Monday, April 13, 2015

Ghuman Marathi Sahitya Sanmelan, घूमानच्या निमित्ताने मराठी साहित्यसुगंधाचा घमघमाट...


घूमानच्या निमित्ताने
 मराठी साहित्यसुगंधाचा घमघमाट...


१) गरीबाच्या घरचे लग्न असले कि एखादा श्रीमंत माणूसही तिथे होणारा पाहूणचार पाहण्यापेक्षा त्यांची आपुलकी व स्नेहाने भरून पावतो. भले तिथले जेवण खूप चविष्ट नसले तरी साधेपणातील गोडवा जेवणातही त्याला जाणवतो.
 २) श्रीमंताच्या घरचे लग्न असले की कितीही चांगला  मेनू दिला किंवा मनोरंजनाचे कार्यक्रम ठेवले तरी कमीच असल्याची कुरबुर असते. तिथेही आपुलकी व स्नेह असला तरी बहुतेकांचे लक्ष श्रीमंती थाटाकडे असते. 
साहित्य संमेलन म्हणजे लग्नसोहळ्यासारखे प्रतिभाशक्ती व वाचकांच्या आवडीचे असेच मनोमिलन होत असते.  मराठी साहित्यप्रेमी वाचकांना खरेतर काय हवे आहे ? चांगली पुस्तके पहायला मिळावीत... साहित्यप्रवाहात भर घालणारे नवीन तसेच जुन्या  नामवंत प्रकाशन स्टॉलला भेट द्यावी...
साहित्यावर काहीतरी चांगले कानावर पडावे...!  हे कधीच कुणी विचारत नाही. जो तो उठसूठ साहित्य संमेलनावर आणि अनेक हुशारमंडळी टीका करतात. सगळेच व-हाडी होत असल्याने मात्र प्रतिभाशक्ती व वाचकांच्या आवडीला कोणीच वाली राहत नाही....! 
साहित्यसंमेलनात प्रवासव्यवस्था झाली नाही किंवा वेळेवर बुकिंग झाले नाही असे मुलभुत समस्या चांगल्या व्यवस्थापनाने सोडवणे आवश्यक आहे.  याची चर्चा चव्हाट्यावर करून साहित्य संमेलनाचे अवमूल्यन रोखले पाहिजे. अन्यथा साहित्य रसिकांनाही गांभीर्यही राहत नाही व सगळी यंत्रणाच हास्यास्पद ठरण्याची भीती असते. प्रत्येक साहित्य संमेलनाला हे घडत आहे.घूमान साहित्यसंमेलन पंजाब मध्ये संत नामदेवांच्या कर्मभुमी घुमानमध्ये आयोजित केल्याने वैशिष्ट्यपूर्ण ठरले आहे.  भाषा ही माणसाला मिळालेले सर्वात श्रेष्ठ वरदान आहे. यामध्ये मिळालेले ज्ञान व अभिव्यक्ती, प्रतिभेतून खुललेला साहित्याचा खजिना हा अनमोलच असतो. मात्र आपण माणस ही भाषा संकुचित करून टाकतो.  मराठीचा प्रसार व प्रचार करण्यासाठी  पुस्तके कसलेल्या राजदुताची भुमिका बजावत आहेत. त्यामुळे चांगल्या लेखकांना व प्रकाशनांना प्रोत्साहनात्मक वातावरण निर्माण व्हावे.यासाठी साहित्य संमेलन आवश्यकच आहेत. साहित्य संमेलनातून मात्र वाचकांच्या अपेक्षा जाणून घेणे आवश्यक आहे. शेतात भाजीपाल्यांचे मळे पिकवत  साहित्य लेखन-वाचन करणारा वर्ग आहे. तसाच आयटीतील वाचकवर्ग आहे. पण याची दखल कोण घेणार ?   बुध्दीवादी म्हणवणारे अनेक लोक उगीच आपली मक्तेदारी दाखवितात.  त्यांनीही आपण केवळ साहित्याची पालखी वाहणारे भोई ( विनम्र सेवेकरी) आहोत अशी  भावना व्यक्त करायला हवी. 
अनेक वाचनालय अजूनही साठ-सत्तरच्या दशकात आहेत. हायटेकच्या जमान्यात ती बदलणे आवश्यक आहे . मराठी पुस्तकांची अनेक वाचनालये बहुतेक कागदोपत्रीच असून अनुदान लाटत आहेत.
वि.स.खांडेकर यांची ययाती चीनी भाषेतही भाषांतरीत केली तर त्यालाही चीनी जाणकार साहित्यिकातून स्वागतच केले जाईल. किमान भारतीय मातीत असणा-या भाषांना एकत्रित करणारे असे सशक्त व्यासपीठ का नाही ? ही खंत  एक भारतीय म्हणुन वाटते .  मराठी वाचवा ही मोहिम आवश्यक आहे. पण त्यातून केवळ वैफल्य दाखविण्यापेक्षा मराठीला ज्ञानभाषा करण्यासाठी पाऊले टाकणे आवश्यक आहे. त्यासाठी मराठी साहित्य म्हणजे ललित, कथापुरते मर्यादीत राहू नये.अनेक  विषयावरचे ज्ञान उपलब्ध करून देणारे भांडार झाले तर मराठीचा कायापालट होईल.घूमानच्या निमित्ताने मराठी साहित्यसुगंधाचा घमघमाट अधिक पसरत जावा हीच सदिच्छा ! 

