Marathi news and Articles. विविध विषयावरील मराठी लेख आणि गल्ली ते दिल्लीपर्यंतच्या बातम्या तुम्हाला वाचायला मिळतील.
Friday, November 29, 2013
Thursday, November 28, 2013
कॉलेज गेट
मराठी साहित्यात कॉलेज गेट नावाची एक कादंबरी तुफान गाजतेय. वाचायला सुरूवात केली आणि अक्षरश: कॉलेजगेट मध्ये फिरतच राहिलो.वाचकाने स्वकथन करत असतानाची शैली ही अशी भन्नाट आहे की आपल्याला वाटते , हा तर आपला बेस्ट मित्र बोलत आहे!
क़ॉलेज लाईफ मध्ये प्रत्येक जण कीडा असतो.म्हणजे काहीतरी भन्नाट करण्याची उर्मी आणि त्यासाठी झोकुन देण्याची वृत्ती हीच पुढे कुठेतरी जपा अशीच ही कादंबरी सांगते.फरिीजीवन जगत असताना मस्त कलंदर जगणारे मित्र ,शब्दाखातर जीवाला जीव देणारे यारी आणि बरेच काही आहे.सांगु का ? वाचल्याशिवाय ह्या पुस्तकाची गंमत कळायची नाही.पुस्तकातील प्रत्येक पात्र आपल्याशी संवाद करत असतात.खुप काही आहे ..सुहास शिरवळकरांची दुनियादारीपेक्षा मला हे पुस्तक आवडले.कारण आजच्या तरूणाईची भाषा आणि चालु काळातील ती वास्तववादी आहे.
Monday, November 25, 2013
जमीनव्यवहार ठरतेय काळ्या पैश्यावाल्यासाठी सोन्याची खाण
जमीनव्यवहार करण्यासाठी ग्रामीण विभागात शहरालगत दलालाच्या टोळ्या निर्माण झाल्या आहेत.या टोळ्यांनी शेतकरीवर्गाचा जीवाला घोर लावला आहे.शेतकर्यांना शेती करायची आहे तर दलालांना जमीनी विकायच्या आहेत.जमीनी विकुन खुळखुळणारा पैसा दिसणारा पैसा दुसरीकडे काळीआई दिसत असताना त्याची कमालीची जीवाची घालमेल होते.परंतु दलालांच्या टोळ्या ह्या गुंड आणि राजकीय पक्षांच्या वरदहस्ताने चालत असल्याने अनेक शेतकर्यांचा निरूपाय झाला आहे.अनेक बांधकाम व्यावसायीक तसेच अवैध मार्गाने कमविणार्या शासकीय अधिकार्यासाठी ह्या जमीनी सोन्याची खाणी ठरत आहेत.थेट जमीनीत पैसा गुंतविला जात असल्याने तसेच जमीनीत ठरणारी फायदेशीर गुंतवणुक यामुळे रिअल इस्टेटची जोरदार डिमांड वाढत आहे.प्रत्यक्षात रिअल इस्टेटमधील प्रगती म्हणजे खरी प्रगती आहे का याचाही विचार करायला हवा.
Friday, November 22, 2013
मार्केटींग तंत्रामुळे अभिजातपणा नजरेआड!
मार्केटींग तंत्रामुळे अभिजातपणा नजरेआड!
Shrikant Pawar
जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात व्यापारीकरण आलेले आहे.यामुळे फोफावत जाणारी बाजारूवृत्ती आपल्याला जीवनाच्या अस्सल अश्या अभिजातपणापासून कोसो दुर ठेवते.पण जाहीरातींचा गोबेल्सनीतीसारखा मारा कुणाच्याही लक्षात येत नाही .नेमका अभिजातपणा कसा होतो नजरेआड ?त्यामागे कुणाचे आहे अर्थकारण याचा घेतलेला वेध !
कलांचा लोप होत चालला होता तश्याच पध्दतीने भारतातील कलांचा लोप होण्यास सुरूवात झाली आहे.
