Saturday, November 14, 2015

दिपावलीच्या सर्व वाचकांना व त्यांच्या परिवाराला मराठी पत्रकारिता ब्लॉग तर्फे हार्दिक शुभेच्छा !

दिपावलीच्या सर्व वाचकांना व त्यांच्या परिवाराला मराठी पत्रकारिता ब्लॉग तर्फे हार्दिक शुभेच्छा !

पुरस्कार परत करणारे साहित्यिक आणि बुध्दिवादी राजकारण .....
साहित्य,  चित्रपट म्हणजे नागरिकांच्या भावना आणि त्यांच्या स्वप्नांना, इच्छांचे प्रतिनिधीत्वच या कला करतात. यामुळे साहित्यिक व कलाकाराच्या कलेतून व्यक्त केलेले विचार एकप्रकारे 
लोकांच्या जीवनाशी बांधलेले असतात. पण हे विचार खरेच सामान्य जीवन किती मांडतात याबद्दल न बोललेले बरे ! अपवाद तुरळक आहेत.
राजसत्तेच्या आश्रयाखाली राहून पुरस्कार पदरात पाडून घेणारा कलावंताचा बुध्दीनिष्ठ म्हणुन दिखावा करणारा वर्ग आहे. दादरी प्रकरणावरून पुरस्कार परत करण्यासाठी साहित्यिकांची चाललेली स्पर्धा हेच त्याचे द्योतक आहे.  मुळात एखादा फोटोसेशन कार्यक्रम असावा आणि यामध्ये आपण मागे पडू नये यासाठी आपण मागे पडू नये असाच मान्यवरांचा प्रयत्न होता.  नाहीतर आणीबाणी असो की अभिव्यक्तीस्वातंत्र्यावर घाला करणारे सायबर कायदा अशावेळी हे मौनात का होते ?  सत्ता बदलली की पुरस्कार देताना साहित्यिक , कलावंत कोणत्या विचारसरणीशी निगडीत आहे हेच पाहिले जाते.  यामुळे भाजप व कॉग्रेसचे राजकारण हे बुध्दीवादीसमाजामध्ये दुही पसरवण्यासाठीच आहे.  पुरस्कार वापर करून सहिष्णुतेचे पाईक आहोत हे सिध्द करण्यासाठी कला पुरेसे माध्यम आहे.
राजकारण्याच्या आखाड्यात उतरून त्यांनी स्वतः ची बभ्रा करू नये व पर्यायाने वाचक व रसिकांनाही कोड्यात टाकू नये. 

ब्रिटनचा दौरा की पर्यटन
पंतप्रधान नरेंद्र मोदी सतत परदेशाचे दौरे करत असल्यामुळे भारतात सध्या मोदी कितीदिवस भारतात असणार आहेत. यावर मटकाबुकी जुगार लावतील. मुळात भारतात प्रशासनावर असलेला पगडा किती दिखाऊ आहे हे याचा प्रत्यय सामान्य भारतीय नागरीक घेत असतात. ब्रिट्नच्या दौ-यामुळे मात्र रशियासारखा मित्र देश चीनकडे झुकत असताना रशियाला एकप्रकारे इशाराच मानावा लागेल. ब्रिटन हा उदारमतवादी देश आपला मित्र राष्ट्र असला तरा साहेबाच्या थाटात राहण्याचे दिवस गेले. यामुळेच आम्हाला उपकार नको बरोबरीची वागणूक द्या हे ठणकावून जगाला सांगितले हे खूप चांगले आहे. सगळ्यात जास्त भारतीय विद्यार्थ्यांच्या व्हिसावर ब्रिटनने निर्णय घेणे आवश्यक आहे. अन्यथा भारतात सुध्दा पर्यायी सक्षम विद्यापीठ उभा राहतील आणि ब्रिटनच्याच विद्यार्थ्यांना भारतात व्हिसासाठी यावे लागेल. किमान आपण अशी अपेक्षा करू या.....