Monday, March 30, 2015

INDIA SUPER POWER---- भारत होईल महाशक्ती!


भारत महाशक्ती होण्यासाठी आरोग्य, शिक्षण,संरक्षण, शेती, उद्योग,लघुउद्योग, संशोधन, क्रीडा अशा सर्व क्षेत्रात एक व्हिजन दूरगामी धोरण ठेवून प्रयत्न आखणे गरजेचे आहे.
या क्षेत्रामध्ये सर्वो्च्च असे मनुष्यबळ विकसीत करणे व त्यांचा वापर करून देशाच्या विकासाचा रथ जोरात चालविणे शक्य होणार आहे. सर्वात आश्चर्याची आणि हास्यास्पद
एक गोष्ट आपल्या देशात पहायला मिळते. भारत महाशक्ती कसा होणार नाही हे सांगण्यासाठी अनेक विविध क्षेत्रातील विद्वान त्यांची बुध्दीमत्तापणाला लावतात. पण जे तज्ञ भारत महाशक्ती होण्यासाठी नेमके काय करता येईल हे सांगू शकत नाहीत. त्यांचे ज्ञान काय कामाचे ? त्यामुळे ज्ञानाचे उपयोजन ( अप्लाईड नॉलेज) करता येणे आवश्यक आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थी आजही खूप हुशार असतात. पण त्यांना पैलू पाडण्याचेच काम होत नाही. आपल्याकडे केवळ घोकमपट्टीचे शिक्षण शिकविले जाते. सध्याचा जमाना हा नावीन्यपुर्ण आणि संशोधनवृत्ती असलेल्या तरूणाईचा आहे. रोज बदलणारे तंत्रज्ञान, नवीन लागणारे शोध यांचा मारा एवढा आहे की त्यासाठी आपण अपडेट तर राहिलेच पाहिजे. शिवाय हे सर्व आपण का करू शकत नाही याचा विचार करायला हवा. किती दिवस मॅकोलेचे कारकुनी शिक्षण,  पोटभरणारे रोबोटिक शिक्षण विद्यार्थ्यांच्या माथी मारणार आहोत. रामानुजनच्या वाटेवर जाणारे गणीतज्ञ विद्यार्थी का तयार होत नाहीत ?
विद्यार्थ्यामध्ये चिकित्सक वृत्ती वाढवायची सोडून शिक्षक, पालकवर्गही पास व्हायचे असेल तर जास्त विचारू नकोस. परिक्षेत मार्क घ्यायचे आहेत ना ? मग जास्त विचारू नकोस असा सल्ला देतात. विद्यार्थ्यांमध्ये प्रयोगशीलता, चाकोरीबाह्य विचारसरणीचे शिक्षण दिले जात नाही. याला काय कारण आहे ? एखादा नवा जिल्हा झाला हे माहित असूनही परिक्षेत मात्र पुस्तकातील जिल्ह्यांची संख्या विद्यार्थ्यांना लिहणे अनिवार्य असते. ही आपली शिक्षणपध्दती !टीका करण्यापलीकडे जावून सांगायचे झाले तर विद्यार्थ्यांचे ज्ञान , आवड लक्षात घेवून तसे त्याचे व्यक्तीमत्व खुलवायला हवे.  बोन्साय झाड नको तर वटवृक्ष व्हावा. कारण खुंटलेला विद्यार्थी आयुष्यभर नकारात्मकतेचे ओझे वाहत राहतो. समाजच त्याच्यासाठी गुन्हेगार बनतो.
