उभा राहवत नव्हते. त्यात कॅमेरामॅन आणि सतत फिरणाऱ्या फोटोग्राफरमुळे त्यांना अलर्ट राहावे लागत होते. ढिले राहून जमणार नव्हते  ओढूनताणून घोषणा देणाऱ्या कार्यकर्त्यांची दमछाक सुरू होती. तेवढ्यात एका वृत्तवाहिनीचा पत्रकार व कॅमेरामॅन तिथे पोहोचला. आशिषसाठी तो हक्काचा माणूस होता. कारण मोर्चात कमी माणसे असली तरी गर्दी दाखविणारे व्हिज्युअल्स काढण्याची कॅमेरामॅनची हातोटी होती. कॅमेराकडे पाहत कार्यकर्त बेंबीच्या देठापासून ओरडत होते. पक्षाचे वरिष्ठ नेते खूष होतील अशा विचाराने आशिषला कष्टाने चीज झाल्यासारख वाटत होते.

सवयीने त्याने स्मार्टफोन हातात घेवून चाळवायला सुरुवात केली. त्याच्या पक्षाचे फॉलोअर्स नेते व कार्यकर्त्यांच्या व्हॉट्सअॅपवर काय अपडेट आहे का, हे तो पाहत होता. त्याने आंदोलनातील काही फोटो व्हॉट्सअॅप ग्रुपवर टाकले. काहीजणांनी त्याला लाईकचे इमोजी टाकत दिलासा दिला.
'सरकार हायहाय'च्या घोषणा त्याच्या कानावर पडल्या. सगळे कॅमेरामॅन व पत्रकार त्या दिशेने धावत सुटले. आशिषने स्मार्टफोन ठेवावा, तसा विचार करेपर्यंत एका ग्रुपवर ट्विटलिंक असलेली आदिती या कार्यकर्तीचा फोटो टाकला होता. आशिषने ती लिंकवर टिचकी मारुन पाहिले, हातात लोकशाही वाचवा लिहिलेला तो फलक होता. त्याच्या तळपायाची आग मस्तकात गेली. लोकशाहीला वाचवा म्हणणारी ही कोण?

आशिषने हॅशटॅग केलेले तिचे अकाउंट शोधून काढले . पण त्यावर फोटो स्पष्ट दिसत नव्हता. तिच्या आंदोलनातील अपडेट पोस्टखाली अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली. त्याला खूप बरे वाटले. काहीजणांना शिव्या देताना बरे वाटते, हे तो गेल्या काही वर्षात पक्षात आल्यापासून शिकला होता. सरकार मुर्दाबाद, लोकशाही बचाव आदिती आणि तिच्या कार्यकर्त्यांच्या घोषणा सुरू होत्या. आशिष त्यांच्या मोर्चावर चालून जाण्यासाठी विचार करत होता.

'ये काय बघताय घ्या दगडं अन् फोडा यांची डोकी. सरकारपेक्षा त्यांना जास्त कळतय का'.
काही समजायच्या आत आंदोलन करणाऱ्या आदितीच्या डोक्यात दगड बसला. डोक्यातून रक्त सांडायला लागल्यानंतर आजूबाजूचे कार्यकर्ते चवताळले. त्यांनी दगड हातात घेण्यास सुरुवात केली. आदितीने जखमी अवस्थेत त्यांना सांगितले की, तुम्हाला तुमच्या आदिती ताईची शपथ आहे. एकानेही दगडफेक करायची नाही. आपले आंदोलन अहिंसेने झाले पाहिजे.

इकडे आशिष आणि त्याचे कार्यकर्ते जिंकल्याच्या आनंदात होते. आपण यांना आंदोलन मागे घ्यायला भाग पाडू, असा आशिषला विश्वास वाटू लागला. गर्दीतील एका कार्यकर्त्याने आदिती पाटील हम तुम्हारे साथ है,  असा हातात फलक घेत घोषणा चालू केल्या. यावेळी आशिषला दोन गोष्टींचा धक्का बसला. त्या आंदोलकांना दगडांची  भीती वाटत नव्हती.  दुसरे म्हणजे सर्वात धक्क्याची गोष्टी म्हणजे आदिती पाटील या नावाची!