दहशतवाद हा व्हायरसच !
फ्रान्समध्ये आज दहशतवादी हल्ला झाला. याचा अर्थ आपल्या मानवतेवरील धोका अजून टळलेला नाही.   मानवतेमध्ये परस्परामध्ये द्वेषाची भावना वाढविण्यासाठी भीती-दहशत तयार वरून दुर्जन शक्तीचा प्रभाव वाढावा यासाठी अतिरेकी संघटना कार्यरत आहेत. यांना केवळ माणसात आपण जन्मण्यासाठी पात्र नाही आहोत हेच विधात्याला सांगायचे असते हे सांगण्यासाठी क्रुरकर्म करण्यासाठी हिंसेच्या कोणत्याही थराला जातात. या व्हायरसवर देशाच्या धर्माच्या भिंतीपेक्षा माणुसकीची अभेद्य बांधणे जरूरु आहे. वसुधैव कुटुब्मकम हेच ते नाते.
सर्व फ्रान्सच्या म्रुत नागरिकांना मराठी पत्रकारितेकडून श्रध्दांजली ! 

Sunday, November 1, 2015

धर्म नावाचे चलणी नाणे ...

धर्म नावाचे चलणी नाणे ...
कॉग्रेस आणि भाजप या दोन राष्ट्रीय पक्षात आलटून पालटून सत्तेची खिरापत वाटली जाते. या दोन्ही पक्षासाठी हिंदु व मुस्लीम या भरवश्याच्या व्होटबॅक मजबुत करण्यायासाठी कायम चढाओढ चालू असते. यामुळे कॉग्रेस नेहमी मुस्लीमावर अल्पसंख्याक म्हणुन अन्याय होतो याची ओरड करण्याची संधी सोडत नाही. तर वेळप्रसंगी हिंदुमध्ये न्युनगंड तयार करून वाकुल्या दाखविण्याचे काम करते. तर भाजप विकास नाही पण बोलाचीच कडी व बोलाचाच भात म्हणत केवळ हिंदु धर्माच्या परंपरा गोडवा गाऊन केवळ भ्रमिष्ट करण्याचे काम केले जाते. धर्म हे दोन्ही पक्षाचे चलनी नाणे म्हणुन काम करताना प्रत्यक्षात विकास हे खरे नाणे बनावट होत चालले आहे. दोन्ही पक्षांना हिंदु व मुस्लीम धर्मात दरी असणे सोयीस्कर व हितावह वाटते. त्यामुळे एकसंध भारताला तुकड्यात पाडणारे हे पक्ष किती रसातळाला नेणार आहेत याची कल्पनाच केलेली बरी ! सगळ्यात श्रेष्ठ धर्म कोणता याविषयी आमचे स्पष्ट मत आहे की जगामध्ये एकच धर्म सर्वश्रेष्ठ किंवा सर्वात श्रेष्ठ अशा कोणत्याही विचाराशी समतुल्य असा धर्म म्हणजे माणुसकीचा धर्म आहे .
जेव्हा रूग्णाला रक्ताची गरज असते तेव्हा कोणी रक्तदाता कोणत्या धर्माचा आहे हे पाहत नाही.  

Saturday, August 29, 2015

हरितक्रांती म्हणजे शेतक-यांची फसवणुकच !