आपल्याला चीन, हिंदुस्थान व अमेरिका या तीन देशाचे मॉडेल वापरावे लागणार आहे. अमेरिकेचे सूत्र आहे. सर्वोत्तम ज्ञान , संशोधन याला चालना देणे. त्यामुळेच भारतातील अत्यंत हूशार संशोधक, विद्यार्थी तसेच यांचे ज्ञान भारताला कसे उपयोगी पडू शकेल यासाठी थिक टॅंकची उभारणी करावी लागणार आहे.
चीन हे नेहमी प्रतिस्पर्धी देशाच्या तुलनेत नेहमी तीन ते चार पटीत पुढे जा व विकास किती झाला आहे याचे प्रदर्शन करण्याऐवजी नेहमीच त्याला बेसावध ठेवा.
आंतराराष्ट्रीय व्यापार अत्यंत आक्रमतेने करून देशाची आर्थिकव्यवस्था डळमळीत करणे व संबधीत देशाला विस्तारवादी धोरण व व्यापार अशा दुहेरीचक्रात गुंतवून ठेवणे हा आहे.
जग खरेच युध्दाने नव्हे तर प्रेमाने जिंकता येते. भारतीय जगात जेथे जातात. तिथील देशाशी कधीच बेईमानी करत नाहीत. दुस-यांचा आदर व सन्मान करतात. हिंदुस्थानी सर्व साहित्य, संगीत, नृत्य, तसेच विविध खाद्यसंस्कृती , सण म्हणजे मानवी जीवनातील अत्यंत उच्चकोटीचा आविष्कार आहे. भले आपल्याला त्याची किंमत नसेल, पण जगात सर्वत्र त्याचे चाहते आहेत.
जागतीकीकरणाच्या रेट्यात अस्सल अशा गोष्टीचे महत्व वाढत आहे.
योग, विपशना अशा सर्व गोष्टींचे आपण ब्रॅडींग केलेच पाहिजे. अन्यथा इतर देश कालांतराने त्याचे श्रेय घेतील. उदाहरणार्थ योग हा आता कितीतरी परदेशी नागरीकांचाही व्यवसाय झाला आहे.
त्यातील अनेक गोष्टीचा वापर करून सकारात्मक जगण्याचे कोर्सेस त्यांनी सुरू केले आहेत. मुळात संस्कृती हा पिढ्यान पिढ्या जतन करायचा ठेवा असतो. ही संस्कृती आपण जपली नाही तर येणा-या पिढ्याकडे केवळ पाश्चिमात्य संस्कृतीच असेल. त्यामुळे आपले अस्तित्व टिकण्यासाठी हिंदुस्थानी ठेवा जपायला हवा. चीनने त्यामुळेच ख्रिसमस हा सण साजरा करायला बंदी घातली आहे. भारत हा त्यामुळे उदार आणि महान देश आहे. पण चीनी आकाशकंदिल विकत घेवून दिवाळी साजरा करणे हा आपल्या समाजाचा पराभव आहे.
भारतात सगळ्यात जास्त खुर्ची व पदाला किंमत दिली जाते. याउलट जपानसारख्या देशात त्याच्या कामाला किंमत दिली जाते. साफसफाई करणारा कामगार हा महिना तीस हजार रूपये कमवित असला तरी आपण त्याकडे कमीपणाने का पाहतो ? श्रमप्रतिष्ठा जपली नसल्यामुळे समाजातील निम्नस्तर कायम खचलेला असतो. तर उच्चस्तर समाजातील नम्रता व विसंवाद हरवल्यामुळे समाजाच्या विकासाची गती ही नेहमीच एकांगी बनते.त्यामुळेच जमीनीच्या थरामध्ये जशा पोकळ्या निर्माण व्हाव्या तसा समाजातील थर ढासळलेले आहेत.  
लवकरच पुढील भाग प्रकाशित करू.................................

