रोज सकाळी उठल्यानंतर मनात पहिला मी प्रश्न निर्माण करतो
आयुष्य आहे तरी काय?
केवळ मजेत जगण्याचे निमित्त,छे एक कोडेच आहे.आव्हानाचा सामना करताना ती परीक्षा वाटू लागते. नेमके ज्या क्षणी जसे तुम्हाला वाटत असते तसे तुम्हाला आयुष्य भासत असते. आयुष्य हे काही मिळविण्यासाठी नाही.तर चांगले निर्माण करण्यासाठी करण्यासाठी झालेले आहे.त्याला चाकोरीत अडकवता येत नाही.दरवेळेस आपले समज गैरसमज खोटे ठरवत ते नव्या रूपात येते.
कॅलिडोस्कोप मुळे माणुस अवकाश पाहू शकतो. तर मायस्कोपमुळे सुक्ष्मनिरिक्षण करू शकतो. पण आयुष्याला असे पाहता आले तर...जरा विचार करा..
मी केवळ थोड्यावेळाने मरणार आहे असा विचार करा. सोबत काय घेवुन जाणार आहे.जाताना या समाजाला काय देवून जाणार आहे.आपल्या जाण्याने कितीजणाला दुःख होणार आहे. आयुष्याच्या परिघाचा विस्तार करताना माणुस स्वःताङला केंद्रबिंदू करू लागला की आयुष्याचा बोन्साय होतो.आयुष्य खुप सुंदर आहे हे मात्र निर्विवाद!
Marathi news and Articles. विविध विषयावरील मराठी लेख आणि गल्ली ते दिल्लीपर्यंतच्या बातम्या तुम्हाला वाचायला मिळतील.
Thursday, November 3, 2016
आयुष्य आहे तरी काय?
Wednesday, November 2, 2016
राष्ट्रवाद आणि देशप्रेम
सध्या देशात राष्ट्रवाद आणि देशप्रेम याविषयी
चर्चा चालू आहे. राष्ट्रवाद हा युध्दपिपासू ,जहाल होवू शकतो.देशप्रेम मात्र टोकाला जात नाही.
काॅग्रेसचे अजून 100 पिढ्या राज्य करण्याचे
स्वप्न असल्यामुळे
नेते,पक्ष नेहमी यापासून पळत होते. यामुळे पंतप्रधान जेव्हा सीमेवर जावून दिवाळी साजरी करतात तेव्हा सामान्य नागरिकाला हा फरक प्रकर्षाने जाणवतो.
खरेतर सामान्याला प्यादे समजणारे त्याचा निवडणुकीत वजीर झाल्यास चेकमेट होतात.
राजकीय पक्षांनी केवळ मानसशाशास्राचा वापर करून राज्य केले आहे.यामध्ये केवळ स्वःताला दोष देण्याची भावना मनात हळूवारपणे रूजविणे. मग धर्मनिरपेक्षता असो किंवा देशप्रेम. आपल्यासारख्या सामान्यांनी आपण कोण आहोत हे सिध्द करण्याची गरज नाही.कारण सामान्यामध्ये असामान्यत्च लपलेले असते. जय हिंद!
Wednesday, October 26, 2016
दिवाळीच्या शुभेच्छा
डोळ्यात साठवून दिवाळीचा आनंद घेताना बालपणीची दिवाळी हटकुन आठवते.पहाटे वाजणारी थंहूडहूडीत अभंग्यस्नान,फराळाचा सुगंध,फटाके उडविण्याची घाई यामध्ये केवढा आनंद सामावलेला असायचा.
बालपणाच्या आनंदाची ही ओळख प्रत्येकाच्या मनात कायम कोरलेली असते.
लातूरला सध्या दिवाळी पहातोय.दुष्काळाने होरपळलेल्या मराठवाड्याने काहीसे सुगीचे दिवस अनुभवयाला सुरुवात केली आहे.
त्यामुळे शेतकरीवर्गात काहीसे सुखाचे वातावरण आहे.
समोर शिवाजी चौकात दहा बारा वर्षाची मुल बॅड वाजवायची कामे मन लावून करत आहे.तर गोलाई बाजारपेठेत चालायला जागा नाही.
प्रत्येकाला दिवाळी आनंदात साजरी करता यावी.
दीपमाला उजळवून, दिव्याच्या आरास करुन, अंधार दूर सारण्याचा सामूहिक प्रयत्न म्हणजे दिवाळी, दिवाळी हा चिंता - विवंचनांची जळमटे झाडून टाकून उमलत्या आनंदाचे आकाशदिवे आकांक्षांच्या आकाशात झगमगत ठेवणारा सण आहे.आपण तेजाचे उपासक आहोत. शतकानुशतके आपण प्रकाशमार्गावरचे पथिक आहोत.
सर्व प्रकारचे अंधार मागे टाकून उज्ज्वल प्रकाशाच्या दिशेने आपले प्रत्येक पाऊल पुढे पडावे.