शेतक-यांना उत्पादन वाढविण्यासाठी  रासायनिक खते व किटकनाशके, सुधारीत बियाणे वापरायला शासन व इत्यादींनी प्रोत्साहीत केले. पण याचा काय फायदा झाला ?
भरमसाठ उत्पन्न वाढले. पण भाव खर्चा तुलनेत कधीच मिळाले नाहीत. उलट  गुणवत्ता घसरली आणि त्याचे होणारे दुष्परिणाम आता कळू लागले आहेत. शेवटी कोणाचा फायदा झाला ?
बहुराष्ट्रीय कंपन्या आणि त्यांचे धार्जिणे स्वतःची पाठ थोपटून घेणारे सरकार मात्र पोकळ विकास दाखवायला मोकळे ! जमीनीचा पोत घसरल्यामुळे नापीक जमीन झाल्यावर दक्षिण आफ्रिकेत शेतक-यांनी शेती करायची का ? त्यालाही शासन अनुदान देईल ? हरितक्रांती ही शेतक-यांची शुध्द फसवणुक आहे.
सरकारने करोडो रूपये अनुदान देण्यापेक्षा सेंद्रिय शेती व त्याला चांगला भाव मिळावा यासाठी प्रयत्न करायला हवेत. मधल्या दलांलाची गरज लागू नये यासाठी थेट ग्राहकापर्यंत माल पोहोचवायला हवा. हॉस्पीटल्सची वाढती संख्या म्हणजे आपल्या देशाचा खुप विकास झाला असा नव्हे. सगळी आरोग्यव्यवस्थाच केमीकलयुक्त अन्नामुळे सलाईनवर आहे.   

Sunday, August 16, 2015

मॅनेजमेंट शास्त्र - मानवी जीवनाला मिळालेले वरदान

प्रयत्नाबाबत विविध विद्याशाखा आपल्याला खालीलप्रमाणे शिकवितात.
अध्यात्म- प्रयत्न करणे हा धर्म आहे.
कला- प्रयत्न करणे कला आहे.
शास्त्र-प्रयत्न हे एक शास्त्र आहे.
कायदा- प्रयत्न करणे हा एक कायदा आहे.
मॅनेजमेंट- प्रयत्न हे मिळवायचे असेल तर जिथे जिथे शक्य आहे तिथे अध्यात्म ,कला, शास्त्र, कायदा उपयोगात आणा. जर ते उपयोगात न आणता मिळ्त असेल तरीही यश मिळवा. शेवटी तेच महत्वाचे आहे यामुळे मॅनेजमेंट हे सर्वात महत्वाचे शास्त्र, विषय आहे.मराठी माणसाला लहानपणापासून डोक्यात बिंबवले जाते. खुप कष्ट करा आणि यश मिळवा. पण कष्ट खूप म्हणजे यश खूप... हे गणीत खरेच योग्य आहे का? केवळ ढोरमेहनत करून यश कधी व किती मिळणार आहे. कष्ट नुसतेच करा आणि फळाची अपेक्षा करू नका एवढेच आपल्या समजाविले जाते. जर फळ मिळत नसेल तर ते काम काय कामाचे ?पण मॅनेजमेंटमध्ये एवढेच शिकायला मिळते की ध्येय निश्चित करून योग्य व्यवस्थापनाने कष्ट करा. रिझल्ट ओरिएन्टेड वर्क करा असे शिकविले असते तर आयुष्याला चांगली दिशा मिळू शकते. पण आपल्यावर धर्मपगडा, भाबडेपणाने शिक्षण शिकविले जाते.प्रयत्न करूनही यश मिळाले नाही तर आपण दैवाला दोष देतो. पण ते खरेच योग्य आहे का ? सागरात असणा-या गलबताला किना-यावर नेमके कोठे जायचे निश्चित नसेल तर कोणतेही उपयोगी असणारे वारेही कसलेच फायद्याचे नसते. त्यामुळे निश्चित असणारा किनारा कधीही उपयुक्त असतो.  


Saturday, August 15, 2015

त्रिवार वंदन भारतमाते तुला !

त्रिवार वंदन भारतमाते तुला !