निर्भया व्हिडिओने काय दाखविले ?BBC Nribhaya article in Marathi,


बीबीसी कोण आहे?
बीबीसी ही ब्रिटनच्या सरकारच्या मालकीचा मिडीया आहे.ही जगभरातील देशामध्ये वार्ताहर नेमून वार्तांकन करण्याचे काम करीत आहे. त्यामुळे अर्थातच ब्रिटनचा मिडीया भारताच्या हिताच्या किंवा भारताला बळकट करेल अशी पत्रकारीता करेल ही अपेक्षा करणेच बालीशपणा आहे. बीबीसी आता पुर्वीसारखी प्रामाणिक राहिली नाही ही गोष्ट खरी आहे.पण अलीकडच्या काळात बीबीसीमध्ये पत्रकारितापेक्षा
देशाची हेरगिरी करणे व देशामध्ये अस्वस्थता निर्माण होईल अशा पध्दतीने जाणूनबूजुन काम केले जात आहे.
जागतीक मिडीयाची व्युहनीती काय आहे?
भारताची परकीय गंगाजळी अलीकडच्या काळात वाढत चालली आहे. स्थिर सरकार व
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कसलेल्या गुजराती व्यापा-यासारखे भारताचा
उद्योग मेक इन इंडिया सारखे महत्वांकाक्षी करत आहे. त्यामुळे जागतीक पातळीवरील पाश्चामात्य मिडीया भारताला नेहमी अपमानीत करता येईल अशाच खुराकाच्या शोधात असतो. भारतावर बलात्का-यांचा
देश (रेपीस्ट कंट्री) असा शिक्का बसला तर भारताकडे वळणारी परकीय गुंतवणुक कमी होईल असा त्यांना विश्वास आहे. तसेच भारताची बाजारपेठ वाढणारे सामर्थ्य याला अटकाव करण्यासाठी मीडीयाचा सतत वापर केला जातोय.चीनच्या बाबतीत बोलायचे झाले तर त्यामुळे चीनने त्यांच्या देशात परकीय मिडियाच्या वार्ताहरावर अत्यंत कडक नियम घातले आहेत. चीनमध्ये गुगलला सुध्दा बंदी आहे.त्यातून  युट्युब , फेसबुकसारखासोशल मिडीया हा चीनच्या बाबतीत खोडसाळपणा करू शकत नाही.