,क्रीडा,साहित्य हे केवळ मनोरंजनाचे साधन नाही तर ते समाजाचे प्रतिबिंब असते.तसेच समाजमनाला सतत प्रफुल्लीत ठेवणारे ,संवेदनशीलता जागृत ठेवणारे इंद्रिये आहेत.क्रिकेट म्हणजे करोडो भारतीयांचा जीव की प्राण असणारा खेळ !पण क्रिकेट ह्या खेळालाच एवढे उचलून का धरले जातेय?जगातील सर्व बड्या कंपन्यासाठी भारत ही भरघोस नफा देणारी बाजारपेठ आहे.कंपन्यांच्या उत्पादनांना खपविण्यासाठी आकर्षक जाहीराती कराव्या लागतात.त्यासाठी ग्राहकांची मानसीकतेचा विचार करावा लागतो.ग्राहकांना जाहीरात आपलेच भावविश्व वाटणे, अपील होणे यासाठी उत्पादक कंपन्या कोट्यवधी रूपये खर्च करतात.त्यामुळे सहज आणि जास्तीत जास्त लोकांना अश्याच गोष्टींना लोकप्रियता लाभते.क्रिकेटपेक्षा मानवी शारीरीक ,बौध्दीक कसोटींची परिक्षा घेणारे अनेक खेळ आहेत.हॉकीसारखा राष्ट्रीय खेळ आजवर उपेक्षीतच राहिलेला आहे.परंतु ते नेमके सर्वसामान्यपणे सगळ्यांनाच झेपत नाही.उलट क्रिेकेट ह्या खेळासाठी कुणीही उतरू शकतो.त्यामुळे प्रेक्षक आपोआप क्रिकेटशी एकरूप होतो आणि उत्पादक कंपन्याचे फावते.जाहीरातीतून अश्या वेळी प्रेक्षकावर उत्पादन चांगलेच ठसविण्यात त्यांना यश येते.यामुळे सर्वात जास्त हानी होते ती सर्वसामान्यांचीच! आयुष्यात लागणारी एक्रागता तिरंदाजी तर बुध्दी कौशल्य बुध्दीबळ शिकविते.नेमके हे लक्षात घेत नसल्यामुळे आपण अश्या अभिजात खेळापासून दुर गेलो आहोत.प्रसिध्दीमाध्यमांना लोक ज्या बाजूने झुकतात.त्या बाजूने झुकत प्रसिध्दी द्यावी लागते.पण हा लोकानुनय आपल्याला परवडणारा नाही.चीन सारखा बलाढ्य देशाने केलेली प्रगती ही उत्तम अश्या मनुष्यबळानेच केली आहे.{Mत्रवाहीन्यावर आता नाचगाण्यांच्या रिऍल्टीशोने चांगलाच धुडगुस घातला आहे. आयुष्यात नाच-गाणे एवढ्याच कला नाहीत हे कानी-कपाळी ओरडून सांगायची वेळ आली आहे.साहित्य-चित्रकला,शास्त्रीय गायन-वादन अश्या कलासाठी रिऍल्टी शो झाले तर खऱ्या गुणवत्तेला व्यासपीठ मिळु शकते. अश्या गोष्टींना महत्त्व दिले जात नसल्याचे एकमेव कारण म्हणजे त्यासाठी कलाकारांना चिकाटी,कष्ट व जबरदस्त संयमीपणाला महत्त्व द्यावे लागते.त्यामुळे सहभागी कलाकारांचा प्रतिसादर कमी तसेच त्याची रूची असणारा प्रेक्षकवर्गही कमी हे गणीत डोक्यात ठेवूनच कार्यक्रमाची आखणी केली जाते.लोकांना आवडते तेच सादर केले जाते, असा सर्वसाधारणपणे दावा चित्रवाहिन्याकडून केला जातो.प्रत्यक्षात केवळ जाहीरात कंपन्यांच्या धोरणानुसार कार्यक्रम निर्मीती केली जात आहे.कुटुंबातील महिलांचे डावपेच,कुरगोड्या यांना प्राधान्य देत मालिकांचा अक्षरश: रतीब झालेला आहे.प्रांजळपणा जपणारे पात्र ,हलकेफुलके असणारे विनोद हे दुर्मीळ होत चालले आहे.एकंदरीत आपल्या आयुष्यातील अभिजातपणा आपण मार्केटींग तंत्रात हरवून बसलो आहोत.स्सी जैसी कोई नही ही सोनीटीव्ही वरील मालिका चर्चेत आली ते जस्सीच्या मनाच्या सौदंर्यामुळे!सौंदर्य प्रसाधन विक्री करणाऱ्या कंपन्यांनी स्त्रियांच्या मनावर सुंदर दिसणेच किती आवश्यक आहे हेच बिंबवले आहे.त्यातून साध्या दिसणाऱ्या जस्सीचे भावविश्व मालिकेत रेखाटले होते.सौंदर्य प्रसाधन कंपन्याच्या दबावातून मिस वर्ल्ड ,मिस इंडिया सारख्या स्पर्धा आयोजीत केली जातात.भारताच्या पहिल्या आयपीएस किरण बेदी, अंतराळ वीर सुनीता विल्यम्स ह्यांनी सौंदर्याने नव्हे तर कर्तत्वामुळे ठसा उमटविला.जाहीरातींच्या भडिमारातून सौंदर्याचेच महत्त्व सांगितले. साहजिकच याचा दुष्परिणाम म्हणजे सर्वसामान्य दिसणाऱ्या मुलीमध्ये न्युनगंड निर्माण होतो.