भारताचा आज ६९ वा स्वातंत्र्यदिन अत्यंत उत्साहात साजरा होत आहे. लहानपणी आपल्याला १५ ऑगस्ट म्हणजे कडक इस्त्री केलेला युनिफॉर्म घालून कधी झेंडावंदन करतो असे वाटायचे. देश म्हणुन सगळेजण एकटवतात ही गोष्ट  रोमांचित करणारी वाटते. सगळ्यात जास्त महत्वाचे नव्या पिढीला उद्याच्या भविष्यासाठी असलेल्या जबाबदारीची नकळत जाणीव होते. आयुष्यभरासाठी मनावर ती कोरली जाण्याचा हा दिवस असतो.  
विविधतेने , उच्च मानवी मुल्ये यांचा संस्कार असणारी देशाची परंपरा , विविध भाषा, कला यांनी देश अत्यंत नटलेला आहे. सगळ्यात जास्त म्हणजे त्याग करून देशाच्या विकासात अमुल्य हातभार लावणारा सामान्य माणुस ते विविध थोर व्यक्ती तेजस्वी हि-याप्रमाणे भारतमातेच्या दिव्य अलकांरात शोभतात.
आजच्या स्वांतंत्र्यदिनासाठी लाखो लोकांनी प्राणांची आहुती दिली आहे. अनेक क्रांतीकारांनी घरादारावर तुळशीपत्र ठेवून चळवळीत भाग घेतला. त्यांच्या त्याग व बलिदानामुळेच आपण स्वांत्र्य उपभोगु शकतो. याची किंमत अनमोल आहे. स्वांत्र्यदिनामुळेच आपण अभिव्यक्ती, संघटना स्थापन करणे, फिरणे, भाषण करणे अशा विविध स्वातंत्र्य उपभोगतोय.  निराशेचे मळभ झटकून टाका.
भारतात असणारी सुप्त शक्ती सगळया जगाला खुणावतेय. त्यासाठी आपण एका सच्चे भारतीय म्हणुन   सर्व जबाबदा-या व कर्तव्य पालन करु.
भारत २०२० ला भारत महाशक्ती २०२० होण्यासाठी तयार होवू...... भारतमातेला त्रिवार वंदन...!
========================================================================
भारत २०२० साली  महाशक्ती होण्याचे स्वप्न माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांनी पाहिले आहे. तरी आपण यात सहभागी होवू. मराठी पत्रकारीता तुम्हाला सहभागी करत आहे. ब्लॉगवर प्रसिध्दीसाठी आपल्या कल्पना, विचार लेख ईमेलवर पाठवा. shrikantpawar15@gmail.com  


Monday, May 4, 2015

Buddha in Marathi

बुध्दं शरणं गच्छामि... .कारण हे सर्व प्राप्त करावे असेच आहे.....