निर्भया व्हिडिओने काय दाखविले ?
दिल्लीतील बलात्कार करणा-या विकृत गुन्हेगाराची मुलाखत घेतली.क्रुरपणे गुन्ह्याची शिक्षा भोगणारा तो गुन्हेगार समाजाला -आपल्याला ठासून सांगतोय की तीने विरोध केला नसता तर तीला मारले
नसते. त्याची बायको ही आपला पती निष्पाप असल्याचा दावा करत आहे.पत्रकारिताचा उद्देश्य
जनसामान्यापर्यंत माहिती पोहोचविणे , प्रबोधन करणे व मत बनविणे, जागरूक
करणे हा आहे. बीबीसीने व्हिडिओमध्ये केवळ सर्वसामान्यांना शासनाबद्दल राग निर्माण करून जुन्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार केला आहे. विशेष म्हणजे निर्भयाच्या मुलीचे व पालकाचे नाव जाहीर
करून नैतीकतेला हरताळ फासला आहे. दिल्ली हायकोर्ट व केंद्र सरकारने यावर का बंदी घातली याचा कसलाही विचार न करता बीबीसीने ब्रिटनमध्ये प्रसिध्द करून भारतीयांचा अपमान केला आहे.
व्हिडिओमध्ये असे चित्र रंगविले आहे की भारत देश हा बलात्का-यांचा आहे व येथील सर्व पुरूष बलात्कारीच आहेत. भारतात ब्रिटनसारखा कारभार विनाघटना चालत नाही. द टेलीग्राफ ब्रिटनमधील
विश्वासू दैनीकाच्या आकडेवारीनुसार सन २०१३ साली २२ हजार बलात्कार केसेस दाखल झाल्या आहेत.
भारतात याच वर्षी २४ हजार केसेस दाखल झाल्या आहेत. लोकसंख्येची तुलना केली असता भारतापेक्षा ब्रिटनमध्ये बलात्कारांची संख्या अधिक आहे.
निर्भया केसपासून आपण काय शिकलो?
निर्भया बलाकाराच्या घटनेपासून मिडिया, राजकीय व्यक्ती, प्रशासन, पोलिस, न्याययंत्रणा, सर्वसामान्य माणुस एकदंरीत समाज काय शिकला आहे? बलात्काराच्या घटना आजही होत आहेत. पण गुन्हेगारांना शिक्षेचे भय नाही. कायद्याची पळवाट काढत जाणा-यांना अटकाव करणारी पोलादी व गतीमान न्याययंत्रणा नाही.देशातील समाज, नागरीक अस्वस्थ झाले तर त्यांना किमान हाताळायचे तरी कसे याचे राजकीय व्यक्ती, प्रशासन यांना अजूनही भान आले नाही. नुकताच पिंपरी चिंचवड शहरात पोलिसयंत्रणेने बलात्काराची केस
गांभीर्याने घेतली नसल्यामुळे बलात्कार झालेल्या मुलीने आत्महत्या केली आहे.मिडीयाला अजूनही लोकांच्या प्रक्षोभाचे रूपांतर सकारात्मक शक्तीत करता येत नाही. उलट लोकांच्या प्रक्षोभाला
पाहून ते गांगारून जात बघ्याची भूमिका घेत आहेत. ही गोष्ट लोकशाहीला मारक आहे.
नेमका उपाय का आहे?
 परस्त्रीयाकडे कसे पहावे ? स्त्रीयांना सन्मानाची वागणुक देणे या गोष्टी प्रत्येकाला माहित करून देण्याची वेळ आली आहे. स्त्रीम्हणजे मातृत्वाची दैवी देणगी ! त्यामुळे  बलात्कार करणारे
आपल्या जन्मस्थानाचाच धिक्कार करत आहेत. अनेक चित्रपट, जाहिरातीतुन स्त्री म्हणजे केवळ उपभोग्य व एखादी वस्तू आहे असे सादरीकरण केले जाते यावरही बंधन हवे आहे. सेन्सॉर तर केवळ नावालाच आहे.
बलात्कार घटनेसाठी न्यायतातडीने देण्यासाठी फास्ट ट्रॅक कोर्ट व गुन्हेगार व्यक्तीचे पुरूषत्व नष्ट करणे अशा कठोर शिक्षेचा उपाय करणे.देशभरात अश्लील सीडीज, वेबसाईटज, व्हीडिओजवर बंदी घालणे.
नियम मोडणा-या व्यक्तीला कठोर शिक्षा व प्रचंड आर्थिक दंड असायला हवा.याउलट मातृसत्ताक पध्दतीचा स्त्रीत्वाचा आदर निर्माण करणारे संस्कार करणारी शिक्षणपध्दती हवी आहे.
युट्युब किंवा ब्लॉगर यावर शासनाने जागरूक नागरिकांचे स्वंयसेवक गट
निर्माण करायला हवेत. जे देशाबद्दल, समाजात वाईट गोष्टीचे उदात्तीकरण करेल त्याला त्वरीत उत्तर देईल. जागतीक पातळीवर भारताची बाजू मांडणारा व इतर देशातील सरकारची पोलखोल करणारा मिडिया असणे
आवश्यक आहे.