नजरेआड झालेला अभिजात पणा दुर करून समाजमनाचे खोटे मुखवटे बाजूला सारल्यानंतर मिळणारे समाधान शब्दातीतच आहे.
किमान दोन दिवस टीव्ही बंद करून रिकाम्यावेळी आवडत्या विषयाचे पुस्तक किंवा शास्त्रीय संगीताकडे वळल्यास हा अभिजातपणा चांगलाच अनुभवला येईल.
Friday, October 11, 2013
|
Thursday, October 3, 2013
घोटाळ्यामुळे देशात लोकशाही टिकुन ?
देशात घोटाळे होतात आणि त्यामुळे लोकशाही टिकून राहते हे वाचून धक्का बसला असले तरी हे एक सत्यच आहे.त्याचे असे आहे की भारत हा अवाढव्य असणारा लोकशाही देश आहे.भले कुणीही घराणेशाहीचा आरोप करत गांधी घराणे घराणेच्याचीच सत्ता चालते असा आरोप केला तरी सध्या तरी लोकशाही आहे असेच म्हणावे लागते.बरे देशाची लोकसंख्या आणि आकारमान पाहता कोट्यवधींचे घोटाळे होतात .त्यातही २ जी स्पेक्ट्रम आणि कोळश्याचे लाख कोटींचे घोटाळे असल्यामुळे आश्चर्य वाटण्याचे कारण नाही.उलट देशाचा विकासदर शेअरमार्केटवर जसा मोजला तसा घोटाळ्याच्या आकडेवारीवरून मोजायला हरकत नसावी.
हवेतर नियोजन आयोग गरीबी्ची ज्या काटेकोर पध्दतीने व्याख्या करीत असते त्याचपध्दतीने विकासाचे निर्देशांक घोटाळ्याच्या आकेडेवरीवरून मोजण्याची आवश्यकता आहे.
शेवटी देशात एवढी प्रगती होत असतानाही स्थिरता टिकविण्यासाठी केंद्र सरकार तसेच राज्यातील आघाडी सरकारलालाही कसरत करावी लागते.केंद्रामध्ये कधी वैचारीक(=आर्थिक) मतभेद झाले तर युपीए सरकारमधील पक्ष पाठिंबा काढुन घेण्याची धमकी देतात.तेव्हा खर्या अर्थाने राजकीय पक्षांच्या नेत्यांचे घोटाळे हेच कामाला येतात.अश्या घोटाळ्यामुळे अटकेची भीती दाखवीत केंद्र सरकार देशातील सरकार स्थिरता टिकविण्यासाठी आटोकाट प्रयत्न करते.भले त्यासाठी कायद्याचे उल्लघंन करण्याची वेळ आली तरीही सीबीआय सर्वोच न्यायालयाचा रोषही स्वीकारते!केवढी ही देशभक्ती!!!त्यामुळे सरकार मायबाप घोटाळे करते आणि घोटाळे करणार्याला अभय देते .यामागे देशात लोकशाही टिकवून ठेवणे हा उदात्त विचार आहे.हा विचार उदात्त आपण समजुन घेतलाच असेल पण लोकशाही अजुनही समजुन घेत नाही .......कधी कधी दम तोडते आणि सर्वोच न्यायालयाला गुन्हेगार लोकप्रतिनिधीवर अकुंश ठेवण्याची गरज वाटू लागते.राजकुमाराचे लॉन्चिंग होणार असल्यामुळे केंद्र सरकारने विधेयक मागे घेतले आहे.आता सामान्य जनतेच्या मनात एक गाणे गुणगुणत असेल कोई प्यार कर ले झुठा ही सही........(निवडणुका जवळ आल्या की जनतेच्या प्रेमात पडणे नैसर्गीक आहे)
Wednesday, October 2, 2013
बातम्यासाठी पैसे!