पत्रकारिता करत असताना कधी कधी अधिकारीवर्गाशी वेगवेगळ्या विषयावर चांगलीच चर्चा होते. प्रशासन व माध्यम ही दोन्ही टोके जरी विरूध्द वाटत असली तरी ती माणसेच आहेत.
एका अधिका-याने बोलत बोलत मला सत्यनारायण गोएंका यांचे विपश्यनेवरील पुस्तक वाचले का असे विचारले ? मुळात वाचायची खूप आवड पण धार्मिक वाचन जरा जपूनच करत असतो.
कारण हिंदू धर्मातील उपनिषद वार्ता, कुंडलिनी शक्ती , पतंजली योग सुत्रे अशी असंख्य पुस्तके वाचून मी ठरवले की बास्स ! आता वाचन जास्त केल्याने विचारांची गुंतागुंत होत आहे.तरीही ते विपश्यनेवरील पुस्तक मी घेतले आणि धन्य पावलो. बुध्द धर्मामुळे माणसाला कसा विचार करावा हे शास्त्रोक्त पध्दतीने समजले.
आज बुध्द पौर्णिमा आहे. बुध्दाविषयी त्यांच्या विचाराविषयी मला खूप प्रेम आहे. माणुस मनाचा गुलाम असतो. मनाला जाणले तर माणुस चांगल्याप्रकारे आयुष्य जगू शकतो. त्यासाठी बुध्दधर्म प्रज्ञा, शील, करूणा याची शिकवण देते. जनसंज्ञापन शिकणा-या प्रत्येकाने विपश्यनेचे तत्वज्ञान माहित करून घ्यावे असे माझे मत आहे. वर्तमानकाळात जगणे सर्वात महत्वाचे असते. माणसाचे मन नेहमीच भूत-भविष्यात गढलेले असते. त्यामुळेच माणुस दुःखी होतो. आपण प्राप्त माहितीवर संवेदना काय देतो यावरच त्या माध्यमाचा परिणाम अवलंबून असतो. 
आपण या माध्यमांच्या प्रभावाखाली राहतो आणि गुलाम होतो. आपले विचार , भावना कधीच कोनाड्यात जावून बसलेल्या असतात.
 विपश्यना म्हणजे एक प्रकारे अन्टीव्हारसच आहे. डोक्यात येणारे असंख्य विचार , त्याकडे पहाणे, त्याला लेबल देणे, वर्गीकरण करणे, नको असलेले विचार काढून टाकणे, चांगल्या येणा-या विचारासाठी जागा ठेवणे यामुळे माणुस ताजा टवटवीत राहतो. बुध्द सर्वात आवडायचे कारण त्यांनी बुध्दीला आणि मनाच्या निर्मळतेला महत्व दिले आहे. बुध्दीला पटेल तेच स्विकारा. स्वतः अनुभवा. 
सगळ्यात जास्त इंटरेस्टींग म्हणजे नोटींग ! म्हणजे असे करायचे की आपल्या मनात येणा-या प्रत्येक विचाराची नोंद करायची. मी त्यासाठी युक्ती केली आहे की एक रफ पेपरवर डोक्यात विचार आला की उभी रेष मारतो. त्यामुळे येणारा विचार आपण नियंत्रीत करण्याचे कौशल्य मिळवू शकतो. ही खूप अफलातून कला आहे.
कुठेही कर्मकांड नाही. ज्या गोष्टीची आवश्यकता नसते त्या विचारांचा फाफटपसारा याविषयी मौन बाळगले आहे. ही सुध्दा मला गोष्ट आवडते. उदा. पुनर्जन्म, आत्मा अशा गोष्टी कळाल्या किंवा नाही कळाल्या तरी तुम्हाला तुमचे कर्म करावेच लागते. उगाच गोंधळ उडविणा-या आणि ध्येयापासून विलग करणा-या कल्पना सोडून देणे इष्टच ! बुध्दांना विष्णुचा अवतार मानणे हे थोतांड आहे.  
बौध्द धर्मात जीवन दुःखमय आहे, असे सांगितले आहे. याबाबत मात्र मी पुर्णपणे सहमत नाही. जरी असले तरी दुःखात का जगायचे ? संगीत, कला, क्रीडा अशा विविध गुणांचा विकास करीत जगावे असे वाटते.बहुतेक बुध्दांना प्रथम टप्प्यात माणसाने मनावर विजय मिळवण्यात निपुण व्हावे असे अपेक्षित असावे आपण एकाच मार्गावरील प्रवासी आहोत. आपले जीवन मंगलमय होवो. 

कधी कधी बुध्दांचे विचार वाचून मी   डायरीत काही लिहतो.  त्यापैकी एक विचार!
राग व गर्व या दोन गोष्टी जगात सर्वात जास्त महागड्या आहेत.  जेव्हा आपण राग व गर्व बाळगतो आपल्याजवळील चांगले गुणही गमावून बसतो. अनेक कष्टानंतर प्राप्त झालेले यश व चांगले गुण हे अमुल्य असतात. त्याचा खर्च राग व गर्व एवढ्या सहजतेने करतात की महागड्या हि-याची किंमतही क्षुल्लक ठरावी. त्यामुळे माणसाने राग व गर्व बाळगून उधळपट्टी करू नये. राग व गर्व येत असल्यास थोडी कंजुषी दाखवावी.