Friday, September 16, 2016
Ashtapailu Magzine- दिवाळी अंक
![]() |
Ashtapilu-Sarjanshil,paripurntekade...... |
उत्तम संवाद हा कोणत्याही कंपनीला, संस्थेला, व्यवसायाला मजबूत करतो. या प्रयत्नांची संजीवनी म्हणजे दिपावलीच्या आनंदमय प्रसंगी होणारे अष्टपैलू हे मासिक !
मुलाखती प्रसिध्द करणार आहोत. उद्योजकता, व्यवस्थापन, बुध्दीमत्ता अशा विषयाचा भरगच्च मजकूर असणारा 'अष्टपैलू' दिवाळी अंक साधारणतः १ ऑक्टोबरला प्रसिध्द केला जाणार आहे. हा बौध्दीक मेजवानीचा अंक महाराष्ट्रभर हजारो चोखंदळ वाचकापर्यंत पोहोचणार आहे. देश-विदेशातील वाचकासाठी या अंकाची हार्डकॉपीबरोबर ई- आवृत्ती उपलबध करून दिली जाणार आहे.
Thursday, June 16, 2016
उडता पंजाब... Udata Panjab
सामाजिक प्रश्नाला हात घालीत मनोरंजनाची फोडणी टाकून वास्तवाचे चटके देणारे चित्रपट काढणे ही दिग्दर्शक अनुराग कश्यपची आजपर्यंतची खासियत राहिलेली आहे. उडता पंजाबवर सेन्सॉरबोर्डाच्या वादग्रस्त निर्णयामुळे वाद निर्माण झाला.
पण यामुळे खरेतर चित्रपटाचा मुळविषय दुर्लक्षित राहू शकतो. म्हणुन याविषयी थोडेसे ....
देशाच्या विकासात विशेषतः सैन्यदलातील वरिष्ठ अधिकारी व सैनिकामध्ये पंजाबमधील तरूण सर्वाधिक संख्येत सहभागी होतात. याशिवाय ख-या अर्थाने पंजाब म्हणजे भारताचे बलदंड बाहूच आहेत. अशा परिस्थितीत एकाकी पंजाब व हरियाणा या राज्यामध्ये ड्र्ग्जमध्ये तरूणाई स्वतःचा नाश करू लागलेली आहे. हे कसे घडले ?
प्रथम लक्षात घ्यावे लागेल, पंजाब हे पाकिस्तानच्या सीमेशी लागून असलेले राज्य असून पंजाबमधील आएएसआएने नेहमीच खलिस्तानसारख्या विषाला खतपाणी घालण्याचे काम केलेले आहे. याच आयएसएने दाऊदशी हातमिळवणी करून त्याचे नेटवर्क वापरून भारतात अतिरेकी कारवाया चालू ठेवल्या आहेत. भारताचे सामर्थ्य लक्षात घेता पाकिस्तान सरळ सरळ लढण्यापेक्षा तरूणाईला पोखरून काढण्यासाठी पंजाब व हरियाणामध्ये ड्रग्ज माफियांनी चांगलेच हात पसरविले आहेत. जिथे अमाप पैसा तिथे राजकीय पक्षाच्या नेत्यांनीही सोयीस्कर दुर्लक्ष केल्यामुळे पंजाब व हरियाणामध्ये ड्रग्जचे प्रमाण प्रचंड वाढलेले आहे. याकडे स्थानिक राजकीय पक्षाचे दोन्ही राष्ट्रीय पक्षाने सत्तेसाठी लाड केलेले आहेत. यामुळे नाशाकडे जाणारी तरूणाई स्वतःचे आयुष्य कापरासारखे उडवत आहेत, पर्यायाने उडता पंजाबचे भविष्यही अंधातरीच राहिलेले आहे. अभिव्यक्तीस्वातंत्र्याची गळचेपी करत तर कधी पदमश्री , साहित्यिक पुरस्कार किंवा मंडळ, समित्यावर नियुक्ती देवून विषय झाकण्याचे दिवस आता सरलेत. कारण तरूणाईलाही उडत्या पंजाबाची चांगलीच कळू लागली आहे. असे चित्रपट येतात तेव्हा समाधान वाटते. कोणीतरी जिवंत आहे बॉलीवूडमध्ये ज्याला तरूणाईची भाषा कळते व समाजाचे प्रश्न आहे. दिगदर्शक अनुराग कश्यप यांच्या बंडखोरीला सलाम......
Sunday, May 8, 2016
विदर्भातील तेलंगणाच्या प्रकल्पाविषयी राज्यपालांचे व विदर्भवाद्यांचे मौन का ?