Friday, November 29, 2013

सायकलीवरचे जोडपे...

 वळणे घेत जाणारी पुण्यातील बाजीराव रोडवर एक जुनाट सायकल जात आहे.ही सायकल चालविणारा एक माणुस आणि मागे  कॅरेजवर  त्याची बायको बसली आहे.रस्त्यावरील गर्दीतुन वाहनातून मार्ग काढत असताना दोघे मस्त बोलत चालले आहेत.पुढे येणारा सिग्नलच्या भीतीने   दुचाकीचालक पुण्याच्या भाऊगर्दीतुन रस्ता काढत असताना एवढे चिंतातूर दिसत आहेत की अस्स वाटावे नुकताच पाकिस्तानने अणवस्त्राची दिशा पुण्याकडे वळविली आहे.काही चारचाकी थाटात तर मध्येच दुचाकी चालविणा-या बांधवांच्या   वाकुल्या कम कट मारलेले सोसत जात आहे.
जुनाट सायकल आणि त्यावरील जोडपे आरामात जात आहे. 
रस्ता दुरचा आहे...पण आयुष्यात सगळे सुखी पायी लोळण घेतली तरी आपले मन हे कायम नसलेल्या गोष्टीसाठी दु:खी होते. ज्या गोष्टी आपल्या जवळ आहेत त्यामुळे आनंद घेण्याचे मात्र विसरत जातो.
शेवटी   आपण समाधान मानले तर आयुष्यात सुखी होण्यासारखे आपल्याकडे बरेच असते.मला तर पायी चालताना दिसणारे ,भासणारे पुणे सर्वात सुंदर भासते... 
  सर्वात समाधानी मनाचे चेहरे  हे बहुतेक हावरट नसणारे माणसाचेच असतात 

कायद्यामुळे न्यायालयांचा ठेवावा लागतो आदर ?


 

सर्वोच्च न्यायालयाने लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये स्त्री -पुरूषाने राहणे हे पाप किंवा गुन्हा नव्हे असे मत व्यकत केले आहे. आदरणीय न्यायालयाने असे आदरणीय (?) विचार का केले हा प्रश्न मनात निर्माण होत आहे.ज्या मतामुळे समाजावर काय परिणाम होतो याचा विचार न्यायव्यवस्थेने करायलाच हवा.

कायदा आणि न्यायालये ही समाजाच्या सुव्यवस्थेसाठी आहे.लग्नाशिवाय एकत्रित राहण्याला न्यायालयाने मान्यता कोणत्याही परिस्थीतीत मान्यता देवू नये.शाब्दीक खेळ करीत व्याख्या करण्याच्या ह्या गोष्टी नाहीत.पण न्यायालये सतत घसरत जातात त्यामुळे नैतीक व अनैतीकच्या व्याख्याही बदलत जातील.थोडक्यात काय तुम्ही लग्न न करता अधिकृत लफडी करा.परंतु यामुळेच गुन्हेगारी वाढते . अनेकांचे आयुष्य उध्वस्त होवू शकतात. 