Wednesday, April 29, 2015

लिंगायतधर्म एक परिपुर्ण विचार -





मित्रांनो, मी इयत्ता चौथीपासून ईश्वर आणि मानवाने कोणत्या धर्माचे आचरण करावे या विषयी वाचन करत आहे. या विषयी वाचनासाठी एवढा झपाटून गेलो होतो की पार वैदिक सिध्दांत, उपनिषद वार्ता,गीता,तसेच सर्वच कथासार आणि योगवसिष्ठ, पंतजली योगसुत्र असे ग्रंथ नववीपर्यंत वाचून काढले. कुंडलिनी शक्ती साठी तर मी जंगजंग पछाडले. 
अर्थात बुवा, महाराज नव्हे तर स्वतः अनुभवातून ज्ञान घ्या या विचाराप्रमाणेच अनुभव घेतला.मला काही प्रश्नांची उत्तरे मिळाली. पण अनेक प्रश्न निर्माण होवून गुंतागुंत निर्माण झाली.मनाला पडलेले प्रश्न हे शिक्षण सोडवू शकत नाही याचा रागच निर्माण झाला. सुरूवातीला हुशार असणारा मी हळूहळू अभ्यासात मागे पडू लागलो.
हिंदू शीख,मुस्लीम,ख्रिश्चन यांच्या धर्मग्रंथाचे मराठीतील भाषांतरे वाचूनही समाधान नव्हते. मुळात मी आस्तिक आहे, पण आंधळेपणाने भक्ती मला मान्य नाही. त्यामुळे प्रत्येक विचाराशी मी पुर्णपणे सहमत नव्हतो. कुणीतरी येवून परिपुर्ण विचार सांगावा ही इच्छा होती.....
महात्मा बसवेश्वरांच्या जंयतीनिमीत्त मी पुस्तके वाचायला घेतली आणि सुखद धक्का बसला. त्यांचे विचार व परिपुर्ण आहेत याची खात्री पटली.
महात्मा बसवेश्वरांनी भक्तीच्या कोंदणात कर्माचा हिरा बसवून त्यांनी सर्वसामान्य माणसाला आयुष्य उलगडून दाखविले आहे.देव हा सगुण की निर्गुण व जडत्व, चैतन्य म्हणजे काय अशा कल्पनामध्ये भक्तीलाच बांधून टाकण्यात आले. सहज भक्तीभाव , स्पष्ट विचार , व्यहारिक बुध्दीचा वापर करून कर्माचा कोणत्याही पध्दतीने त्याग न करता ईश्वरप्राप्तीचा सांगितलेला मार्ग कोणालाही हवाहवासा वाटणाराच आहे.
धर्मातील किचकट तत्वज्ञानाने गोंधळून गेलेल्या सामान्यांना सहज समजेल व त्याचे आयुष्य उत्तमरीत्या व्यतीत होईल असा लिंगायत धर्म आहे. त्यातील बसव वचन म्हणजे आपल्या मनातील आणि विचारातील जळमटे काढून टाकण्याचे काम करतात.
अश्या महात्मा बसवेश्वरांना मनोमन वंदन....!
====================================================
मुळात आपल्याकडे सर्वच जातीच्या संघटना समाजाला संकुचीत बनवत आहेत. एकप्रकारे संघटना मार्केटींग करणा-या एजन्सीप्रमाणे आपला विचार खपवू लागल्या आहेत. पुरोगामी, सनातनी, मुलनिवासी, विद्रोही सगळेच नुसते शो केस मधील डिस्प्ले खेळणी आहेत. त्यांचा तुम्हाला प्रत्यक्ष आयुष्यात शून्य फायदा होतो. आजच्या युवकांना नवी आव्हाने पेलायची आहेत, जबाबदा-या पार पडायच्या आहेत. हे त्यांच्या खिजगणतीत हि नसते.. माणसाची जात वाईट नसते तर वृत्ती वाईट असते. ती बदलायची असेल तर आपण माणुस आहोत हे आधी लक्षात ठेवावे.  

Featured Post

मेकॉलची शिक्षणपध्दती किती दिवस व्यवस्थेने पचवायची ?

आठवीच्या वर्गावर भूमितीचा तास चालू होता. प्रमेय समजावून सांगणारे शिक्षक असे मानू या समजू असे सांगून प्रमेयाची सिध्दता समजावून सांगत होते....