११ वी विज्ञान शाखेत आल्यापासून सॉफ्टवेअर इंजिनिअर होणार असल्याचे आत्मविश्वासाने सांगणारी आदिती त्याला आठवली. पण ही आदिती तर कोणत्यातरी सामाजिक संघटनेची कार्यकर्ती दिसत होती. माणूस वयाने व पदाने कितीही मोठा झाला तरी त्याला जुन्या आठवणी व प्रिय माणसे एक अदृश्य शक्तीने बांधून टाकतात.  लहान मुलाने धाव घ्यावी तशी त्याने आदितीच्या दिशेने धाव घेतली. एका झाडाच्या बुंध्याखाली डोके गच्च धरून ती  बसली होती. चेहऱ्यावर वेदना होत्या. पण संघर्षाचे तेज चेह-यावर दिसत होते. जवळपास १५ वर्षानंतर ते दोघे समोरासमोर भेटत होते.

आशिषचे केस विरळ झाले असली तरी लांबसडक नाक ही त्याची ओळख होती. तर आदितीचे मोठे डोळे पाडून दाक्षिणात्य अभिनेत्रीसारखा तिचा लूक वाटत होता. पण नजर एकमेकांना भीडली. तर दोघांनाही एकमेकांची ओळख पटली. खरेच डोळ्यांची भाषा आणि कधीच विसरणारी नसते.
आशिष- तू
आदिती-  तू
आशिष - अरे हा, प्रश्न
आदिती - हो, हा  प्रश्न जावू दे. काय आंदोलन करतोस तू हे...
आशिष ० सॉरी तुझ्या डोक्याला दगड लागला आहे. माझे फॅमिली डॉक्टर जवळच राहतात. तुझ्यावर मलमपट्टी करू.
आदिती-मलमपट्टी माझ्या डोक्याला नाही, सरकारच्या डोक्याला करायची आहे. ती रागाने म्हणाली.
आशिष- हे बघ, तुझ्यासारखेची मुलीने स्वत:ची काळजी घ्यायला हवी.
आदिती - आशिष, अरे पण दगडफेक तुझ्याच बाजूने झाली. तू काय करतोस तिथे तुझ्यासारखा सुसंस्कृत मुलगा अशा गावगुंडात कसा मिसळला. हेच कळत नाही.

आदितीचे ते शब्द ऐकून आशिष जागेवरच थबकला. त्याला आठवले, देश व धर्माचे गोडवे गाताना कधी कट्टरवादी लोकांकडे वळलो, हेच कळाले नाही. दुसऱ्या धर्माच्या कट्टरवादाकडे नाव ठेवता ठेवता आपणही तसचे झालो आहोत, याची पुसटशी जाणीव झाली.  कंत्राटदार म्हणून सरकारी कामे मिळविताना त्याने
पक्षाची कामे सुरू केली.
 आदिती  - काय विचार करतोस तू? मला वाटतं तुझे वक्तृत्व गुण पाहून त्यांनी तुला बोलाविले असेल येथे.
आशिष- मी आता या पक्षाचे  काम करते आहे अन् तू?
आदिती - मी जस ठरवले, तशी सॉफ्टवेअर इंजिनिअर झाले. पण आठवत का, तुला? भारतीय लोकशाही जगात श्रेष्ठ या विषयावर केलेले तुझे भाषण.. आज सॉफ्टवेअर अभियंता म्हणून असले तरी भारतीय आहे. तुझे भाषण आजही जसेच्या तसे आठवते.

आशिष वरमला. तो बदलला पण आदिती आजही तशीच होती.
आदितीने हातात स्मार्टफोन घेतला. तिच्या लोकशाहीवरच्या पोस्टवरील अपडेट कमेंट ती वाचत होती. त्याखाली आशिषने शिव्यांची लाखोली वाहिलेली होती. ते पाहून आदितीला धक्काच बसला.