लातूरहुन पुण्याकडे रेल्वेतून येत होतो.प्रवासात सहजच बोलता बोलता नव्या ओळख्या होत असतात.खरे तर मला प्रवासात फारशी बोलायची सवय नाही.परंतू एखादा व्यक्ती बोलत असेल तर आपण माणुसघाणा आहोत असा आर्विभाव आणणे आवडत नाही.त्यामुळे साहजिकच मी त्या व्यक्तीला बोलायला सुरूवात केली.तो ग्राफीक डिझायनरम्हणून मुंबईत काम करीत होता.त्याला मी एका दैनिकात बातमीदार म्हणुन काम करीत असल्याचे सांगितले.नेहमी अशी ओळख सांगितली तर काय पत्रकारांचे किती वजन असते.त्यांची कामे पटापटा होत असतात असे सांगुन पत्रकार हे चांगले असतात यापेक्षा पत्रकारिता करणे किती फायदेशीर असतात हेच सांगायला सुरूवात केली.प्रत्यक्षात बातमीदारी करत असताना जगण्याची भ्रांत होत असताना त्याचे कौतुक ऐकत असताना हसू येत होते आणि रागही आला होता.त्यानंतर गावरान भाषेत ज्याला खाज म्हणायचे अशी बातमीदारीची खाज असते ती काहीही सुटत नाही.लागलीच फुकट्ची बडबड चांगला श्रोता होत ऐकुन घेतल्याचे बिल वसूल करण्यासाठी मी एक बॉम्ब टाकला.काही चांगला राज्यस्तरीय विषय असल्यास सांगा असा तो बॉम्ब होता.खरेतर बॉम्ब नव्हता.पण याशिवाय आपण कधी काही अपेक्षा केलीच नाही.त्यामुळे प्रत्येक विषय बातम्यांच्या बर्म्युडा ट्रॅंगलमध्ये घुसत जातो.त्यावर चांगल्या सोर्सची लक्षणे दाखवत त्या बहाद्दरने लागलीच बातमी सांगितली की तो राहतो त्या परिसरात झोपडपट्ट्या असून वनविभागाच्या झोपडपट्ट्यावर कारवाई करण्यात आली आहे.पण हॉटेलवर कारवाई करण्यात आली नसल्याची त्या व्यक्तीने माहिती दिली.सगळी कागदपत्रे तुम्हाला देतो ,पण पाच हजार रूपये द्यावी लागतील असे सांगितले.माझा थोडासा कानाच्या ऐकण्याच्या क्षमतेवरचा विश्वास उडाला असल्याने मी सांगितले बातम्या प्रकाशीत करण्यासाठी पैसे नसतात.त्याने ठासून सांगितले की बातमी देतो तुम्ही पैसे द्या.मी धक्का बसल्याने सावरत हे कसे शक्य आहे ,आम्हाला ऑफीसकडून पैसे नसतात असे समजावित सांगत होतो.त्याने मात्र मार्केटींगचे कुशल दाखवित तुम्हाला पैसे मिळो अथवा न मिळो .मी तुम्हाला बातमी फुकट का सांगायची असा त्याने सवाल केला.मी थोडासा खजील झालो आणि विचार करू लागलोय .वर्तमानपत्रात अजुनही बातम्यांच्या संख्येवर पगारी दिल्या जात नाहीत.बातम्या दिल्याने पैसे मिळविण्याची अपेक्षा केली जात असेल तर यापेक्षा लोकशाहीचे भाग्य कोणते? शेवटी माझा या अजब-गजब लोकशाहीला सलाम !गडगडणारा लोकशाहीच्या स्तंभाला टेकू हवाय का ?
Subscribe to:
Comments (Atom)
Featured Post
मेकॉलची शिक्षणपध्दती किती दिवस व्यवस्थेने पचवायची ?
आठवीच्या वर्गावर भूमितीचा तास चालू होता. प्रमेय समजावून सांगणारे शिक्षक असे मानू या समजू असे सांगून प्रमेयाची सिध्दता समजावून सांगत होते....
-
बॉलीवूडपासून ते टॉलिवूडपर्यंत त्यांनी आपल्या कारकिर्दीच्या महत्त्वाच्या काळात अभिनय केला. बॉलीवूडची सुंदर अभिनेत्री विजया पंडित हिने ...
-
(राजकीय पक्षांना आरटीआय ) संपत्तीच्याआकडेवारीत शुन्य सांगणे बंधनकारक नको-चिंदबरम नवी दिल्ली-राजकीय पक्षांना आरटीआयमध्ये संपत्तीची...