घटस्फोटासाठी न्यायालयात जमलेली गर्दी बघुनच समाजाची दिशाच समजायला लागते.सर्वोच्च न्यालयाने दिलेले अनेक निकाल समाजासाठी ,लोकशाहीसाठी दिशा देणारे ठरले आहेत.विवाहसंस्था सशक्त असणे हे निरोगी समाजाचे लक्षण आहे,परंतु न्यायालये उठसुठ ही विवाहसंस्था संकल्पनाच का मोडीत काढायला निघाली आहेत हे समजतच नाही.कायद्यामुळे न्यायलयांचा आदर ठेवावा लागतो दुसरे काय?

Thursday, November 28, 2013

कॉलेज गेट

  

मराठी साहित्यात कॉलेज गेट नावाची एक कादंबरी तुफान गाजतेय. वाचायला सुरूवात केली आणि अक्षरश: कॉलेजगेट मध्ये फिरतच राहिलो.वाचकाने स्वकथन करत असतानाची शैली ही अशी भन्नाट आहे की आपल्याला वाटते , हा तर आपला बेस्ट मित्र बोलत आहे!
 क़ॉलेज लाईफ मध्ये प्रत्येक जण कीडा असतो.म्हणजे काहीतरी भन्नाट करण्याची उर्मी आणि त्यासाठी झोकुन देण्याची वृत्ती हीच पुढे कुठेतरी जपा अशीच ही कादंबरी सांगते.फरिीजीवन जगत असताना मस्त कलंदर जगणारे मित्र ,शब्दाखातर जीवाला जीव देणारे यारी आणि बरेच काही आहे.सांगु का ? वाचल्याशिवाय ह्या पुस्तकाची गंमत कळायची नाही.पुस्तकातील प्रत्येक पात्र आपल्याशी संवाद करत असतात.खुप काही आहे ..सुहास शिरवळकरांची दुनियादारीपेक्षा मला हे पुस्तक आवडले.कारण आजच्या तरूणाईची भाषा आणि चालु काळातील ती वास्तववादी आहे.

Monday, November 25, 2013

जमीनव्यवहार ठरतेय काळ्या पैश्यावाल्यासाठी सोन्याची खाण

 

जमीनव्यवहार करण्यासाठी ग्रामीण विभागात शहरालगत दलालाच्या टोळ्या निर्माण झाल्या आहेत.या टोळ्यांनी शेतकरीवर्गाचा जीवाला घोर लावला आहे.शेतकर्‍यांना शेती करायची आहे तर दलालांना जमीनी विकायच्या आहेत.जमीनी विकुन खुळखुळणारा पैसा  दिसणारा पैसा दुसरीकडे काळीआई दिसत असताना त्याची  कमालीची जीवाची घालमेल होते.परंतु दलालांच्या टोळ्या ह्या गुंड आणि राजकीय पक्षांच्या वरदहस्ताने चालत असल्याने अनेक शेतकर्‍यांचा निरूपाय झाला आहे.अनेक बांधकाम व्यावसायीक तसेच अवैध मार्गाने कमविणार्‍या शासकीय अधिकार्‍यासाठी ह्या जमीनी सोन्याची खाणी ठरत आहेत.थेट जमीनीत पैसा गुंतविला जात असल्याने  तसेच जमीनीत ठरणारी फायदेशीर गुंतवणुक यामुळे रिअल इस्टेटची जोरदार डिमांड वाढत आहे.प्रत्यक्षात रिअल इस्टेटमधील प्रगती म्हणजे खरी प्रगती आहे का याचाही विचार करायला हवा.

Featured Post

मेकॉलची शिक्षणपध्दती किती दिवस व्यवस्थेने पचवायची ?

आठवीच्या वर्गावर भूमितीचा तास चालू होता. प्रमेय समजावून सांगणारे शिक्षक असे मानू या समजू असे सांगून प्रमेयाची सिध्दता समजावून सांगत होते....