आदिती- आशिष हे बघ, माणूस हा पहिल्यांदा भारतीय असतो. सोशल मीडियावरून त्याबाबत मत बनवू नये. तुला शंका आहे का माझ्या देशभक्तीबद्दल?
आशिषला काय बोलावे हे सूचेना. घामाने डबडबलेला चेहरा त्याने रुमालाने पुसला. भलीमोठी वेगाने होणारी बांधकामे झरझर वेगाने कुणीतरी दोघांमध्ये निर्माण करत असल्यासारखा त्याला भास झाला.
त्या प्रचंड इमारतीच्या ओझ्याखाली दबतोय, अशा भावनेने त्याला तिथे थांबणे शक्य होत नव्हते. एका
कार्यकर्त्याने त्याला कानात हळूच सांगितले, केंद्रीय मंत्र्यांचा उद्या मतदारसंघात दौरा आहे. त्यामुळे उद्या कार्यक्रमासाठी माणसे वेगाने गोळा करावी लागणार होती.
आशिषने नमस्कार करत तिचा निरोप घेतला. माणसांचे प्रोग्रॅमिंग करता येत नाही. पण चांगली नाती ही पुलासारखी आयुष्याचा प्रवाह अखंड धरून ठेवतात. आदिती बदलेल्या आशिषला जाताना पाहून विचार करत होती, माणसांचे प्रोग्रॅमिंग एवढे किचकट कोण करते आहे, हा तिला प्रश्न सतावत होता. एखादा मालवेअर माणसाच्या मेंदूत शिरल्यासारख्या आशिषला पाहून ही भेट झालीच नसती तर बरेच झालेच असते, असे तिला वाटू लागले.

Friday, July 5, 2019

केंद्रिय अर्थसंकल्प काय घडणार

आलिशान कार उत्पादकांसह सोने आयात करणार्या व्यापार्यांनी व सर्वच क्षेत्रातून कर सवलतीची मागणी होत आहे. दुसरीकडे वित्तीय तूट वाढत असल्याने अर्थव्यवस्थेवर प्रचंड दबाव निर्माण होत आहे. अशावेळी सरकारी खर्च कमी करणे तर सर्वच क्षेत्रांवर निर्यातवाढीची जबाबदारी येते.

प्रत्यक्षात देशातील मोठी बाजारपेठ आपल्या उद्योगांना सहज उपलब्ध असल्याने त्यांना निर्यातीची भूक नाही.
कर सवलती देवू, पण आधी निर्यात वाढवा असे धोरण राबविण्याचे धाडस अर्थसंकल्प दाखवणार का?
उच्चस्तरीय समितीचे अध्यक्ष सुरजित भल्रा यांनी निर्यात वाढीसह विदेशी गुंतवणुकीच्या नियमात सुलभता आणण्याचे उपाय सुचविले आहेत. या उपायांची सरकारने अमंलबजावणी करावी, अशी शिफारस आर्थिक पाहणी अहवालात करण्यात आली आहे.

तंबाखूसह इतर उत्पादनांवर सिन टॅक्स लावण्यात येतो. देशातील तंबाखू ही उच्च दर्जाची आहे. चीनमधून मागणी असून ही बाजारपेठ खुली होण्यासाठी केंद्रिय वाणिज्य मंत्रालय प्रयत्न करत आहे. त्यामुळे तंबाखू निर्यातीला प्रोत्साहन देणारी घोषणा होवू शकते.
जीएसटी परिषदेकडे वस्तू व सेवा करात बदलण्याचे अधिकार आहेत.

केंद्रिय अर्थसंकल्पात निर्यात वाढीला प्रोत्साहन देणा-या विविध योजना जाहीर होण्याची शक्यता आहे. सूक्ष्मजलसिंचनावर वाढीव अनुदान

Tuesday, May 21, 2019

नथूराम हे तर निमित्त आहे,खरा उद्देश्य वेगळाच

नथुरामची बाजू घेताना इतिहासाचा आणि मुख्य म्हणजे त्या काळातील राजकारणाचा विचार करायला हवा.
1) इंग्रजाचे फोडा आणि राज्य करा असे धोरण होते. त्यानुसार इंग्रजांनी जात-धर्मातील भेदभाव वाढतील असे धोरण राबवून स्वातंत्र्यासाठी एकी होवू दिली नव्हती.
2) महात्मा गांधींच्या युगात मुस्लिमांनी स्वातंत्र्य चळवळीतील हिरिरीने भाग घेतला. त्यांच्या नेतृत्वाने सर्व समाज व देशाला एकसंघ केले.
3) जसजसे स्वातंत्र्य दृष्टीपथात येवू लागले. तसे बॅ.अली जीना यांची राजकीय महत्त्वाकांक्षा जागृत झाली. त्यांनी मुस्लिमांसाठी स्वतंत्र देशाची मागणी केली . याला सुरुवातीपासून महात्मा गांधींचा विरोध होता.
4)नेमस्तपणाने मागण्या मान्य होत नाहीत, हे लक्षात आल्यावर जीनांनी आपल्या अनुयायांना आक्रमक होण्याचे आदेश दिले.
5) त्याचा परिणाम म्हणून बंगालसारख्या राज्यात दंगली भडकाविण्यात आल्या. दोन्ही समाजातील दंगली केवळ पाकिस्तानच्या निर्मितीनंतर थांबवू शकतात, हे जीनांनी चित्र तयार केले.
6) तेव्हाचे गव्हर्नर यांनीही पाकिस्तान निर्मितीला मंजुरी दिली होती. पेटलेला देश पाहून गांधींनी पाकिस्तान होण्याला परवानगी दिली.
7) गोपाळ  गोडसेंचे 55 कोटींचे बळी हे पुस्तक शालेय विद्यार्थ्यांना भ्रमित करण्यासाठी पुरेसे आहे. भारताने पाकिस्तानला करारानुसार 55 कोटी देणे भाग होते. स्वतंत्र भारताचा हा पहिला करार देशाने पाळला नाहीतर जगात प्रतिष्ठा राहणार नाही, अशी गांधीजींची भूमिका होती. पाकिस्तानबरोबर भारताची युद्धे झाली. तरीही भारताने कित्येकवर्ष पाकला मोस्ट फेव्हर्ड नेशनचा दर्जा दिला होता. तेही कोट्यवधींचे नुकसान सहन  करुन!