तुमचे घर-शेतजमीन अचानकपणे प्रकल्पामध्ये जाण्याचे नियोजन चालू आहे अन त्याची कोणतीही सूचना तुम्हालाही नाही. तर तुमची काय प्रतिक्रिया असेल...पण जरा थांबा.... असा प्रकल्प शेजारील राज्यसरकार तुमच्या घरादाराला बुडवून करत असताना आपले सरकार गप्पच आहे... तर काय म्हणाव ...असाच अनुभव विदर्भातील २१ गावे घेत आहेत. त्यांचा आवाजही दबलेला आहे. त्यांच्या दुःखाला आता सरकारही वाली राहिला असता तर अशी वेळ आली असती का ?अशावेळेस केक कापून महाराष्ट्राचे तुकडे करणारे मान्यवर कुठे गेले आहेत, हेच विदर्भातील जनतेला कळत नाही.वेगळ विदर्भ असावा अशी मागणी करणारे विदर्भवादीनेत्यांनी महाराष्ट्राविषयी नाही किमान विदर्भाच्याहिताबाबत जागरूक असायला हवे. पण तसे होत नाही. याचा ढळढळीत पुरावा म्हणजे विदर्भातील सुमारे २१ गावे तेलंगणाच्या दडपशाहीच्या प्रकल्पामुळे पाण्याखाली जाणार आहेत, तरीही मौन बाळगणे. भरीस भर म्हणजे याप्रकरणात भाजपचेच असलेले राज्यपाल विद्यसागर हे तेलंगणाबाबत अधिक करूणासागर बनून असल्यामुळे मंत्रालयातही दबाव आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल तेलंगणचे रहिवासी असलेले राज्यपाल सी विद्यासागर यांनी तेलंगणात पाणी मिळवून देण्याचे हैद्राबादेत आश्वासन दिले होते. मूळात राज्यपाल असताना कोणत्या आधारावर हे आश्वासन देण्यात आले होते, हा प्रश्न पडतो. कारण राज्याचे राज्यपाल त्या राज्यालाच किमान न्याय्य ठरेल अशी भूमिका आपले मुळ राज्य व कार्यक्षेत्राचे राज्य यामध्ये घेणे उचीत आहे. महाराष्ट्रीय जनतेने कधी आढेवेढे घेतले नाहीत याचा अर्थ ' दिली ओसरी, घरभर हात-पाय पसरी' असाच प्रकार होत आहे असे म्हणले तरी वावगे ठरू नये.गोदावरी लवादानूसार गोदावरी व प्राणहिता नदीच्या पाण्यावर तेलंगणाचा हक्क आहे. त्याचा आधार घेत सीमावर्ती भागात अनेक प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. दोन राज्यांनी आंतरराज्यीय प्रकल्प सुरळीतपणे चालण्यासाठी मंडळ स्थापन केले आहे. तेलंगणा मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांनी मेडीगट्टा प्रकल्पाचे भूमिपुजन केले आहे. व त्यासाठी ८०० कोटींचा निधी जाहीर केला. या प्तकल्पामुळे गडचिरोली व चंद्रपुर जिल्ह्यातील २१ गावे विस्थापीत होणार आहेत. या प्रकरणी राज्य शासन व सर्वपक्षीय नेत्यांनी ठोस भूमिका न घेतल्याने भविष्याच्या कल्पनेने धास्ती निर्माण झाली आहे. राज्यपालांनी त्यांच्याबद्दल निर्माण झालेली अस्पष्टता दुर करणे आवश्यक आहे. महाराष्ट्राचे तुकडे करणारे असो की महाराष्ट्रप्रेमी अशा सर्वांनी एकत्र न येणे ही खटकणारी बाब आहे.या प्रकरणी काय करायला हवे.१) केंद्राकडे याबाबत तक्रार करून तेलंगणा प्रकल्पाबाबत कठोर बंधने घालून द्यावी.२) तेलंगणाने असे प्रकल्प करू नये यासाठी स्वतंत्र देखरेख ठेवणारी , अथवा त्याबाबत अपडेट ठेवणारी माहितीयंत्रणा जलसिंचन खात्यात असावी.३) राज्य हित पूर्ण करताना कालबाह्य संकुचीत पक्षीय धोरणे, प्रशासकीय आडमुठेपणा, सुस्त कारभार होत असेल तर पिढ्यानपिढ्या लाखो नागरिकांना अब्जावधी कोटींचा फटका बसणार आहे. याची जबाबदारी कोण घेणार ? काही दुखणी असतात की ती झाली की माणुस तब्येतीकडे जास्तीचे लक्ष देवू लागतो. आता असे समजायला हरकत नाही. एकसंध महाराष्ट्र व्हायला अजून किती दिवस लागतात यावरच तेलगंणासारखी अजून रांगणारी राज्ये काळजावर घाव घालण्याचे प्रमाण ठरवतील.
Wednesday, April 20, 2016
शनिशिंगणापुर नंतर पुढे काय ?
Featured Post
मेकॉलची शिक्षणपध्दती किती दिवस व्यवस्थेने पचवायची ?
आठवीच्या वर्गावर भूमितीचा तास चालू होता. प्रमेय समजावून सांगणारे शिक्षक असे मानू या समजू असे सांगून प्रमेयाची सिध्दता समजावून सांगत होते....
-
(राजकीय पक्षांना आरटीआय ) संपत्तीच्याआकडेवारीत शुन्य सांगणे बंधनकारक नको-चिंदबरम नवी दिल्ली-राजकीय पक्षांना आरटीआयमध्ये संपत्तीची...