Saturday, May 18, 2019

नथुराम गोडसेला देशभक्त ठरविणे का फायद्याचे आहे?

1) नथूराम गोडसे या माथेफिरुने महात्मा गांधींचा खून नव्हे वध केल्याचे ठरविणे सोपे जाते. वध हा दुष्टांचा असतो. त्यामुळे महात्मा गांधी यांना खलनायक ठरवून त्यांच्या विचार प्रसाराला आळा घालता येतो.
2) नथुराम हा हिंदुराष्ट्रासाठी काहीही करू शकतो, तेव्हा असा आदर्श तरुणांसमोर ठेवून
बुद्धीभ्रम करणे त्यांना भडकविणे सोपे जाते.
3) बुद्धी अथवा संवादाहून हिंसाचार योग्य आहे, हे एकदा मनात व बुद्धीत बिंबवल्यास अशा व्यक्तींना कठपुतळीसारखे आॅपरेट करणे सोपे जाते.
4) महात्मा गांधींचे अथवा इतर महापुरुषांचे विचार तरुणाईला कळाल्यास ते स्वतंत्र विचार करण्याची भीती असते. त्यामुळे जो इतिहास आहे तो खोटा असे सांगुन मनाच्या कथा जोडता येतात.

Friday, February 15, 2019

पुलावामासारखे हल्ले रोखण्यासाठी कायमस्वरुपी उपाय आहेत!


1) दहशतवाद्यांंची स्थानिक मदत पूर्ण तोडून टाकणे

370 चे कलम हे काश्मीरचे वैशिष्टये जपण्यासाठी आहे. पण अनेकदा स्थानिक लोकच दहशतवाद्यांंना मदत करतात. स्थानिक लोकांंचा दावा आहे की रोजगार आणि इतर सुविधा सरकार देत नाही. स्थानिक लोकांंमधूनच आजवर कट्टर दहशतवादी झाले आहेत.

असे असताना काश्मीरच्या संंरक्षणासाठी अख्खा भारत रक्तबंंबाळ होतोय.मग त्यावर ठोस उपाय काय?

2) प्रत्येक काश्मीरी घरातील व्यक्तीला सैन्यात नोकरी देणे. हा नियम सक्तीने लागू करावा. यामुळे काय घडेल?

रोजगाराची समस्या सुटेल. दहशतवाद्यांंना मदत केल्यास आपल्याच घरातील व्यक्ती मरेल,ही भीती असल्याने सैन्याला सहकार्य होईल.

3) गुप्तचर विभागाचा राजकीय वापर थांबविणे
जर इंटेल ब्युरो अथवा सीबीआयसारख्या गुप्तचर संस्था राजकीय नेत्यांचे फोन टेप करण्यासाठी गुंग असेल तर यावेळेचा गैरफायदा दहशतवादी घेण्याची शक्यता असते. पुलावामा हल्ल्यापूर्वी गुप्तचरांनी अलर्ट देऊनही डोळेझाक झाली. असे होवू नये याकरिता पर्यायी अंमलजावणी यंत्रणा तयार करायला हवी.
विकास आणि रोजगार निर्माण झाल्यास काश्मीर नंंदनवन कायस्वरुपी होईल.

4) फुटीरतावादी नेत्यांना सीमेनजीक घरात राहणे बंधनकारक करावे. जर पाकिस्तानने शस्त्रसंधी मोडल्यानंतर त्यांच्या घरावर तोफगोळे आणि गोळीबार केला तर फुटीरतावादी नेत्यांच्या समर्थकांना हे Live प्रक्षेपण दाखवावे.

5) पाकिस्तानची मुख्य आर्थिक रसद ही चीन पुरविते. चीनची व्यापारी कोंडी करायला हवी. त्याशिवाय चीन वठणीवर येणार नाही.

Monday, January 28, 2019

विचारसरणीचे खरे पाईक कोण?

पुरोगामी  आणि उजव्या विचारसरणीचे काही गुद्दे
1) पुरोगामी विचारसरणी केवळ ब्राम्हणद्वेषावर केंद्रित होत आहे.
2) उजव्या विचारसरणीचे बळ केवळ धर्मद्वेषावर आधारित आहे.
3) पुरोगामी अथवा विचारसरणीचे समर्थक जे आपल्या विचारसरणीचे चांगले मुद्दे मांडतात. त्यांचा प्रत्यक्ष जीवनाशी त्यांचा संबंध नसतो. तरीही खूप काही असल्याचा आर्विभाव आणतात.
4) हे समर्थक केवळ सोशल मीडियावर दुसर्याचे मुद्दे खोडून काढण्यात धन्य समजतात. यालाच ते सक्रियता मानतात.
5) पुरोगामी स्वत:ला समाजप्रेमी तर उजव्या विचारसरणीचे देशप्रेमी मानतात. पण त्यांच्याकडे समस्यांची उत्तरे नाहीत. उलट तेच अस्तित्वाचे इंधन आहे.
6) दोन्ही विचारसरणीच्या समर्थकांकडे SMARTध्येयाचा  अभाव आहे. त्यामुळे स्वार्थच शेवटी साधला जातो.
7) एकदंरीत दोन्ही विचारसरणी काल्पनिक आहेत.

Friday, January 25, 2019

भारतीयांचे ध्येय सात ते आठपट का असावे?

जगात सर्वात अधिक वेगाने वाढणार्या अर्थव्यवस्थेचे आपण भारतीय एक घटक आहोत. अशा भारतीयांच्या अपेक्षा किती असतात? फक्त आपण पाकिस्तानपेक्षा अधिक प्रगत आहोत, हे मानण्याकडे कल आहे. बरं चित्ती असू द्यावे सुख -समाधान हे तत्वज्ञान असू द्या. पण व्यावहारिक जीवनात आपण काम करत असलेल्या क्षेत्राची किती प्रगती असावी, हे भारतीय म्हणून ठरवायला हवे.
माध्यमाच्या बाबतीत  बोलायचे झालेतर सोशल मीडियाच्या अॅपमध्ये आपण खूप मागे आहोत. जे यशस्वी आहेत, ते देशापुरतेच मर्यादित आहोत. सरकारी वाहिन्या सरकारभोवतालीच घुटमळतात. त्यांना बीबीसी आणि ग्लोबल टाईमसारखे जगभरात जाता आले नाही. खाजगी माध्यमात अजूनही Artificial intelliagnce सारखे तंत्रज्ञान आलेले नाही.

आरोग्य क्षेत्रात टेलिमेडीसन अजून तितकेसे रुजले नाही. सौर उर्जा क्षेत्रात चीनची चंद्राबरोबर स्पर्धा आहे. आपण ईलेक्ट्रीक वाहन निर्मीततही बाल्यावस्थेत आहोत. आपले सरकार आणि आपण स्पर्धेसाठी तितकेसे तयार नाही. राजकीय विचार वेगळे असले तरी आर्थिक विकासावर एकमत असायला हवे. स्पर्धेचे भान तयार यायला हवे. आॅलंपिकमध्ये पदक जिंकायचे आहे, पण पात्रता फेरीपासून कोसो दूर आहोत.
( क्षेत्रनिहाय तुलनात्मक आकडेवारी आणि कच्चा आराखडा तयार करण्याचा प्रयत्न करेन)

Featured Post

मेकॉलची शिक्षणपध्दती किती दिवस व्यवस्थेने पचवायची ?

आठवीच्या वर्गावर भूमितीचा तास चालू होता. प्रमेय समजावून सांगणारे शिक्षक असे मानू या समजू असे सांगून प्रमेयाची सिध्दता समजावून सांगत होते....